शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अरेरे! विधींना उशीर होताच नवरा-नवरी भिडले; एकमेकांना मारत थेट लग्नच मोडले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 12:14 IST

लग्नाच्या विधींना उशीर झाल्यामुळे हार घालताना वधू-वरांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि दोघांनी एकमेकांना कानशिलात लगावली.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये लग्नाच्या विधींना उशीर झाल्यामुळे हार घालताना वधू-वरांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि दोघांनी एकमेकांना कानशिलात लगावली. हे प्रकरण पुढे इतकं वाढलं की नवरा-नवरीने लग्नाला थेट नकार दिला आणि लग्नाची वरात नवरीशिवायच परतली.

मेरठच्या दौराला पोलीस स्टेशन भागात ही घटना घडली आहे जिथे सोमवारी एका जोडप्याचा प्रेमविवाह होणार होता आणि लग्नादरम्यान वधू-वरांमध्ये बाचाबाची झाली. मेरठच्या दौराला पोलीस स्टेशन परिसरात राहणारी तरुणी दिल्लीतील एका खासगी कंपनीत काम करते आणि तरुणही तिच्यासोबत काम करतो.

काम करत असतानाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांच्याही घरच्यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी लग्न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. सोमवारी हा तरुण मोठ्या उत्साहात लग्नाची वरात घेऊन मेरठच्या दौराला भागात पोहोचला होता.

लग्नाच्या विधींना थोडा उशीर झाल्याचं सांगण्यात येत आहे, त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्यात आले असले तरी हार घालण्याच्या वेळी विधी होण्यास उशीर झाल्याने वधू-वरांचा राग अनावर झाला.

संतापलेल्या वधूने वराला कानशिलात लगावली, त्यानंतर वरानेही वधूला कानशिलात लगावली आणि प्रकरण चिघळलं. यानंतर पुढे दोघांनीही लग्नाला नकार दिला आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले. पोलिसांसमोर दोन्ही पक्षांनी लग्नाला नकार दिला.

लग्नासाठी खर्च केलेले पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन तडजोड झाली. याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला, त्यानंतर वधू-वरांनी लग्नास नकार दिला. दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल झालेली नाही. तक्रार आल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल. 

टॅग्स :marriageलग्न