शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भारतात जन्मानंतर केवळ 28 दिवसांमध्ये दगावतात 6 लाख मुले - युनिसेफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 16:37 IST

दरवर्षी भारतामध्ये जन्म झाल्यावर सुरुवातीच्या 28 दिवसांमध्येच दगावणाऱ्या बाळांची संख्या 6 लाख इतकी असल्याचे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली- दरवर्षी भारतामध्ये जन्म झाल्यावर सुरुवातीच्या 28 दिवसांमध्येच दगावणाऱ्या बाळांची संख्या 6 लाख इतकी असल्याचे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. बालमृत्यूबाबत युनिसेफने मंगळवारी अहवाल जाहीर केला. असे असले तरी गेल्या पाच वर्षांमध्ये भारतात बालमृत्यूंमध्ये घट झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगातील एकूण 184 देशांची आकडेवारी या अहवालातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारताचा या यादीमध्ये 31 वा क्रमांक आहे. भारतात अर्भक मृत्यूचे प्रमाण 25.4 (प्रति 1000 जन्म) असल्याचे त्यात म्हटले आहे.बाळाच्या जगण्याच्या दृष्टीने त्याच्या जन्मानंतरचे पहिले 28 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. पहिल्या महिन्याभरात बाळाचा मृत्यू होण्याची सर्वाधिक शक्यता असते. जगभराच्या सरासरीनुसार जन्मलेल्या प्रत्येक 1000 बाळांमागे 19 बालके दगावतात. संपूर्ण जगाचा विचार केल्यास 2016 साली जन्मल्यावर पहिल्याच आठवड्यात 26 लाख अर्भकांचा मृत्यू झाला. त्यातील 10 लाख बालके जन्माच्या पहिल्याच दिवशी दगावली तर जवळपास दहा लाख बालके जन्मल्यावर एका आठवड्याच्या कालावधीत दगावली. युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार, या बालकांचा मृत्यू विविध आजारांमुळे, अकाली जन्म, बाळंतपणाच्या वेळेस निर्माण होणार प्रश्न, संसर्ग अशा विविध कारणांमुळे झाला. 0 ते 5 वर्षे या कालावधीत होणाऱ्या मृत्यूमध्ये 1990-2015 या कालावधीत 66 टक्के घट झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सुधारलेल्या आरोग्य सेवा आणि राहणीमान यामुळे बालमृत्यूचे प्रमाण घटले आहे.