शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाही, मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही मग राज्य कोण चालवतंय?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 13:00 IST

Ashish Jaiswal And Uddhav Thackeray : शिंदे गटात असलेले अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणाऱ्या बंडखोर आमदारांनी  ठाकरे आपण ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमधून बंडखोर शिंदे गटाने हा दावा केला आहे. आमच्याकडे दोन तृतियांश आमदारांचा पाठिंबा आहे. ३८ आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे हे सरकार अल्पमतात असल्याचा दावा बंडखोर शिंदे गटाने याचिकेत म्हटले आहे. याच दरम्यान शिंदे गटात असलेले अपक्ष आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

गुवाहाटीमध्ये असलेल्या आशिष जयस्वाल (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काही सवाल केले आहेत. "तुम्ही वर्षा सोडलं, तुम्ही मंत्रालयात जात नाही आणि मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही. मग राज्य कोण चालवतंय?" असं म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला आहे. आशिष जयस्वाल यांच्या विरोधात रामटेकला निषेध सभा घेण्यात येणार आहे. यावर जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी तुमच्या पक्षात आहे का की तुम्ही माझा निषेध कराल? मी अपक्ष आहे, मला संविधानाने अधिकार दिला आहे की मी कुठेही जाऊ शकतो. मी 2019 ला बंडखोर होतो, आज नाही. तेव्हा माझ्या निषेध सभा घ्यायच्या होत्या, तेव्हा घेतल्या का? तेव्हा तर तुम्ही भाजप-शिवसेनेसाठी घेतल्या. आज काय निषेध करता, असं म्हटलं आहे. 

आशिष जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी नाराजीचा सूर आवळला होता. मंत्र्यांकडून निधी वाटपात भेदभाव होत आहे. आमदारांच्या मतदारसंघात दुसऱ्यांच्या शिफारसीवर निधी दिला जात आहे, असे सांगत निधी वाटपात मंत्र्यांची दादागिरी सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. ही काही माझी एकट्याची तक्रार नसून बहुतांश आमदारांची तक्रार आहे. काँग्रेसच्या आमदारांनीही तक्रारींवर सही केली आहे. सर्व आमदारांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. काहींना झुकते माप व काहींवर अन्याय हे होऊ देणार नाही. सर्व आमदारांच्या भरवशावर विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला जातो. त्या आमदारांना नियमानुसार निधी देणे आवश्यक आहे असं म्हटलं होतं. 

मंत्र्यांकडून असमान निधी वाटपात काही आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना, अशी शंकाही आशिष जयस्वाल यांनी उपस्थित केली होती. कुठल्याही आर्थिक व्यवहारातून निधी वितरित करण्यात आला असेल तर ते आम्हाला मान्य नाही, अशा सर्व मंत्र्यांची पोलखोल करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. जयस्वाल यांचे हे आरोप गंभीर असून यामुळे महाविकास आघाडीतील मंत्री आर्थिक व्यवहारातून निधी वितरित करतात का, असा प्रश्न निर्माण झाला होता.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAshish Jaiswalआशीष जयस्वालUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना