शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

ईव्हीएमबद्दल खोटी तक्रार करणाऱ्यास शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 06:35 IST

कायद्यात दुरुस्तीची शक्यता : निवडणूक आयोगात लवकरच चर्चा

नवी दिल्ली : ईव्हीए किंवा व्हीव्हीपॅटमध्ये फेरफार झाल्याची खोटी तक्रार करणाºया मतदारावर भारतीय दंड संहितेच्या १७७व्या कलमानुसार कारवाई करता येते. या तरतुदीबद्दल निवडणूक आयोग आता चर्चा करणार आहे. या तरतुदीत दुरुस्ती किंवा ती काही प्रमाणात शिथीलही केली जाऊ शकते.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुका व्यवस्थित पार पडल्या आहेत. त्यामुळे आता काही गोष्टींवर आम्ही बारकाईने विचार करणार आहोत. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये आपले मत नोंदवले गेलेच नाही असा दावा करणाºया मतदाराला निवडणुकांच्या नियमांनुसार चाचणी मत देता येते. पण ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमध्ये फेरफार झाल्याचे तो मतदार सिद्ध करू शकला नाही तर त्याच्यावर खोटी माहिती दिल्याबद्दल कारवाई करता येते. त्याला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास तसेच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

मात्र ही तरतुद अनेकांना अनाठायी वाटते. भारतीय दंड संहितेचा बडगा नसता तर निवडणुक प्रक्रियेबाबत लोकांनी सर्रास खोटी माहिती पसरवली असती असे मत निवडणूक आयोगाने यापूर्वी व्यक्त केले होते.

भाषण स्वातंत्र्यावर गदानिवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळे आणू पाहाणाऱ्यांना रोखण्यासाठी भारतीय दंडसंहितेच्या १७७व्या तरतुदीचा बडगा उगारला जातो. या तरतुदीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाचे मत सर्वोच्च न्यायालयाने मागविले होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या याचिकेची दखल घेतली होती. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यांच्यात फेरफार झाल्याबद्दल किंवा तसा संशय आल्यास त्यावर मत करणे हा जनतेचा अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याच्या हक्कावर भारतीय दंड संहितेतील तरतुदीमुळे गदा येत आहे असा आक्षेप सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेत घेण्यात आला होता.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग