शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुखवार्ता: अर्थव्यवस्था जोमात, चालू तिमाहीत वाढणार नाेकरभरतीचा वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:28 IST

उद्योगसमूहांना भासू लागली अधिक मनुष्यबळाची गरज

नवी दिल्ली : देशातील उद्याेगधंदे आणि व्यवसायांची गाडी रुळावर येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही मागणी वाढू लागली आहे. ऑक्टाेबर ते डिसेंबर या तिमाहीत नाेकर भरती टाॅप गिअरमध्ये राहणार  आहे. कंपन्यांकडून हाेणारी भरती गेल्या १८ महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.टीमलीझ एम्प्लाॅयमेंट आउटलूक रिपाेर्टमध्ये कंपन्यांमधील नाेकरभरतीचा आढावा घेण्यात आला आहे. देशातील २१ क्षेत्रांमधील लघू, मध्यम आणि माेठ्या अशा ६५० कंपन्यांमधील मागणीबाबत सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यानुसार ४१ टक्के कंपन्या तिसऱ्या तिमाहीत नाेकरभरती करण्याच्या विचारात आहेत. हे प्रमाण जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत ३८ टक्के हाेते, तर गेल्यावर्षी हेच प्रमाण १८ टक्के एवढेच हाेते. अहवालानुसार, कनिष्ठ पातळीवर ३४ टक्के, वरिष्ठ पातळीवर २७ आणि मध्य पातळीवर २४ टक्के भरती करण्याचा कंपन्यांचा विचार आहे. गेल्या महिन्यात मॅनपाॅवर ग्रुप एम्प्लाॅयमेंट आउटलूक सर्व्हेमध्येही ऑक्टाेबर-डिसेंबर या तिमाहीत राेजगार भरतीत वाढ हाेण्याचा अंदाज वर्तविण्यात आला हाेता.बेंगळुरूमध्ये ६७ टक्के, दिल्लीत ५९, हैदराबादमध्ये ५३, पुण्यात ४६ आणि चेन्नई येथे ४५ टक्के भरती हाेणार असल्याचा अंदाज आहे.आयटी क्षेत्रात सर्वाधिक मागणीक्षेत्रनिहाय विचार केल्यास आयटी क्षेत्रात सर्वाधिक मागणी राहणार आहे. आयटी क्षेत्राकडून ६९ टक्के, शैक्षणिक क्षेत्रात ६४ टक्के, फार्मामध्ये ६१, एफएमसीजीमध्ये ५९ आणि ई-काॅमर्समध्ये ५७ टक्के भरती हाेण्याची शक्यता आहे.तिसऱ्या लाटेची भीती झाली कमीकंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत बाेलाविण्याची तयारी कंपन्यांकडून हाेत आहे. व्यापक लसीकरण आणि तिसऱ्या लाटेची भीती कमी झाल्याने उद्याेगधंद्यांची गाडी रुळावर येत आहे. सणासुदीच्या काळात मागणीही जाेर धरू लागली आहे. त्यामुळे व्यवसायवृद्धीसाेबतच मनुष्यबळाची मागणीही पूर्ण करण्याची तयारी कंपन्यांनी केली आहे.