शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स, चौकशीसाठी बोलावले; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 09:49 IST

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने केजरीवाल यांना पाठवलेले हे चौथे समन्स आहे.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले असून त्यांना १८ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. मद्य धोरण प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना पाठवलेले हे चौथे समन्स आहे, याआधी त्यांना २ नोव्हेंबर, २१ डिसेंबर आणि ३ जानेवारीला तीन समन्स बजावण्यात आले होते पण केजरीवाल चौकशीसाठी गेले नाहीत. आता या चौथ्या समन्सनंतर अरविंद केजरीवाल ईडीसमोर हजर राहतात की नाही याची जोरदार चर्चा सुरू आहे. या समन्सवर आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

नितीश कुमार संयोजक नको, TMCचा सूर? INDIA आघाडीच्या बैठकीकडे ममता बॅनर्जींची पाठ!

ईडीने सातत्याने समन्स जारी केल्यानंतर, आम आदमी पार्टीचा दावा आहे की, अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी ही सर्व प्रक्रिया केली जात आहे. ईडी त्यांना चौकशीच्या बहाण्याने बोलावून अटक करू इच्छित आहे. आप'चे म्हणणे आहे की जर ईडीला चौकशी करायची असेल तर ते आपले प्रश्न लिहून केजरीवाल यांना देऊ शकतात.

काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या अटकेची भीती व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. ईडी आज अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकून त्यांना अटक करू शकते, असा दावा आप नेत्यांनी केला होता. दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दावा केला होता की, ईडी आज केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकू शकते, त्यानंतर त्यांना अटक केली जाऊ शकते.

भाजपनेही भाजपनेही या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते हरीश खुराणा यांनी म्हटले आहे की, आतिशी किंवा इतर आप नेत्यांना आकर्षक कथा रचण्यात मजा येते. विपश्यना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कायदा नाही. खासदार निवडणुका महत्त्वाच्या आहेत, कायदा नाही. अरविंद केजरीवाल स्वतःला कायद्यापेक्षा वरचे समजतात, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय