शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

पृथ्वीवरील संकट आता आधीच कळणार; आदित्य मिशनचे इतर कोणते फायदे होतील?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 09:24 IST

सूर्यग्रहणादरम्यान सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्याची खूप मर्यादित संधी असते.

सूर्य मिशनचे जनक प्रोफेसर जगदेव सिंग

आदित्य मिशन का आवश्यक आहे? सूर्यग्रहणादरम्यान सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्याची खूप मर्यादित संधी असते. ती केवळ ५ ते ७ मिनिटे असते. आकाश ढगाळ असेल तर तो दुर्मिळ क्षणही आपल्या हातातून निसटतो. जर अवकाशात सौर वेधशाळा स्थापन झाली तर आपण सूर्याचा अधिक चांगल्याप्रकारे अभ्यास करू शकू.

कोणत्या प्रकारचा अभ्यास करू शकाल? व्हीएलसी या उपकरणामुळे दोन गोष्टी कळतील. प्रथम आपण पांढऱ्या प्रकाशाखाली प्रतिमा निर्माण करू शकतो. दुसरे म्हणजे, सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ५४०० अंश सेल्सिअस आहे आणि त्याच्या वातावरणाचे तापमान लाखो अंशांपर्यंत पोहोचते. सूर्याच्या चुंबकीय शक्तीचे ऊर्जेत रूपांतर होते, असे मानले जाते. ते कसे होते, याची अद्याप माहिती नाही. व्हीएलसीमुळे याचा शोध घेणे सोपे होणार आहे.

लॅग्रेज-१ कक्षा कशी आहे? लॅग्रेज-१ वर उपग्रह स्थिर असतो. त्यामुळे उपग्रहाचा इंधनाचा वापर कमी होतो. यामध्ये आदित्य १७८ दिवसांत एक फेरी पूर्ण करेल. पण सूर्य त्याच्यापासून दूर जाणार नाही. उपग्रहाचे आयुष्य ५ वर्षे आहे, तरी तो १० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकेल व भरपूर आकडे उपलब्ध होतील.

स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे का ?  अर्थात, प्रत्येकाने काम केले आहे. आकडे मिळण्याची वाट पाहतोय. विद्यार्थ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास करावा, अशी माझी इच्छा आहे.

मिशनचे इतर कोणते फायदे होतील? सौर वादळ एक-दोन दिवसात पृथ्वीवर पोहोचते. आपले उपकरण सूर्याचे अगदी जवळून निरीक्षण करू शकते. सौर वादळ उठताच त्याची गणना करून ते पृथ्वीवर कधी पोहोचेल, याचा अंदाज बांधता येईल. हवामानाच्या अंदाजाप्रमाणे, आम्ही सौर वादळांचाही अंदाज लावू शकतो. याच्या मदतीने घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा उपग्रह बंद करून त्यांना नुकसान होण्यापासून वाचविता येईल.

यावेळीही महिला शास्त्रज्ञाचा मोठा हातभार

आदित्य एल-१चे यशस्वी प्रक्षेपण होण्यात या प्रकल्पाच्या संचालक निगार शाजी यांचे मोठे योगदान आहे. इस्रोमध्ये गेली ३५ वर्षे सेवा बजावत असलेल्या निगार शाजी यांनी रिमोट सेन्सिंग, दळणवळण, आंतरग्रहीय उपग्रह मोहिमा यांच्या आखणीत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. निगार शाजी तामिळनाडूमधील तेनकासी येथील मूळ रहिवासी आहेत. भारताच्या तीन चंद्रयान मोहिमांचे नेतृत्व करणारे मयिलसामी अण्णादुराई, एम. वनिता, पी. वीरामुथूवेल हे तीनही शास्त्रज्ञ तेनकासीचेच मूळ रहिवासी आहेत. रिसोर्ससॅट-२ए या प्रकल्पाच्या त्या सहयोगी प्रकल्प संचालक होत्या. 

टॅग्स :Aditya L1आदित्य एल १isroइस्रो