शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 06:40 IST

उद्योगपती अनिल अंबानी यांना घोटाळेबाज जाहीर केल्यानंतर गुरुवारी ईडीने त्यांच्याशी निगडीत मुंबईतील ३५ ठिकाणी व सुमारे ५० कंपन्यांवर छापेमारी करीत जवळपास २५ अधिकाऱ्यांची चौकशी केली.

मुंबई : काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने उद्योगपती अनिल अंबानी यांना घोटाळेबाज जाहीर केल्यानंतर गुरुवारी ईडीने त्यांच्याशी निगडीत मुंबईतील ३५ ठिकाणी व सुमारे ५० कंपन्यांवर छापेमारी करीत जवळपास २५ अधिकाऱ्यांची चौकशी केली. पथकाकडून अनिल यांच्या निवासस्थानावर मात्र छापेमारी करण्यात आलेली नाही.रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप कंपनीने केलेल्या कथित मनी लॉड्रिंगप्रकरणी ही छापेमारी झाली. अंबानींच्या समूह कंपन्यांनी मनी लॉड्रिंग केल्याबाबत नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनॅन्शियल रिपोर्टिंग ऑथोरिटी, बँक ऑफ बडोदा यांच्याकडील माहिती, सीबीआयकडून दाखल दोन एफआयआरच्या माहितीच्या आधारे ईडीने हे छापे मारले.

अनिल अंबानी आणि आरकॉम घोटाळेबाजभारतीय रिझर्व्ह बँकेच्या फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १३ जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन यांना घोटाळेबाज जाहीर केले. याप्रकरणी आता बँक सीबीआयकडे औपचारिक तक्रार दाखल करणार आहे. बँकेने कंपनीला २,२२७ कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. मात्र, या कर्जाची मुद्दल आणि व्याज २६ ऑगस्ट २०१६ पासून थकीत आहे.येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाचीही तपासणीअंबानी यांच्या उद्योग समूहाने येस बँकेकडून २०१७ ते २०१९ या कालावधीत तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जासाठी लाचखोरी झाली, तसेच कर्जाची रक्कम काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वळवत अफरातफर करण्यात आल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.

रिलायन्स म्हणते...रिलायन्स पॉवर व इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांनी म्हटले की, ही छापेमारी जुन्या प्रकरणांशी निगडीत आहे. आमच्या कंपन्यांशी याचा संबंध नाही. कोणतीही चौकशी देखील सुरू नाही.

टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीIndiaभारतfraudधोकेबाजी