शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे वेळापत्रक बदलले बातमीचा जोड

By admin | Updated: March 24, 2015 23:44 IST

या सर्व परिस्थितीने लाखो रुपयांचे मिळणारे उत्पन्न तर गेलेच; शिवाय द्राक्ष, डाळींब, कांदा या पिकांचा आता भरवसा नाही. ही पिके बेभरवशाची झाली आहेत. या पिकांऐवजी कोणते पीक घ्यावे हा शेतकर्‍यांपुढे गंभीर प्रश्न पडलेला दिसत आहे. गारपीट एवढी प्रचंड होती की, डाळींब, द्राक्ष या पिकाच्या झाडांच्या साली निघाल्या. गेल्या वर्षी बिलपुरी, सारदे, खामलोण, आसखेडा, पिंगळवाडे या प˜्यात गारपीट झाली होती. या गारपिटीची तीव्रता प्रचंड होती. डाळिंबाची झाडे या गारपिटीने पूर्णत: उद्ध्वस्त झाली. अजूनही ही झाडे फलधारणा करू शकत नाहीत. तेल्या रोगाचा डाळींब पिकाला प्रादुर्भाव नव्हता; मात्र गारपीट झाली व येथे तेल्या व मर रोगाने थैमान घातले. डाळींब पीकच या भागातून नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे.

या सर्व परिस्थितीने लाखो रुपयांचे मिळणारे उत्पन्न तर गेलेच; शिवाय द्राक्ष, डाळींब, कांदा या पिकांचा आता भरवसा नाही. ही पिके बेभरवशाची झाली आहेत. या पिकांऐवजी कोणते पीक घ्यावे हा शेतकर्‍यांपुढे गंभीर प्रश्न पडलेला दिसत आहे. गारपीट एवढी प्रचंड होती की, डाळींब, द्राक्ष या पिकाच्या झाडांच्या साली निघाल्या. गेल्या वर्षी बिलपुरी, सारदे, खामलोण, आसखेडा, पिंगळवाडे या प˜्यात गारपीट झाली होती. या गारपिटीची तीव्रता प्रचंड होती. डाळिंबाची झाडे या गारपिटीने पूर्णत: उद्ध्वस्त झाली. अजूनही ही झाडे फलधारणा करू शकत नाहीत. तेल्या रोगाचा डाळींब पिकाला प्रादुर्भाव नव्हता; मात्र गारपीट झाली व येथे तेल्या व मर रोगाने थैमान घातले. डाळींब पीकच या भागातून नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस होतो आहे. मोसम प˜्यात कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. उन्हाळ कांद्याची सध्या लागवड झालेली आहे. या कांद्यावर करपा रोगाने आक्रमण केले आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कांदा उत्पन्न तर घटतेच, त्याची टिकाऊ क्षमतासुद्धा घटते. या अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. या पावसाने गहू आडवा पडला आहे, तर हरबरा पिकावर घाटेअळीने आक्रमण करावयास सुरुवात केली आहे. याचा परिणाम हरबरा गळून पडायला सुरुवात झाली आहे. मुळात शेती व्यवसाय न परवडणारा झाला आहे. शेतीची मशागत वापरावयाची औषधे तर महागडी मजुरी यामुळे बर्‍याचशा शेतकर्‍यांना शेती परवडत नाही. कर्ज वाढत आहे. आत्महत्त्यांचे प्रमाण यामुळेच वाढले आहे. घरातली कर्ती मुले घरातून निघून जात आहेत. निसर्गाचा प्रकोप थांबत नाही. शेती व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.पूर्वी शेती व्यवसायाकडे टाकाऊ म्हणून बघितले जाई. बाजरी, ज्वारी, मठ, मूग, भुईमूग ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात. या पिकांपासून फारसे उत्पन्न मिळणे अशक्य होई. मात्र २00१ नंतर या भागात द्राक्ष, डाळींब शेती सुरू झाली आणि शेती व्यवसायात क्रांती घडली.