शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Retirement Age: कर्मचारी निवृत्तीचं वय वाढवण्याची आर्थिक सल्लागार समितीची शिफारस; लाखो कर्मचाऱ्यांना फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 17:43 IST

Higher retirement age: जागतिक लोकसंख्या अंदाज २०१९ नुसार २०५० पर्यंत भारतात जवळफास ३२ कोटी ज्येष्ठ नागरिक होतील.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येपैकी १० टक्के म्हणजे १४ कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. सरकारला एका जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या गणनेसाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवायला हवा. केंद्र आणि राज्य सरकारने आपापल्या नागरिकांच्या कल्याणासाठी या रक्कमेत योगदान द्यावे.

नवी दिल्ली – देशातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वयोमर्यदा वाढवायला हवी अशी शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीने(EAC-PM) केली आहे. देशात निवृत्तीचं वय वाढवण्यासोबतच यूनिवर्सल पेन्शन योजना लागू करण्यात यावी असंही सल्लागार समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुचवलं आहे. देशातील वरिष्ठ नागरिकांना उत्तम सुविधा देण्याची शिफारस आर्थिक सल्लागार समितीने पंतप्रधानांना केली आहे.

जागतिक लोकसंख्या अंदाज २०१९ नुसार २०५० पर्यंत भारतात जवळफास ३२ कोटी ज्येष्ठ नागरिक होतील. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १९.५ टक्के ज्येष्ठ लोकांचा समावेश असेल. २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येपैकी १० टक्के म्हणजे १४ कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. या स्टडीत म्हटलंय की, सरकारला एका जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या गणनेसाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवायला हवा. त्यामुळे देशात सर्वसामान्यांच्या कमीत कमी वेतनातील निम्मी रक्कम पेन्शन म्हणून ज्येष्ठ नागरिकांना देता येईल.

पैसे कुठून येणार?

स्टडीत असंही म्हटलं आहे की, सरकारने ही पेन्शन रक्कम विना कुठल्याही योगदानाशिवाय दिली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारने आपापल्या नागरिकांच्या कल्याणासाठी या रक्कमेत योगदान द्यावे. सरकार पेन्शनसाठी निर्धारित रक्कमेच्या व्यवस्थेसाठी बजेटमध्ये कराची तरतूद करू शकते.

जनकल्याणासाठी इतर कार्य

कोरोना संकट पाहता सरकारने सर्व लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा, शिक्षण, पाणी आणि स्वच्छतेसारखी व्यवस्था करावी. त्यासोबत देशातील सर्व नागरिकांच्या पोषणाची व्यवस्था व्हायला हवी. स्टडीत सांगितलंय की, इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना आणि विधवा पेन्शन योजना यांची कार्यकक्षा वाढवायला हवी.

रिपोर्टनुसार प्रत्येक महिन्याला कमीत कमी २ हजार रुपये पेन्शन मिळायला हवी. तसेच ५० वर्षावरील कामगारांना स्किल डेवलपमेंट द्यायला हवं. केंद्र आणि राज्य सरकारने अशा कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी योजना आखायला हव्यात. यात असंघटीत क्षेत्र, दुर्गम भागात राहणारे, तसेच प्रवासांचाही समावेश करावा ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी साधन नाही. त्यामुळे लवकरच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. देशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यात यावं अशी शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मान्य केल्यास कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढू शकतं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी