शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

आर्थिक विकासदर ११ वर्षांतील नीचांकी मार्च अखेरची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 23:47 IST

विकासदर ३.१ टक्के

नवी दिल्ली : देश लॉकडाउनमधून जात असतानाच मार्च तिमाही अखेरची अर्थव्यवस्थेची आकडेवारी जाहीर झाली असून, या तिमाहीत देशाचा आर्थिक विकासदर ३.१ टक्क्यांवर आला आहे. देशाची गेल्या ११ वर्षांतील ही नीचांकी वाढ आहे.

भारत सरकारच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वरील स्थिती आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.२ टक्के राहिला असून, गेल्या ११ वर्षातील ही सर्वात कमी अशी कामगिरी आहे. देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याने २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वच आर्थिक उलाढाली ठप्प झाल्या असून, त्याचा परिणाम येत्या २ तिमाहीमध्ये दिसून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विविध पतमापन संस्थांनी भारतीय आर्थिक वाढ कमी राहण्याचा अंदाज या आधीच व्यक्त केलेला आहे.

कमी झालेल्या विकासदरामुळे अर्थसंकल्पीय तूट वाढत असते. सन २०१९-२० या वर्षात ही तूट जीडीपीच्या ४.५९ टक्के एवढी वाढली आहे. अर्थसंकल्पात ती ३.८ टक्के राहण्याचा अंदाज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला होता.

एप्रिल महिन्यात ८ क्षेत्रांची ३८ टक्के घसरण

देशातील ८ प्रमुख उद्योग क्षेत्रांमध्ये एप्रिल महिन्यात ३८.१ टक्क्यांनी घट झाल्याची आकडेवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे जवळपास सर्वच औद्योगिक उत्पादन बंद होते. त्याचा फटका या उद्योगांना बसला आहे. कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम उत्पादने, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये एप्रिल महिन्यातील घट ही २ अंकी राहिली आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात या ८ पायाभूत क्षेत्रांमध्ये ५.२ टक्के एवढी वाढ झाली होती. मार्च महिन्यात मात्र या पायाभूत क्षेत्रांमध्ये ९ टक्के आकुंचन झाले होते.

सेवा क्षेत्राला लॉकडाऊनमुळे मोठा फटका : सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रात १.४ टक्के, तर बांधकाम क्षेत्रात २.२ टक्के घट झाल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. देशाच्या एकूण उत्पादनात ५५ टक्के वाटा असलेल्या सेवा क्षेत्राला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला असून, त्यामुळे नोकऱ्याही गमवाव्या लागल्या आहेत.

जीएसटी कौन्सिलची बैठक पुढील महिन्यात

च्देशातील जीएसटीबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या जीएसटी कौन्सिलची बैठक पुढील महिन्यात होणार आहे. लॉकडाऊनमुळे देशातील करमहसूल कमी झाला असला तरी कमी गरजेच्या वस्तूंवर जीएसटी वाढविण्यास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तयारी नसल्याचे अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. या आधी जीएसटी कौन्सिलची बैठक मार्च महिन्यात झाली होती.

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था