शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

'कोरोना काळात ७९ टक्के लोकांचे अन्नावाचून हाल; रेशन कार्ड असलेल्या ९० टक्के कुटुंबाना धान्यच नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 12:04 IST

हंगर वॉच सर्वेक्षणातून माहिती समोर; या कालावधीत अनेकांचे कर्जही थकले

नवी दिल्ली : कोरोना महामारीत अनेकांच्या जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यात अनेक जणांना पुरेसे अन्नही मिळत नव्हते, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. २०२१ मध्ये १४ राज्यांमध्ये तब्बल ७९ टक्के भारतीय कुटुंबांचे अन्नावाचून मोठे हाल झाले तर २५ टक्के कुटुंबांना अन्न मिळवताना अनेक यातना सहन कराव्या लागल्या, असे हंगर वॉच या सर्वेक्षणात समोर आले आहे. डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने विकसित केलेल्या जागतिक अन्न असुरक्षिततेच्या मानांकनानुसार हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये सहभागी झालेल्यांना आठ प्रश्न विचारण्यात आले. यात त्यांना पुरेसे अन्न नसल्याची चिंता होती का, पैसे किंवा इतर संसाधनांची कमतरता होती का किंवा पौष्टिक अन्न खाण्यास मिळाले का, असे प्रश्न विचारण्यात आले.यात सर्वेक्षण केलेल्यांपैकी ६० टक्केपेक्षा अधिक जणांना पुरेसे अन्न मिळाले नाही. त्यांना पौष्टिक अन्न खाण्यास मिळत नव्हते. ते फक्त काही अन्नपदार्थ खाऊन दिवस ढकलत होते. तर ४५ टक्के सहभागींनी कोरोनाकाळात त्यांच्या घरातील अन्न संपले होते तर ३३ टक्के लोकांच्या घरातील कोणीतरी रोज अर्धपोटी होते, असे म्हटले आहे.

सरकारी धान्य मिळालेच नाही

  • कोरोनामुळे जवळपास ४५ टक्के कुटुंबांचे कर्ज थकले असून, मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. तर २१ टक्केपेक्षा अधिक जणांकडे ५० हजार रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे. मात्र ते भरण्यास असमर्थ आहेत. 
  • रेशन कार्ड असलेल्या ९० टक्के कुटुंबांनी त्यांना धान्य मिळाले नसल्याचे सांगितले. तर २५ टक्के पात्र लोकांना मध्यान्ह भोजन योजना आणि एकात्मिक बालविकास सेवा कार्यक्रमाचा कोणताही लाभ मिळाला नाही. 
  • तर केवळ १३ टक्के जणांना पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

६,६९७ सर्वेक्षणात सहभागी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या १४ राज्यांत केलेल्या सर्वेक्षणात ६,६९७ जणांना सहभागी करून घेण्यात आले होते.

६०% कुटुंबांचे उत्पन्न घटलेकोरोनाच्या पूर्वी आहाराची जी पौष्टिक गुणवत्ता होती, ती कोरोनानंतर ४१% कुटुंबांची खालावली गेली. तर कोरोना साथीमुळे उत्पन्नामध्येही ६६ टक्क्यांनी घसरण झाली होती. तर सध्या ६०% कुटुंबांचे उत्पन्न निम्म्याने कमी झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्नunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ