शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकनियुक्त सरकार हा मूलभूत अधिकार

By admin | Updated: October 29, 2014 02:49 IST

विधानसभा निलंबनावस्थेत ठेवून स्वस्थ बसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार व दिल्लीच्या नायब राज्यपालांवर तीव्र नाराजी नोंदविली.

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या सरकारने गेल्या फेब्रुवारीत राजीनामा दिल्यानंतर गेल्या आठ महिन्यांत दिल्लीत पर्यायी सरकार स्थापणो किंवा नव्याने निवडणूक घेणो यापैकी काहीही न करता विधानसभा निलंबनावस्थेत ठेवून स्वस्थ बसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार व दिल्लीच्या नायब राज्यपालांवर तीव्र नाराजी नोंदविली.
विधानसभा विसर्जित करून नव्याने निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने सरकारला नक्की भूमिका घेण्यासाठी दोन दिवसांची शेवटची मुदत दिली आणि अन्यथा आम्ही याचिकेची गुणवत्तेवर सुनावणी करून निकाल देऊ, असे बजावले.गेल्या तारखेला दिवाळीनंतरची वेळ मागून घेताना केंद्र सरकारने असे सांगितले ेहोते की, विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष या नात्याने भाजपाला सरकार स्थापनेची शक्यता आजमावण्यासाठी पाचारण करण्याचा प्रस्ताव नायब राज्यपाल नजीब जंग यांनी पाठविला असून त्यावर राष्ट्रपतींचा निर्णय व्हायचा आहे. मंगळवारी सुनावणीवेळी भाजपाला सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या प्रस्तावास राष्ट्रपतींनी संमती दिली आहे, असे सरकारने सांगितले. परंतु त्याने खंडपीठाचे समाधान झाले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
 
खंडपीठाने सुनावले की, प्रत्येक वेळी प्रकरण सुनावणीस घेतो म्हटले की तुम्ही येऊन नवववे विधान करता. याचा निर्णय आधीच का घेतला नाही?  तुम्ही हे असे किती दिवस करत राहणार? राष्ट्रपती राजवट अनादी काळ सुरु राहू शकत नाही. लोकशाहीत लोकनियुक्त सरकार असणो व राज्यपालांच्या शासनाखाली न राहणो हा जनतेचा अधिकार आहे.
 
4विधानसभा निवडण़ुकीत 7क् पैकी 32 जागा जिंकणा:या भाजपाला बहुमतासाठी चार जागा कमी पडल्या. त्यामुळे आवश्यक संख्याबळ नसल्याने भाजपाने सरकार स्थापनेस नकार दिला. 28 आमदार असलेल्या आम आदमी पार्टीने नंतर आठ सदस्य असलेल्या काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. 
4नंतर विनोद कुमार बिन्नी यांना पक्षातून काढून टाकल्याने आम आदमीची संख्या 27 झाली व फेब्रुवारीत केजरीवाल यांनी सरकारचा राजीनामा दिला. दरम्यानच्या काळात दिल्लीचे तीन आमदार लोकसभेवर निवडून आल्याने भाजपाचे संख्याबळ आता 28वर आले आहे.
 
4भाजपाला नव्याने निवडणूक घेतली तर विजयाची खात्री नसल्याने ते तसे करण्याचे टाळत आहे. आवश्यक संख्याबळ असते तर तर त्यांनी याआधीच सरकार स्थापन केले असते. पण ते घाणोरडे राजकारण करीत आहेत. 
-अरविंद केजरीवाल, आप
4निवडणूक टाळण्यासाठी भाजपा सबबी शोधत आहे. भाजपाकडे बहुमत नसून आपही त्यांच्यासोबत जाणो अशक्य आहे. अशा स्थितीत भाजपाला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करण्यास आमचा विरोध आहे.
-अरविंदर सिंग लव्हली, दिल्ली प्रदेश काँग्रेस
 
4राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी बोलावल्यावर पुढे काय करायचे याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेऊ, असे दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितले.