शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

...म्हणून देशात अंडी अन् चिकनचे दर घसरले, किमतीत 30 टक्क्यांची कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 11:55 IST

चीनमध्ये पसरलेल्या कोरोना(Coronavirus)  व्हायरसचा प्रभाव भारतातही दिसायला लागला आहे.

ठळक मुद्देचीनमध्ये पसरलेल्या कोरोना(Coronavirus)  व्हायरसचा प्रभाव भारतातही दिसायला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अंडी आणि चिकन(Eggs and Chicken)च्या दरांमध्ये 30 टक्क्यांची घसरण झाली आहे. व्हॉट्सऍप आणि फेसबुकच्या माध्यमातून कोरोना व्हायरससंदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज पाठवून लोकांना घाबरवलं जात आहे.

नवी दिल्लीः चीनमध्ये पसरलेल्या कोरोना(Coronavirus)  व्हायरसचा प्रभाव भारतातही दिसायला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अंडी आणि चिकन(Eggs and Chicken)च्या दरांमध्ये 30 टक्क्यांची घसरण झाली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्च्या रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर कोरोना व्हायरससंदर्भात काही मेसेज व्हायरल केले जात आहेत. व्हॉट्सऍप आणि फेसबुकच्या माध्यमातून कोरोना व्हायरससंदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज पाठवून लोकांना घाबरवलं जात आहे. त्यामुळे देशात अंडी आणि चिकनच्या मागणीत घट झालेली असून, किमती घसरल्या आहेत. स्वस्त झाली अंडी आणि चिकनः नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी (NECC)च्या आकड्यांनुसार, अंड्यांच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 15 टक्के कपात झाली आहे. नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी (NECC)च्या आकड्यांनुसार अंड्यांच्या किमती फेब्रुवारी 2019च्या तुलनेत 14 टक्क्यांनी खाली आल्या आहेत. तर मुंबईत मागणीत 13 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. चेन्नईमध्ये 12 टक्के आणि वारंगल(आंध्र प्रदेश)मध्ये 16 टक्क्यांची कपात नोंदवण्यात आली आहे. दिल्लीत अंड्यांच्या किमती (100) 358 रुपयांवर आल्या आहेत. तर गेल्या वर्षी एवढ्या अंड्यांची किंमत 441 रुपयांच्या जवळपास होती. दिल्लीत ब्रॉयलर चिकनच्या किमती जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या तुलनेत 86 रुपयांनी घसरून 78 रुपये प्रति किलोग्रॅमवर आल्या आहेत. अशाच प्रकारे दुसऱ्या शहरांमध्ये चिकनचे दर पडले आहेत. खरं तर थंडीच्या दिवसांत चिकन आणि अंड्यांना जास्त मागणी असते. परंतु सध्या मागणीत घट आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घाऊक बाजारात चिकन आणि अंड्यांची किंमत 15-30 टक्क्यांनी घसरली आहे. पोल्ट्री फार्मशी संबंधित व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, व्यापाऱ्यांना सध्या दुपटीनं फटका बसत आहे. कोंबड्यांना आहार देणे महाग झाले आहे. मागील हिवाळी हंगामाच्या तुलनेत कोंबडीच्या खाद्याच्या किमती 35-45 टक्क्यांनी जास्त आहेत. यामुळे पोल्ट्री व्यवसाय करणंही जोखमीचं झालं आहे. चिकन आणि अंड्यांच्या मागणीत घसरण आल्यानं शेतकरी चिंतातुर झाला आहे. समाज माध्यमातून पसरवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेसेजमुळे देशात अंडी आणि कोंबडीची मागणी कमी झाल्याचंही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.