शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - आतले आणि बाहेरचे ! कोट्यवधी रुपयांच्या बदल्यात खासदारकी अन् मंत्रीपदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 11:52 IST

अर्थात या देशात राजकीय नेत्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या रकमांच्या तुलनेत या रकमा म्हणजे ‘किस झाड की पत्ती’!

शंभर कोटी रुपयांच्या बदल्यात राज्यसभेची खासदारकी अथवा राज्यपालपद मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केंद्रीय अन्वेषण संस्थेने सोमवारी केला. काही दिवसांपूर्वीच, अशाच प्रकारे महाराष्ट्रातील काही आमदारांना शंभर कोटी रुपयांच्या मोबदल्यात मंत्रिमंडळात वर्णी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. तिकडे पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांना सक्तवसुली महासंचालनालयाने शनिवारी शिक्षकभरती घोटाळ्याप्रकरणी अटक केली. तत्पूर्वी ईडीने त्यांच्या नजीकच्या एका महिलेकडून तब्बल २१ कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली होती. त्याआधी महाराष्ट्रातील तब्बल पन्नास आमदारांचे राजकीय पर्यटन चांगलेच गाजले. त्यांचा मुंबई-सुरत-गुवाहाटी-गोवा-मुंबई असा चार्टर्ड विमानांनी झालेला प्रवास आणि पंचतारांकित हॉटेल्समधील तब्बल दहा दिवसांचे वास्तव्य, देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. यापैकी शंभर कोटी रुपयांच्या मोबदल्यात खासदारकी, मंत्रिपद अथवा राज्यपालपद मिळवून देण्याच्या प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात पैशाची देवाणघेवाण झाल्याचे अद्याप समोर आले नसले तरी, चटर्जी यांच्या नजीकच्या महिलेकडे सापडलेली रोख रक्कम आणि आमदारांच्या राजकीय पर्यटनाची जिवंत चित्रीकरणे बघून विस्फारलेले सर्वसामान्य जनतेचे डोळे अद्यापही सामान्य झाले नसावेत! अर्थात या देशात राजकीय नेत्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या रकमांच्या तुलनेत या रकमा म्हणजे ‘किस झाड की पत्ती’!

राजकीय नेते सत्ताकारणाच्या माध्यमातून अफाट कमाई करतात आणि त्यांचे चेलेचपाटे मात्र आयुष्यभर सतरंज्याच उचलत राहतात, अशा आशयाचे विनोद हल्ली समाजमाध्यमांमध्ये खूप फिरत असतात. ती वस्तुस्थिती आहे, हे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही माहीत असते. तरीदेखील ते राजकीय नेत्यांच्या कच्छपी लागतात; कारण कधीकाळी आपल्यासारखाच कार्यकर्ता असलेल्या नेत्याने अल्पावधीतच किती अफाट माया गोळा केली, हे त्यांनी याची देही, याची डोळा, बघितलेले असते. नेत्याप्रमाणेच आपलेही नशीब एक दिवस फळफळेल, ही आसच कार्यकर्त्याला सतरंज्या उचलण्याची प्रेरणा देत राहते ! राजकीय नेते सत्तेच्या माध्यमातून माया जमवतात, तर मग आपण का मागे राहायचे, या भावनेतून प्रशासन सेवांमधील उच्च अधिकारीही त्याच वाटेला लागतात. ते करतात तर आपणच कोणते घोडे मारले, म्हणून खालचे अधिकारी व कर्मचारीही मिळेल तिथे चिरीमिरी खातात. नेते आणि अधिकारी लुटतात, तर आपणही करचोरी केल्यास काय बिघडते, या भावनेतून व्यापारी-उद्योजकही शक्य होईल तेवढा कर बुडविण्याचा प्रयत्न करतात.

थोडक्यात काय, तर संधी मिळालेला प्रत्येकजण, जिथे आणि जेवढे शक्य होईल, तेवढे ओरपण्याच्या प्रयत्नात आहे. अर्थात संधी असूनही न ओरपणारे काही सन्माननीय अपवाद आहेत; परंतु हल्ली ते नियम सिद्ध करण्यापुरतेच उरले आहेत ! ओरपण्याचा हा जो सार्वत्रिक रोग या देशात जडला आहे, त्याची फळे भोगावी लागतात, ती ओरपण्याची कोणतीही संधी उपलब्ध नसलेल्या सर्वसामान्यांना! अर्थात, त्यांच्यापैकी बहुतांशजण विंदा करंदीकरांच्या ‘आतले आणि बाहेरचे’ या ललित निबंधातल्याप्रमाणे ‘बाहेरचे’ असतात, तोपर्यंतच या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात बोलत असतात. जेव्हा त्यांना ‘आतले’ होण्याची संधी मिळते, तेव्हा त्याच व्यवस्थेचा भाग बनण्यात त्यांनाही काही वावगे वाटत नाही. थोडक्यात काय, तर भ्रष्टाचार हाच हल्ली शिष्टाचार झाला आहे! तो संपावा, किमान नगण्य पातळीवर तरी असावा, असे अपवादवगळता कुणालाही वाटत नाही. आपल्यालाही त्या व्यवस्थेचा भाग होण्याची संधी मिळावी, एवढीच बहुतांश जणांची इच्छा असते. या मानसिकतेमुळे देशाचे किती प्रचंड नुकसान होते, याचे कुणालाही काहीही सोयरसुतक नाही! मी आणि माझे कुटुंब यांचे व्यवस्थित चालले म्हणजे झाले, देश खड्ड्यात गेला तरी मला काय त्याचे, ही मानसिकता मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे, ही कटु असली तरी वस्तुस्थिती आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवकाश उरला आहे; पण तब्बल ७५ वर्षांच्या या प्रदीर्घ कालखंडात देशाभिमान, राष्ट्रीयत्व या भावनांचे संवर्धन करण्यात आपण मोठ्या प्रमाणात अपयशी ठरलो आहोत, हेच खरे! आपला देशाभिमान केवळ पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्यापुरताच शिल्लक उरला की काय, असे कधी वाटू लागते. स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना तरी या परिस्थितीत फरक होईल, अशी आशा करावी का?

टॅग्स :ministerमंत्रीMumbaiमुंबईMONEYपैसा