शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

ईव्हीएमबद्दल खोटी तक्रार करणाऱ्यास शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 06:35 IST

कायद्यात दुरुस्तीची शक्यता : निवडणूक आयोगात लवकरच चर्चा

नवी दिल्ली : ईव्हीए किंवा व्हीव्हीपॅटमध्ये फेरफार झाल्याची खोटी तक्रार करणाºया मतदारावर भारतीय दंड संहितेच्या १७७व्या कलमानुसार कारवाई करता येते. या तरतुदीबद्दल निवडणूक आयोग आता चर्चा करणार आहे. या तरतुदीत दुरुस्ती किंवा ती काही प्रमाणात शिथीलही केली जाऊ शकते.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुका व्यवस्थित पार पडल्या आहेत. त्यामुळे आता काही गोष्टींवर आम्ही बारकाईने विचार करणार आहोत. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये आपले मत नोंदवले गेलेच नाही असा दावा करणाºया मतदाराला निवडणुकांच्या नियमांनुसार चाचणी मत देता येते. पण ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमध्ये फेरफार झाल्याचे तो मतदार सिद्ध करू शकला नाही तर त्याच्यावर खोटी माहिती दिल्याबद्दल कारवाई करता येते. त्याला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास तसेच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

मात्र ही तरतुद अनेकांना अनाठायी वाटते. भारतीय दंड संहितेचा बडगा नसता तर निवडणुक प्रक्रियेबाबत लोकांनी सर्रास खोटी माहिती पसरवली असती असे मत निवडणूक आयोगाने यापूर्वी व्यक्त केले होते.

भाषण स्वातंत्र्यावर गदानिवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळे आणू पाहाणाऱ्यांना रोखण्यासाठी भारतीय दंडसंहितेच्या १७७व्या तरतुदीचा बडगा उगारला जातो. या तरतुदीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाचे मत सर्वोच्च न्यायालयाने मागविले होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या याचिकेची दखल घेतली होती. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यांच्यात फेरफार झाल्याबद्दल किंवा तसा संशय आल्यास त्यावर मत करणे हा जनतेचा अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याच्या हक्कावर भारतीय दंड संहितेतील तरतुदीमुळे गदा येत आहे असा आक्षेप सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेत घेण्यात आला होता.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग