शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संरक्षण कायदा खिळखिळा करण्याचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 12:03 IST

३४ वर्षांनंतर प्रथमच तरतुदींमध्ये कपात; निसर्ग संपवून अनियंत्रित विकासाला पायघड्या घालण्याचा डाव

- गजानन दिवाणऔरंगाबाद : १९८६ साली भारतात आलेला पर्यावरण संरक्षण कायदा चार टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या तरतुदींद्वारे बळकट करण्यात आला. आता ३४ वर्षांनंतर प्रथमच तरतुदींमध्ये कपात करून हा कायदा खिळखिळा करण्याचा घाट घातला जात आहे.१९८६ साली जन्माला आलेला हा कायदा माहीत व्हायलाच चार वर्षे गेले. पुढील चार वर्षांत या कायद्यातील त्रुटी काही लोकांच्या लक्षात आल्या. स्थानिक लोकांना विश्वासात न घेता प्रकल्प येत असल्याने गंगा प्रदूषण, कोळसा खाणींविरोधात ठिकठिकाणी आंदोलने झाली. त्यामुळे १९९४ साली पहिला अध्यादेश काढण्यात आला. कुठलाही प्रकल्प येत असताना स्थानिक लोकांचे ऐकले पाहिजे, या भावनेतून जनसुनावणीचा जन्म झाला. पुढे २००६ मध्ये दुसरा अध्यादेश आला. आधीपेक्षा जास्त तरतुदी यात केलेल्या दिसतात. प्रकल्पांना परवानगी देणारी एकच समिती होती आणि ती दिल्लीत बसायची. त्यामुळे २००६ मध्ये ए आणि बी अशा दोन श्रेणी करण्यात आल्या. त्यामुळे ए प्रकल्पाची परवानगी दिल्लीतून तर बी प्रकल्पांची परवानगी राज्यातून दिली जाऊ लागली. वन आणि वन्यजीव याबाबत आवश्यक त्या ठिकाणी संबंधित परवानगी आवश्यक करण्यात आली. त्यामुळे राज्य महामार्गासारखे प्रकल्पदेखील यात समाविष्ट झाले. तर राज्य स्तरावरील समितीला अधिकचे अधिकार देण्यात आले. पुढे २०१० साली पर्यावरण संरक्षण कायद्यात किरकोळ बदल करण्यात आले.वेगवेगळ्या श्रेणींमध्ये मोठा घोळनव्या मसुद्यात वेगवेगळ्या श्रेणी वाढविण्यात आल्या आहेत. हाच सर्वात मोठा घोळ असल्याचे वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आता १०० कि.मी. लांब आणि ७० मीटर रुंदीचा नॅशनल किंवा एक्स्प्रेस वे असेल तरच तो ए श्रेणीमध्ये येईल. त्यामुळे मोठ्या रस्त्यांनाच पर्यावरण परवानगी घ्यावी लागेल. शिवाय १०० कि.मी.च्या रस्त्याचे दोन-तीन तुकडे करून दाखविल्यास त्यातलाही अडसर दूर होणार आहे.महामार्ग एखाद्या जंगलातून, व्याघ्र प्रकल्पातून वा अभयारण्यातून जाणार असेल तरी त्याला वेगळी श्रेणी दिली गेली नाही. म्हणजे खुल्या मार्गावरून जाणारा रस्ता आणि जंगलातून जाणारा रस्ता नव्या मसुद्यात एकाच श्रेणीत असेल.आधी ५० हेक्टरवरील प्रकल्प ए श्रेणीत होता. आता ही मर्यादा १०० हेक्टरची केली आहे. त्यामुळे १०० हेक्टर क्षेत्रापर्यंतच्या प्रकल्पांना राज्य स्तरावरच परवानगी दिली जाईल.धरणांमधील, नद्यांमधील उत्खनन आता बी-२ श्रेणीमध्ये टाकले. यातून स्थानिक पातळीवर तातडीने परावानग्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे नद्यांची जैवविविधता संपून जाईल.नदी खोऱ्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आधी १५ वर्षांची अट होती. ती आता ५० वर्षांची प्रस्तावित केली आहे. याचा अर्थ उशीर झाला तरी पुढील ५० वर्षे हे प्रकल्प रद्द करता येणार नाहीत.

टॅग्स :environmentपर्यावरण