शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

काश्मीरमध्ये आठ महिन्यांत १३९ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 05:18 IST

घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले

श्रीनगर : यंदाच्या वर्षी १ जानेवारीपासून ते २९ आॅगस्टपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने १३९ दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षात तसेच काश्मीरमध्ये विविध ठिकाणी झालेल्या चकमकीत हे दहशतवादी ठार झाले आहेत.

गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत २६ जवान शहीद झाले. त्यातील सर्वाधिक मृत्यू फेब्रुवारीत झाले. त्या महिन्यात आठ जवान शहीद झाले होते. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, आॅगस्ट महिन्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले तर एकाला जिवंत पकडण्यात आले. मे महिन्यामध्ये लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत २७ दहशतवादी ठार झाले. यंदाच्या अन्य महिन्यांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा झालेला नाही. मे महिन्यात २२ दहशतवादी कारवाया घडल्या. यंदाच्या अन्य महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.शस्त्रसंधीचे उल्लंघन५ आॅगस्टनंतर ते २९ आॅगस्टपर्यंत सीमेवर पाकिस्तानने २२२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्याआधी जुलै महिन्यांत पाकिस्तानने २९६ वेळा असे प्रकार केले होते. गेल्या आठ महिन्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर १८९९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून असे प्रकार गेल्या वर्षी याच कालावधीत १८८९ वेळा घडले होते.जम्मू- काश्मिरातील काही नेत्यांना अटक करण्यात आलेली असून, या नेत्यांना ‘शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर’येथे ठेवण्यात आलेले आहे. पाकशी वाटाघाटी नाही : एस. जयशंकरलंडन : पाकिस्तान उघडपणे दहशतवादाला खतपाणी घालत आहे. जोपर्यंत इस्लामाबादमधून अतिरेकी गटांना आर्थिक रसद पुरविली जाते, या गटांमध्ये माथेफिरुंचा भरणा केला जात आहे, तो पर्यंत पाकिस्तानशी वाटाघाटी करण्याची कोणतीही शक्यता नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी स्पष्ट केले.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरबद्दल ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये लिहिलेल्या लेखाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना जयशंकर बोलत होते. अण्वस्त्राची छाया दक्षिण आशियावर दाटलेली असताना तातडीने चर्चा केली पाहिजे, अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली होती.जयशंकर यांनी ‘पॉलिटिको’ या प्रसार माध्यमाला ब्रुसेल्समध्ये मुलाखत दिली. ते म्हणाले की, पाकिस्तान उघडपणे दहशतवाद पसरवित असताना चर्चेची कल्पना करणे योग्य नाही. काश्मीरमध्ये परिस्थिती कशी आहे, असे विचारले असता येत्या दिवसांमध्ये खोºयातील सुरक्षा दलांचे नियंत्रण कमी केले जाईल, असे नमूद केले. ते म्हणाले की, अतिरेकी शक्तींची सक्रीयता थांबविण्यासाठी, हिंसा घडविण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात असलेल्या लोकांमधील संवाद थांबविण्यासाठी इंटरनेट, टेलिफोन सेवा यांच्यात कपात करणे आवश्यक होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी