शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Retirement Age: कर्मचारी निवृत्तीचं वय वाढवण्याची आर्थिक सल्लागार समितीची शिफारस; लाखो कर्मचाऱ्यांना फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 17:43 IST

Higher retirement age: जागतिक लोकसंख्या अंदाज २०१९ नुसार २०५० पर्यंत भारतात जवळफास ३२ कोटी ज्येष्ठ नागरिक होतील.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येपैकी १० टक्के म्हणजे १४ कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. सरकारला एका जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या गणनेसाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवायला हवा. केंद्र आणि राज्य सरकारने आपापल्या नागरिकांच्या कल्याणासाठी या रक्कमेत योगदान द्यावे.

नवी दिल्ली – देशातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वयोमर्यदा वाढवायला हवी अशी शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीने(EAC-PM) केली आहे. देशात निवृत्तीचं वय वाढवण्यासोबतच यूनिवर्सल पेन्शन योजना लागू करण्यात यावी असंही सल्लागार समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुचवलं आहे. देशातील वरिष्ठ नागरिकांना उत्तम सुविधा देण्याची शिफारस आर्थिक सल्लागार समितीने पंतप्रधानांना केली आहे.

जागतिक लोकसंख्या अंदाज २०१९ नुसार २०५० पर्यंत भारतात जवळफास ३२ कोटी ज्येष्ठ नागरिक होतील. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १९.५ टक्के ज्येष्ठ लोकांचा समावेश असेल. २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येपैकी १० टक्के म्हणजे १४ कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. या स्टडीत म्हटलंय की, सरकारला एका जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या गणनेसाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवायला हवा. त्यामुळे देशात सर्वसामान्यांच्या कमीत कमी वेतनातील निम्मी रक्कम पेन्शन म्हणून ज्येष्ठ नागरिकांना देता येईल.

पैसे कुठून येणार?

स्टडीत असंही म्हटलं आहे की, सरकारने ही पेन्शन रक्कम विना कुठल्याही योगदानाशिवाय दिली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारने आपापल्या नागरिकांच्या कल्याणासाठी या रक्कमेत योगदान द्यावे. सरकार पेन्शनसाठी निर्धारित रक्कमेच्या व्यवस्थेसाठी बजेटमध्ये कराची तरतूद करू शकते.

जनकल्याणासाठी इतर कार्य

कोरोना संकट पाहता सरकारने सर्व लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा, शिक्षण, पाणी आणि स्वच्छतेसारखी व्यवस्था करावी. त्यासोबत देशातील सर्व नागरिकांच्या पोषणाची व्यवस्था व्हायला हवी. स्टडीत सांगितलंय की, इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना आणि विधवा पेन्शन योजना यांची कार्यकक्षा वाढवायला हवी.

रिपोर्टनुसार प्रत्येक महिन्याला कमीत कमी २ हजार रुपये पेन्शन मिळायला हवी. तसेच ५० वर्षावरील कामगारांना स्किल डेवलपमेंट द्यायला हवं. केंद्र आणि राज्य सरकारने अशा कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी योजना आखायला हव्यात. यात असंघटीत क्षेत्र, दुर्गम भागात राहणारे, तसेच प्रवासांचाही समावेश करावा ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी साधन नाही. त्यामुळे लवकरच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. देशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यात यावं अशी शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मान्य केल्यास कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढू शकतं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी