शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आधी सरकारच हँग होत होतं, 2014 नंतर लोकांनी फोनच बदलला; PM मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 13:30 IST

मोदी म्हटले, जेव्हा आपण भविष्यासंदर्भात बोलतो, तेव्हा पुढील दशक किंवा शतकासंदर्भात भाष्य करतो. पण...

देशात 2014 नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. 10-12 वर्षांपूर्वी मोबाइल फोन वारंवार हँग होत होते. आपण कितीही बटन दाबा अथवा स्वॅप करा, ते हँगच रहायचे. अशीच स्थिती तेव्हाच्या सरकारचीही होती. तेव्हा अर्थव्यवास्था असो अथवा इतर कोणतेही क्षेत्र असो, नेहमी हँगच राहत होते. परिस्थिती एवढी बिकट झाली होती की, चार्ज करून आणि बॅटरी बदलूनही काही उपयोग होत नव्हता. शेवटी 2014 नंतर लोकांनी फोनच बदलून टाकला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता मागच्या यूपीए सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. 

राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे 7 व्या भारतीय मोबाईल काँग्रेस 2023 दरम्यान देशभरातील काही निवडक संस्थांमध्ये 100 नव्या 5G लॅबचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. भारतीय मोबाईल काँग्रेस हा आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि औद्योगिक विकास मंच आहे. दिल्लीतील प्रगती मैदानजवळी भारत मंडपम सभागृहात 27 ते 29 ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी म्हणाले, आता जग 'मेड इन इंडिया' फोनचा वापर करत आहे. 2014 तारीख नव्हे तर बदल आहे.मोदी म्हटले, जेव्हा आपण भविष्यासंदर्भात बोलतो, तेव्हा पुढील दशक किंवा शतकासंदर्भात भाष्य करतो. मात्र, टेक्नॉलॉजी विकासाच्या माध्यमातून आता ह्या गोष्टी काही दिवसांतच पूर्ण होतात. येणारा काळ निश्चितच वेगळा आहे, देशाची भावी पिढी देशाच्या टेक इंडस्ट्रीचे नेतृत्त्व करत आहे. जगभरातील देशांच्या तुलनेत भारतात 5 जी टेक्नॉलॉजीचा विस्तार गतीने होत आहे. तरीही आपण थांबलो नाहीत. याउलट 6 जी च्या क्षेत्रातही जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMobileमोबाइलcongressकाँग्रेस