शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आधी सरकारच हँग होत होतं, 2014 नंतर लोकांनी फोनच बदलला; PM मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 13:30 IST

मोदी म्हटले, जेव्हा आपण भविष्यासंदर्भात बोलतो, तेव्हा पुढील दशक किंवा शतकासंदर्भात भाष्य करतो. पण...

देशात 2014 नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. 10-12 वर्षांपूर्वी मोबाइल फोन वारंवार हँग होत होते. आपण कितीही बटन दाबा अथवा स्वॅप करा, ते हँगच रहायचे. अशीच स्थिती तेव्हाच्या सरकारचीही होती. तेव्हा अर्थव्यवास्था असो अथवा इतर कोणतेही क्षेत्र असो, नेहमी हँगच राहत होते. परिस्थिती एवढी बिकट झाली होती की, चार्ज करून आणि बॅटरी बदलूनही काही उपयोग होत नव्हता. शेवटी 2014 नंतर लोकांनी फोनच बदलून टाकला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता मागच्या यूपीए सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. 

राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे 7 व्या भारतीय मोबाईल काँग्रेस 2023 दरम्यान देशभरातील काही निवडक संस्थांमध्ये 100 नव्या 5G लॅबचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. भारतीय मोबाईल काँग्रेस हा आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि औद्योगिक विकास मंच आहे. दिल्लीतील प्रगती मैदानजवळी भारत मंडपम सभागृहात 27 ते 29 ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी म्हणाले, आता जग 'मेड इन इंडिया' फोनचा वापर करत आहे. 2014 तारीख नव्हे तर बदल आहे.मोदी म्हटले, जेव्हा आपण भविष्यासंदर्भात बोलतो, तेव्हा पुढील दशक किंवा शतकासंदर्भात भाष्य करतो. मात्र, टेक्नॉलॉजी विकासाच्या माध्यमातून आता ह्या गोष्टी काही दिवसांतच पूर्ण होतात. येणारा काळ निश्चितच वेगळा आहे, देशाची भावी पिढी देशाच्या टेक इंडस्ट्रीचे नेतृत्त्व करत आहे. जगभरातील देशांच्या तुलनेत भारतात 5 जी टेक्नॉलॉजीचा विस्तार गतीने होत आहे. तरीही आपण थांबलो नाहीत. याउलट 6 जी च्या क्षेत्रातही जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMobileमोबाइलcongressकाँग्रेस