शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे वेळापत्रक बदलले बातमीचा जोड

By admin | Updated: March 24, 2015 23:44 IST

या सर्व परिस्थितीने लाखो रुपयांचे मिळणारे उत्पन्न तर गेलेच; शिवाय द्राक्ष, डाळींब, कांदा या पिकांचा आता भरवसा नाही. ही पिके बेभरवशाची झाली आहेत. या पिकांऐवजी कोणते पीक घ्यावे हा शेतकर्‍यांपुढे गंभीर प्रश्न पडलेला दिसत आहे. गारपीट एवढी प्रचंड होती की, डाळींब, द्राक्ष या पिकाच्या झाडांच्या साली निघाल्या. गेल्या वर्षी बिलपुरी, सारदे, खामलोण, आसखेडा, पिंगळवाडे या प˜्यात गारपीट झाली होती. या गारपिटीची तीव्रता प्रचंड होती. डाळिंबाची झाडे या गारपिटीने पूर्णत: उद्ध्वस्त झाली. अजूनही ही झाडे फलधारणा करू शकत नाहीत. तेल्या रोगाचा डाळींब पिकाला प्रादुर्भाव नव्हता; मात्र गारपीट झाली व येथे तेल्या व मर रोगाने थैमान घातले. डाळींब पीकच या भागातून नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे.

या सर्व परिस्थितीने लाखो रुपयांचे मिळणारे उत्पन्न तर गेलेच; शिवाय द्राक्ष, डाळींब, कांदा या पिकांचा आता भरवसा नाही. ही पिके बेभरवशाची झाली आहेत. या पिकांऐवजी कोणते पीक घ्यावे हा शेतकर्‍यांपुढे गंभीर प्रश्न पडलेला दिसत आहे. गारपीट एवढी प्रचंड होती की, डाळींब, द्राक्ष या पिकाच्या झाडांच्या साली निघाल्या. गेल्या वर्षी बिलपुरी, सारदे, खामलोण, आसखेडा, पिंगळवाडे या प˜्यात गारपीट झाली होती. या गारपिटीची तीव्रता प्रचंड होती. डाळिंबाची झाडे या गारपिटीने पूर्णत: उद्ध्वस्त झाली. अजूनही ही झाडे फलधारणा करू शकत नाहीत. तेल्या रोगाचा डाळींब पिकाला प्रादुर्भाव नव्हता; मात्र गारपीट झाली व येथे तेल्या व मर रोगाने थैमान घातले. डाळींब पीकच या भागातून नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस होतो आहे. मोसम प˜्यात कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. उन्हाळ कांद्याची सध्या लागवड झालेली आहे. या कांद्यावर करपा रोगाने आक्रमण केले आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कांदा उत्पन्न तर घटतेच, त्याची टिकाऊ क्षमतासुद्धा घटते. या अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. या पावसाने गहू आडवा पडला आहे, तर हरबरा पिकावर घाटेअळीने आक्रमण करावयास सुरुवात केली आहे. याचा परिणाम हरबरा गळून पडायला सुरुवात झाली आहे. मुळात शेती व्यवसाय न परवडणारा झाला आहे. शेतीची मशागत वापरावयाची औषधे तर महागडी मजुरी यामुळे बर्‍याचशा शेतकर्‍यांना शेती परवडत नाही. कर्ज वाढत आहे. आत्महत्त्यांचे प्रमाण यामुळेच वाढले आहे. घरातली कर्ती मुले घरातून निघून जात आहेत. निसर्गाचा प्रकोप थांबत नाही. शेती व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.पूर्वी शेती व्यवसायाकडे टाकाऊ म्हणून बघितले जाई. बाजरी, ज्वारी, मठ, मूग, भुईमूग ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात. या पिकांपासून फारसे उत्पन्न मिळणे अशक्य होई. मात्र २00१ नंतर या भागात द्राक्ष, डाळींब शेती सुरू झाली आणि शेती व्यवसायात क्रांती घडली.