शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Earthquake: 38 दिवसांत 10 वेळा भारत हादरला…कालचा भूंकप सर्वात शक्तिशाली; चिंतेची बाब ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 14:11 IST

Earthquake News : काल भारतात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले, यानंतर शेकडो-हजारो लोक घराबाहेर धावले.

Earthquake News : गेल्या महिन्यात टर्कीमध्ये भीषण भूकंप आला होता. त्या भूकंपात हजारो लोक मरण पावले आणि तेवढेच लोक जखमीही झाले. त्या भूकंपात इतका मोठा विनाश झाला की, देश पुन्हा उभा करायला काही वर्षे लागतील. दरम्यान, मंगळवारची रात्र भारतासह जगातील अनेक देशांसाठी दहशतीची ठरली. दिल्ली-एनसीआरसह भारतातील अनेक राज्यांमध्ये 6.6 रिश्टर स्केल भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील फैजाबादपासून 133 किमी आग्नेयेला होता. 

6.6 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे पाकिस्तानात एक इमारत कोसळली. यात 11 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जखमी झाले आहेत. पण आता भारतावरही मोठे संकट येणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, गेल्या 38 दिवसांत भारतात 10 वेळा भूकंपाचे झटके जाणवले आहेत. कालचा भूकंप या 38 दिवसांतील सर्वात शक्तिशाली होता. भूकंप तज्ञांच्या मते भारतात अनेक ठिकाणी भूकंपाचे क्षेत्र आहे. हे धोक्याचे क्षेत्र गुजरात, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, मणिपूर, नागालँड, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये आहेत.

गेल्या 38 दिवसांत कुठे-कुठे भूकंप झाला?12 फेब्रुवारी रोजी सिक्कीममधील मंगनमध्ये भूकंप आला होता. त्याची तीव्रता 4.0 होती.16 फेब्रुवारीला पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र बांगलादेशातील सिल्हेट येथे होते. तीव्रता 4.3 रिश्टर स्केल.22 फेब्रुवारीला पृथ्वी पुन्हा हादरली, त्याचे केंद्र नेपाळमधील जुमला येथे होते. तीव्रता 4.8रिश्टर स्केल.24 फेब्रुवारीला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र शेजारील देश पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होते. तीव्रता 4.12 मार्च रोजी नेपाळमधील लोबुज्या या पूर्वेकडील भागात भूकंपाचे धक्के जाणवले, भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. तीव्रता 4.03 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशात भूकंप झाला. तीव्रता 4.17 मार्च रोजी अंदमान आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के बसले. तीव्रता 4.98 मार्च रोजी पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पृथ्वी हादरली. तीव्रता 4.012 मार्च रोजी मणिपूरच्या वांगजिंगमध्ये भूकंप झाला. तीव्रता 4.8

भारतात 5 भूकंप झोन आहेत.झोन 1 - पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ओडिशाचा काही भाग.झोन 2 – तामिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि मध्य प्रदेशचे काही भाग.झोन 3 - केरळ, बिहार, पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम राजस्थान, पूर्व गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भाग.झोन 4 - मुंबई, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, पश्चिम गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार-नेपाळ सीमा क्षेत्रझोन 5- काश्मीर खोरे, पश्चिम हिमाचल, पूर्व उत्तराखंड, गुजरातचे कच्छ, उत्तर बिहार, सर्व ईशान्य राज्ये, अंदमान आणि निकोबार बेटे.

टॅग्स :Earthquakeभूकंपdelhiदिल्लीIndiaभारत