शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये आठ महिन्यांत १३९ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 05:18 IST

घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले

श्रीनगर : यंदाच्या वर्षी १ जानेवारीपासून ते २९ आॅगस्टपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने १३९ दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षात तसेच काश्मीरमध्ये विविध ठिकाणी झालेल्या चकमकीत हे दहशतवादी ठार झाले आहेत.

गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत २६ जवान शहीद झाले. त्यातील सर्वाधिक मृत्यू फेब्रुवारीत झाले. त्या महिन्यात आठ जवान शहीद झाले होते. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, आॅगस्ट महिन्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले तर एकाला जिवंत पकडण्यात आले. मे महिन्यामध्ये लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत २७ दहशतवादी ठार झाले. यंदाच्या अन्य महिन्यांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा झालेला नाही. मे महिन्यात २२ दहशतवादी कारवाया घडल्या. यंदाच्या अन्य महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.शस्त्रसंधीचे उल्लंघन५ आॅगस्टनंतर ते २९ आॅगस्टपर्यंत सीमेवर पाकिस्तानने २२२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्याआधी जुलै महिन्यांत पाकिस्तानने २९६ वेळा असे प्रकार केले होते. गेल्या आठ महिन्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर १८९९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून असे प्रकार गेल्या वर्षी याच कालावधीत १८८९ वेळा घडले होते.जम्मू- काश्मिरातील काही नेत्यांना अटक करण्यात आलेली असून, या नेत्यांना ‘शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर’येथे ठेवण्यात आलेले आहे. पाकशी वाटाघाटी नाही : एस. जयशंकरलंडन : पाकिस्तान उघडपणे दहशतवादाला खतपाणी घालत आहे. जोपर्यंत इस्लामाबादमधून अतिरेकी गटांना आर्थिक रसद पुरविली जाते, या गटांमध्ये माथेफिरुंचा भरणा केला जात आहे, तो पर्यंत पाकिस्तानशी वाटाघाटी करण्याची कोणतीही शक्यता नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी स्पष्ट केले.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरबद्दल ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये लिहिलेल्या लेखाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना जयशंकर बोलत होते. अण्वस्त्राची छाया दक्षिण आशियावर दाटलेली असताना तातडीने चर्चा केली पाहिजे, अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली होती.जयशंकर यांनी ‘पॉलिटिको’ या प्रसार माध्यमाला ब्रुसेल्समध्ये मुलाखत दिली. ते म्हणाले की, पाकिस्तान उघडपणे दहशतवाद पसरवित असताना चर्चेची कल्पना करणे योग्य नाही. काश्मीरमध्ये परिस्थिती कशी आहे, असे विचारले असता येत्या दिवसांमध्ये खोºयातील सुरक्षा दलांचे नियंत्रण कमी केले जाईल, असे नमूद केले. ते म्हणाले की, अतिरेकी शक्तींची सक्रीयता थांबविण्यासाठी, हिंसा घडविण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात असलेल्या लोकांमधील संवाद थांबविण्यासाठी इंटरनेट, टेलिफोन सेवा यांच्यात कपात करणे आवश्यक होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी