शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बेदींच्या पराभवामागे अहंकार

By admin | Updated: February 11, 2015 02:15 IST

नवी दिल्लीत भाजपची परिस्थिती इतकी बिघडली आहे की , मुख्यमंत्रीपदाचीउमेदवार म्हणून ज्या किरण बेदी यांना त्यानी अत्यंत सुरक्षित समजल्या

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीनवी दिल्लीत भाजपची परिस्थिती इतकी बिघडली आहे की , मुख्यमंत्रीपदाचीउमेदवार म्हणून ज्या किरण बेदी यांना त्यानी अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात उभे केले, तिथेही त्याना पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीतील कृष्णानगर हा मतदारसंघ भाजपाच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित समजण्यात येतो, कारण भाजपाची ही परंपरागत जागा आहे. तरीही किरण बेदी यांचा येथे पराभव झाला. देशातील पहिली महिला आयपीएस अधिकारी म्हणून ज्यांचे कौतुक होते, त्या बेदी यांचा असा पराभव का झाला? भाजप कायकर्त्यांच्या मते बेदी यांचा दुराभिमान हेच पराभवाचे कारण आहे. निवडणुकीत बेदी यांचा पराभव हा राजकारणातील पराभव मानला जात आहे. या पहिल्या परीक्षत बेदी या नापास झाल्या आहेत. या पराभवानंतर भाजप नेतेही आता बेदी यांच्या विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित करत आहेत. १५ जानेवारी रोजी किरण बेदी भाजपच्या दिल्लीतील मुख्यमनत्रीपदाच्या उमेदवार बनल्या, तेव्हापासूनच पक्षात त्यांच्याविरोधी वातावरण होते. बेदी या बाहेरच्या उमेदवार आहेत अशी कार्यकर्त्यांची तक्रार होती. ईशान्य दिल्लीतील भाजप खासदार मनोज तिवारी यांनी बेदी यांना उघड विरोध केला होता. पण तेही नंतर गप्प बसले. कृष्णानगर हा मतदारसंघ भाजप नेता हर्षवर्धन यांचा होता. त्यांच्याशीही बेदी यांचे जमले नाही. पहिल्याच दिवशी बेदीनी हर्षवर्धन यांच्याशी पंगा घेतला. बेदी यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीस हर्षवर्धन थोडे उशिरा आले. त्यांची वाट पाहाण्याची गरज बेदी यांना वाटली नाही. हर्षवर्धन यांनी चतुराईने गोड बोलून आपली बाजू सांभाळून घेतली. पण नात्यात दुरावा यायचा तो आलाच आणि नंतर तर तो वाढतच गेला. त्याचा परिणाम असा झाला की गेल्या निवडणुकीत जिथे हर्षवर्धन यांनी ४३ हजार मतानी विजय मिळविला होता, तिथेच बेदी यांना २३०० मतानी हार पत्करावी लागली.