शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्यबाण कुणाचा? कुठल्याही क्षणी फैसला; शिंदे-ठाकरे गटाकडून लेखी युक्तिवाद सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 20:58 IST

शिवसेनेच्या घटनेचा उल्लेख वारंवार केला जातोय. पण अरविंद सावंत यांना माहिती नसावं. जेव्हा बाळासाहेबांनी पक्ष निर्माण केला तेव्हा घटना वेगळी होती. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा हातात घेतली तेव्हा घटनेत बदल करण्यात आले असा प्रत्यारोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला.

नवी दिल्ली - शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबत शिंदे-ठाकरे गटात वाद सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत हा वाद पोहचला असून दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयोगाने ३० जानेवारीपर्यंत शिंदे-ठाकरे गटांना लेखी युक्तिवाद सादर करण्याची मुदत दिली होती. आज कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून युक्तिवाद सादर केला. त्यानंतर शिंदे गटानेही आयोगासमोर लेखी युक्तिवाद सादर केला आहे. आता निवडणूक आयोग हे दोन्ही युक्तिवाद तपासून कुठल्याही क्षणी त्यांचा निर्णय घोषित करू शकतात. 

या युक्तिवादानंतर शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, शिवसेनेची जी घटना आहे त्यावर आम्ही मुद्दे सादर केलेत. पक्षाची मान्यता ही त्या राज्यात, देशात किती मतदान होते त्यावर अवलंबून असते. आमदार, खासदार यांच्यावर हे मतदान अवलंबून असते. त्यामुळे लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे जास्त त्यांचे मतदान ग्राह्य धरले जाते. त्यावर आम्ही युक्तिवाद मांडला आहे. मुख्य नेता पद हे घटनात्मक आहे ही बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. संपूर्ण प्रक्रिया करूनच मुख्य नेता हे घटनात्मक पद निर्माण करण्यात आले. ही बाजू कायदेशीर रित्या आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडली आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिवसेनेच्या घटनेचा उल्लेख वारंवार केला जातोय. पण अरविंद सावंत यांना माहिती नसावं. जेव्हा बाळासाहेबांनी पक्ष निर्माण केला तेव्हा घटना वेगळी होती. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा हातात घेतली तेव्हा घटनेत बदल करण्यात आले. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही जो युक्तिवाद मांडलाय तो बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या घटनेप्रमाणे मांडले आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या घटनेला मानतो. त्यानुसार युक्तिवाद केला आहे असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं. 

दरम्यान, एखादी घटना किंवा उठाव एक दिवसात होऊ शकत नाही. त्यानुसार काही वातावरण निर्मिती, प्रसंग उभे राहतात. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात शिवसेना आमदार, खासदार यांच्यावर अन्याय झाला. त्यातून हे निर्माण झाले. धोरण, विचार बदलल्यानंतर हा उठाव झाला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेनुसार आम्ही धनुष्यबाणावर दावा केला आहे. स्वच्छेने पक्ष सोडलाय असं कुठेही स्पष्ट नाही. बाळासाहेबांनी जी शिवसेना बनवली तेव्हाची घटना आणि उद्धव ठाकरेंनी बनवली तेव्हाची घटना यावरून निवडणूक आयोग निर्णय घेईल. मतदानाची संख्या मोजली जाईल.ज्याच्याकडे मते जास्त त्यांना मान्यता दिली जाईल असा विश्वास खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना