शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमबद्दल खोटी तक्रार करणाऱ्यास शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 06:35 IST

कायद्यात दुरुस्तीची शक्यता : निवडणूक आयोगात लवकरच चर्चा

नवी दिल्ली : ईव्हीए किंवा व्हीव्हीपॅटमध्ये फेरफार झाल्याची खोटी तक्रार करणाºया मतदारावर भारतीय दंड संहितेच्या १७७व्या कलमानुसार कारवाई करता येते. या तरतुदीबद्दल निवडणूक आयोग आता चर्चा करणार आहे. या तरतुदीत दुरुस्ती किंवा ती काही प्रमाणात शिथीलही केली जाऊ शकते.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुका व्यवस्थित पार पडल्या आहेत. त्यामुळे आता काही गोष्टींवर आम्ही बारकाईने विचार करणार आहोत. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये आपले मत नोंदवले गेलेच नाही असा दावा करणाºया मतदाराला निवडणुकांच्या नियमांनुसार चाचणी मत देता येते. पण ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमध्ये फेरफार झाल्याचे तो मतदार सिद्ध करू शकला नाही तर त्याच्यावर खोटी माहिती दिल्याबद्दल कारवाई करता येते. त्याला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास तसेच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

मात्र ही तरतुद अनेकांना अनाठायी वाटते. भारतीय दंड संहितेचा बडगा नसता तर निवडणुक प्रक्रियेबाबत लोकांनी सर्रास खोटी माहिती पसरवली असती असे मत निवडणूक आयोगाने यापूर्वी व्यक्त केले होते.

भाषण स्वातंत्र्यावर गदानिवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळे आणू पाहाणाऱ्यांना रोखण्यासाठी भारतीय दंडसंहितेच्या १७७व्या तरतुदीचा बडगा उगारला जातो. या तरतुदीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाचे मत सर्वोच्च न्यायालयाने मागविले होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या याचिकेची दखल घेतली होती. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यांच्यात फेरफार झाल्याबद्दल किंवा तसा संशय आल्यास त्यावर मत करणे हा जनतेचा अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याच्या हक्कावर भारतीय दंड संहितेतील तरतुदीमुळे गदा येत आहे असा आक्षेप सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेत घेण्यात आला होता.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग