शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

धनुष्यबाण कुणाचा? कुठल्याही क्षणी फैसला; शिंदे-ठाकरे गटाकडून लेखी युक्तिवाद सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 20:58 IST

शिवसेनेच्या घटनेचा उल्लेख वारंवार केला जातोय. पण अरविंद सावंत यांना माहिती नसावं. जेव्हा बाळासाहेबांनी पक्ष निर्माण केला तेव्हा घटना वेगळी होती. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा हातात घेतली तेव्हा घटनेत बदल करण्यात आले असा प्रत्यारोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला.

नवी दिल्ली - शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबत शिंदे-ठाकरे गटात वाद सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत हा वाद पोहचला असून दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयोगाने ३० जानेवारीपर्यंत शिंदे-ठाकरे गटांना लेखी युक्तिवाद सादर करण्याची मुदत दिली होती. आज कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून युक्तिवाद सादर केला. त्यानंतर शिंदे गटानेही आयोगासमोर लेखी युक्तिवाद सादर केला आहे. आता निवडणूक आयोग हे दोन्ही युक्तिवाद तपासून कुठल्याही क्षणी त्यांचा निर्णय घोषित करू शकतात. 

या युक्तिवादानंतर शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, शिवसेनेची जी घटना आहे त्यावर आम्ही मुद्दे सादर केलेत. पक्षाची मान्यता ही त्या राज्यात, देशात किती मतदान होते त्यावर अवलंबून असते. आमदार, खासदार यांच्यावर हे मतदान अवलंबून असते. त्यामुळे लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे जास्त त्यांचे मतदान ग्राह्य धरले जाते. त्यावर आम्ही युक्तिवाद मांडला आहे. मुख्य नेता पद हे घटनात्मक आहे ही बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. संपूर्ण प्रक्रिया करूनच मुख्य नेता हे घटनात्मक पद निर्माण करण्यात आले. ही बाजू कायदेशीर रित्या आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडली आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिवसेनेच्या घटनेचा उल्लेख वारंवार केला जातोय. पण अरविंद सावंत यांना माहिती नसावं. जेव्हा बाळासाहेबांनी पक्ष निर्माण केला तेव्हा घटना वेगळी होती. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा हातात घेतली तेव्हा घटनेत बदल करण्यात आले. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही जो युक्तिवाद मांडलाय तो बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या घटनेप्रमाणे मांडले आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या घटनेला मानतो. त्यानुसार युक्तिवाद केला आहे असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं. 

दरम्यान, एखादी घटना किंवा उठाव एक दिवसात होऊ शकत नाही. त्यानुसार काही वातावरण निर्मिती, प्रसंग उभे राहतात. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात शिवसेना आमदार, खासदार यांच्यावर अन्याय झाला. त्यातून हे निर्माण झाले. धोरण, विचार बदलल्यानंतर हा उठाव झाला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेनुसार आम्ही धनुष्यबाणावर दावा केला आहे. स्वच्छेने पक्ष सोडलाय असं कुठेही स्पष्ट नाही. बाळासाहेबांनी जी शिवसेना बनवली तेव्हाची घटना आणि उद्धव ठाकरेंनी बनवली तेव्हाची घटना यावरून निवडणूक आयोग निर्णय घेईल. मतदानाची संख्या मोजली जाईल.ज्याच्याकडे मते जास्त त्यांना मान्यता दिली जाईल असा विश्वास खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना