शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

‘ती’च्या जिद्दीमुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून साकारत आहे उपवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 05:07 IST

देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराला मान मिळाला आहे.

- कुमार सिद्धार्थइंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराला मान मिळाला आहे. इंदूर नगरपालिकेच्या मॅराथॉन अभियानामुळे ४० वर्षापासून तयार झालेल्या कचºयाच्या टेकड्यांचे रूप अखेर पालटले आहे. केवळ चार महिन्यात १३ लाख टन दुर्गंधीयुक्त कचºयाचे मोठे ढिगारे आता हिरव्यागार उपवनात रुपांतरित होत असून हे स्थान ‘सिटी फॉरेस्ट’ म्हणून विकास पावत आहे. याचे श्रेय जाते ते शहराच्या महापौर मालिनी गौर यांच्या जिद्दीला. त्यांनीच हा संकल्प केला आणि तो पूर्णही करून दाखविला.इंदूर शहराच्या बायपास रोडवर देवगुराडिया क्षेत्रात जवळपास १५० एकरमध्ये पसरलेल्या टेचिंग ग्राऊंडवर गेल्या ४० वर्षापासून शहराचा कचरा जमा केला जात होता. दरवर्षी यामध्ये भर पडत तो तब्बल १३ लाख टन होऊन टेकडीचे रुप आले.देवगुराडियाच्या ट्रेचिंग ग्राऊंडवरील ही कचºयाची टेकडी हटविण्यासाठी मागील वर्षी आॅगस्टमध्ये एक निर्धार केला गेला. यासाठी १७ अर्थ मुव्हिंग मशीन भाड्याने आणली गेली आणि आठ-आठ महिन्याच्या शिफ्टमध्ये १५०-१५० मजुरांच्या मदतीने सतत चार महिने अभियान चालविण्यात आले. मशीन्सच्या मदतीने ट्रेंचिंग ग्राऊंडमध्ये साठलेला कचरा पसरविण्यात आला आणि त्यातील हानीकारक तत्त्व नष्ट व्हावे या दृष्टीने त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या १३ लाख टन कचºयातून जवळपास ४ लाख टन प्लास्टिक वेगळे काढण्यात आले. प्लास्टिकसह, गत्ता, चामडे, धातूंचे तुकडे वेगळे करुन भंगारवाल्यांना विकण्यात आले.कचºयाची टेकडी हटताच जवळपास १०० एकर जमीन रिकामी झाली. या जमिनीला समतल करून ९० एकर भूमीवर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. कचºयाची समस्या सोडविण्यासाठी नियोजित रूपाने सुरू केलेल्या कामामुळे कचºयाची टेकडी आज छोट्या हिरव्यागार उपवनात रुपांतरित होत आहे.>दिल्लीसह अनेक महानगरांमध्ये समस्यादेशाची राजधानी दिल्लीतच गाजीपूरसह विविध भागात कचºयाच्या टेकड्या निर्माण झाल्या आहेत. गाजीपूर येथील कचºयाची टेकडी ६५ मीटर उंच वाढली असून आणखी ८ मीटर वाढली तर कुतूबमीनारच्या उंचीपर्यंत पोहचेल. दुसरीकडे पंजाबमध्ये गेल्या १० वर्षाच्या प्रयत्नानंतरही कचºयाचे ढिगारे नष्ट करणे शक्य झाले नाही. या ढिगाºयामुळे भूजलही प्रदूषित झाले आहे.