शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

आधी सरकारच हँग होत होतं, 2014 नंतर लोकांनी फोनच बदलला; PM मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 13:30 IST

मोदी म्हटले, जेव्हा आपण भविष्यासंदर्भात बोलतो, तेव्हा पुढील दशक किंवा शतकासंदर्भात भाष्य करतो. पण...

देशात 2014 नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. 10-12 वर्षांपूर्वी मोबाइल फोन वारंवार हँग होत होते. आपण कितीही बटन दाबा अथवा स्वॅप करा, ते हँगच रहायचे. अशीच स्थिती तेव्हाच्या सरकारचीही होती. तेव्हा अर्थव्यवास्था असो अथवा इतर कोणतेही क्षेत्र असो, नेहमी हँगच राहत होते. परिस्थिती एवढी बिकट झाली होती की, चार्ज करून आणि बॅटरी बदलूनही काही उपयोग होत नव्हता. शेवटी 2014 नंतर लोकांनी फोनच बदलून टाकला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता मागच्या यूपीए सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. 

राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे 7 व्या भारतीय मोबाईल काँग्रेस 2023 दरम्यान देशभरातील काही निवडक संस्थांमध्ये 100 नव्या 5G लॅबचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. भारतीय मोबाईल काँग्रेस हा आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि औद्योगिक विकास मंच आहे. दिल्लीतील प्रगती मैदानजवळी भारत मंडपम सभागृहात 27 ते 29 ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी म्हणाले, आता जग 'मेड इन इंडिया' फोनचा वापर करत आहे. 2014 तारीख नव्हे तर बदल आहे.मोदी म्हटले, जेव्हा आपण भविष्यासंदर्भात बोलतो, तेव्हा पुढील दशक किंवा शतकासंदर्भात भाष्य करतो. मात्र, टेक्नॉलॉजी विकासाच्या माध्यमातून आता ह्या गोष्टी काही दिवसांतच पूर्ण होतात. येणारा काळ निश्चितच वेगळा आहे, देशाची भावी पिढी देशाच्या टेक इंडस्ट्रीचे नेतृत्त्व करत आहे. जगभरातील देशांच्या तुलनेत भारतात 5 जी टेक्नॉलॉजीचा विस्तार गतीने होत आहे. तरीही आपण थांबलो नाहीत. याउलट 6 जी च्या क्षेत्रातही जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMobileमोबाइलcongressकाँग्रेस