शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

...'या' कारणांमुळे चीनला भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या एकत्र येण्यापासून धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 18:40 IST

मनिला येथे सुरु असलेल्या एशियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची बैठक होणार आहे.

ठळक मुद्देआपला आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करण्यासाठी हे चार देश एकत्र येत असल्याची चीनची भावना  आहे. या चार देशांच्या बैठकीमुळे प्रदेशामध्ये शांतता, विकास, सहकार्य आणि समृद्धी वाढेल अशी अपेक्षा आहे.

नवी दिल्ली - मनिला येथे सुरु असलेल्या एशियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची बैठक होणार आहे. या बैठकीमुळे चीन चिंतेत असून, संबंधित देशांनी सर्व समावेशकचा मार्ग अनुसरावा. कुठल्या तिस-या पक्षाला वगळू नये असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. चारही देशांच्या मैत्रीपूर्ण सहकार्याचे आम्ही स्वागत करतो पण तिस-या पक्षाला टार्गेट करु नये असे चीनने म्हटले आहे. 

आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करण्यासाठी हे चार देश एकत्र येत असल्याची चीनची भावना  आहे.  भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या बैठकीमुळे प्रदेशामध्ये शांतता, विकास, सहकार्य आणि समृद्धी वाढेल अशी अपेक्षा आहे. या बैठकीतून कुणाच्याही हिताला बाधा पोहोचणार नाही किंवा कुणाला लक्ष्य करणार नाही अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मागच्या आठवडयात व्यक्त केली होती. 

- राजकीय दृष्टीकोनातून पाहिल्यास चार देशांनी एकत्र येणे हा चीनसाठी एकप्रकारचा धोकाच आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे लोकशाही प्रधान देश आहे तर चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचीच सत्ता चालते. 

- हे चार देश लष्करी दृष्टया एकत्र आल्यास इंडो-पॅसिफिक प्रदेशात खेळाचे सर्व नियमच बदलून जातील. जगातील एकमेव सुपरपॉवर अमेरिका या देशांसोबत  आहे. 

- या चार देशांबरोबरच्या व्यावसायिक, व्यापारी संबंधांमध्ये चीनचा जास्त फायदा आहे. हे चारही देश एकत्रितपणे व्यापार संतुलन साधण्यासाठी चीनवर दबाव आणू शकतात. 

- हे चारही देश चीनच्या वन बेल्ट वन रोड धोरणासमोर आव्हान निर्माण करु शकतात. वन बेल्ट, वन रोड ही शी जिनपिंग यांचे महत्वकांक्षी योजना आहे.   

टॅग्स :chinaचीन