शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

...'या' कारणांमुळे चीनला भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या एकत्र येण्यापासून धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 18:40 IST

मनिला येथे सुरु असलेल्या एशियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची बैठक होणार आहे.

ठळक मुद्देआपला आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करण्यासाठी हे चार देश एकत्र येत असल्याची चीनची भावना  आहे. या चार देशांच्या बैठकीमुळे प्रदेशामध्ये शांतता, विकास, सहकार्य आणि समृद्धी वाढेल अशी अपेक्षा आहे.

नवी दिल्ली - मनिला येथे सुरु असलेल्या एशियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची बैठक होणार आहे. या बैठकीमुळे चीन चिंतेत असून, संबंधित देशांनी सर्व समावेशकचा मार्ग अनुसरावा. कुठल्या तिस-या पक्षाला वगळू नये असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. चारही देशांच्या मैत्रीपूर्ण सहकार्याचे आम्ही स्वागत करतो पण तिस-या पक्षाला टार्गेट करु नये असे चीनने म्हटले आहे. 

आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करण्यासाठी हे चार देश एकत्र येत असल्याची चीनची भावना  आहे.  भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या बैठकीमुळे प्रदेशामध्ये शांतता, विकास, सहकार्य आणि समृद्धी वाढेल अशी अपेक्षा आहे. या बैठकीतून कुणाच्याही हिताला बाधा पोहोचणार नाही किंवा कुणाला लक्ष्य करणार नाही अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मागच्या आठवडयात व्यक्त केली होती. 

- राजकीय दृष्टीकोनातून पाहिल्यास चार देशांनी एकत्र येणे हा चीनसाठी एकप्रकारचा धोकाच आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे लोकशाही प्रधान देश आहे तर चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचीच सत्ता चालते. 

- हे चार देश लष्करी दृष्टया एकत्र आल्यास इंडो-पॅसिफिक प्रदेशात खेळाचे सर्व नियमच बदलून जातील. जगातील एकमेव सुपरपॉवर अमेरिका या देशांसोबत  आहे. 

- या चार देशांबरोबरच्या व्यावसायिक, व्यापारी संबंधांमध्ये चीनचा जास्त फायदा आहे. हे चारही देश एकत्रितपणे व्यापार संतुलन साधण्यासाठी चीनवर दबाव आणू शकतात. 

- हे चारही देश चीनच्या वन बेल्ट वन रोड धोरणासमोर आव्हान निर्माण करु शकतात. वन बेल्ट, वन रोड ही शी जिनपिंग यांचे महत्वकांक्षी योजना आहे.   

टॅग्स :chinaचीन