शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

काश्मीरमध्ये आठ महिन्यांत १३९ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 05:18 IST

घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले

श्रीनगर : यंदाच्या वर्षी १ जानेवारीपासून ते २९ आॅगस्टपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने १३९ दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षात तसेच काश्मीरमध्ये विविध ठिकाणी झालेल्या चकमकीत हे दहशतवादी ठार झाले आहेत.

गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत २६ जवान शहीद झाले. त्यातील सर्वाधिक मृत्यू फेब्रुवारीत झाले. त्या महिन्यात आठ जवान शहीद झाले होते. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, आॅगस्ट महिन्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले तर एकाला जिवंत पकडण्यात आले. मे महिन्यामध्ये लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत २७ दहशतवादी ठार झाले. यंदाच्या अन्य महिन्यांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा झालेला नाही. मे महिन्यात २२ दहशतवादी कारवाया घडल्या. यंदाच्या अन्य महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.शस्त्रसंधीचे उल्लंघन५ आॅगस्टनंतर ते २९ आॅगस्टपर्यंत सीमेवर पाकिस्तानने २२२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्याआधी जुलै महिन्यांत पाकिस्तानने २९६ वेळा असे प्रकार केले होते. गेल्या आठ महिन्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर १८९९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून असे प्रकार गेल्या वर्षी याच कालावधीत १८८९ वेळा घडले होते.जम्मू- काश्मिरातील काही नेत्यांना अटक करण्यात आलेली असून, या नेत्यांना ‘शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर’येथे ठेवण्यात आलेले आहे. पाकशी वाटाघाटी नाही : एस. जयशंकरलंडन : पाकिस्तान उघडपणे दहशतवादाला खतपाणी घालत आहे. जोपर्यंत इस्लामाबादमधून अतिरेकी गटांना आर्थिक रसद पुरविली जाते, या गटांमध्ये माथेफिरुंचा भरणा केला जात आहे, तो पर्यंत पाकिस्तानशी वाटाघाटी करण्याची कोणतीही शक्यता नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी स्पष्ट केले.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरबद्दल ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये लिहिलेल्या लेखाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना जयशंकर बोलत होते. अण्वस्त्राची छाया दक्षिण आशियावर दाटलेली असताना तातडीने चर्चा केली पाहिजे, अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली होती.जयशंकर यांनी ‘पॉलिटिको’ या प्रसार माध्यमाला ब्रुसेल्समध्ये मुलाखत दिली. ते म्हणाले की, पाकिस्तान उघडपणे दहशतवाद पसरवित असताना चर्चेची कल्पना करणे योग्य नाही. काश्मीरमध्ये परिस्थिती कशी आहे, असे विचारले असता येत्या दिवसांमध्ये खोºयातील सुरक्षा दलांचे नियंत्रण कमी केले जाईल, असे नमूद केले. ते म्हणाले की, अतिरेकी शक्तींची सक्रीयता थांबविण्यासाठी, हिंसा घडविण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात असलेल्या लोकांमधील संवाद थांबविण्यासाठी इंटरनेट, टेलिफोन सेवा यांच्यात कपात करणे आवश्यक होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी