शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सोप्या भाषेत कायदे तयार करण्याचा प्रयत्न : पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 06:13 IST

सायबर दहशतवाद आणि विध्वंसक हेतुंसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आपले सरकार समजण्यासाठी सोपे व शक्य तेवढ्या भारतीय भाषांत कायदे बनविण्याचा प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. येथे आंतरराष्ट्रीय वकिलांच्या परिषदेचे उद्घाटन करताना त्यांनी सायबर दहशतवाद व मनी लाँड्रिंगसह विध्वंसक हेतूंसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. हे धोके सीमा किंवा अधिकार क्षेत्र वगैरे काही पाहत नाहीत. त्यांना सामोरे जाताना विविध देशांच्या कायदेशीर चौकटींत संयुक्त प्रयत्नांची गरज आहे. धोका जागतिक असतो, तेव्हा सामोरे जाण्याची पद्धतही जागतिक असावी, असे ते म्हणाले.

हवाई प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सर्व देशांच्या वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील सहकार्याचे उदाहरण देत ते म्हणाले की, धोक्यांना सामोरे जाण्यासाठी जागतिक व्यवस्था लागणार आहे. मात्र, हे एका सरकारचे किंवा देशाचे काम नाही. कायदेशीर व्यवस्थेवर भाष्य करताना ते म्हणाले की, कायदे लिहिण्यासाठी व न्यायालयीन प्रक्रियेत वापरली जाणारी भाषा न्याय सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

तुमच्या भाषेत असावासरकारमधील आम्ही मंडळी असा विचार करतो की, कायदा दोन पद्धतीने तयार केला जावा. एक कायद्याच्या मसुदा तुमच्या नेहमीच्या भाषेतील असेल आणि दुसरा मसुदा देशातील सामान्य माणसालाही समजेल, अशा भाषेत असेल. त्याला स्वत:ला तो कायदा समजून घेता यायला हवा. कायद्याचा मसुदा जटिल पद्धतीने तयार करण्याचे प्रचलन सध्या सुरु आहे.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

संस्थात्मक सहयोग हाच पुढे जाण्याचा मार्ग : सरन्यायाधीश चंद्रचूडनवी दिल्ली : न्याय मिळवून देण्यासाठी संस्थात्मक सहयोग हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी सांगितले आणि राष्ट्रे, संस्था आणि व्यक्ती यांच्यातील सहभागाची गरज अधोरेखित केली. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या दोन दिवसीय 'आंतरराष्ट्रीय वकील परिषद २०२३' च्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, मतभेद बाजूला ठेवून देशाच्या सेवेत व्यक्ती म्हणून पुढे आले पाहिजे. नुकत्याच संपन्न झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या घोषणेप्रमाणे 'वसुधैव कुटुंबकम्' म्हणजे, जग हे एक कुटुंब आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीministerमंत्रीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय