शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

आपल्याच गडावर लाल बावटा पुरता संकोचला, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचीही दंडेलशाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:40 IST

एकेकाळी केरळप्रमाणे डाव्यांचा गड म्हणून ओळख जपलेल्या पश्चिम बंगालच्या यंदाच्या निवडणुकीत डावे जणू अडगळीत गेल्यासारखेच दिसत आहेत.

- किरण अग्रवालकोलकाता - एकेकाळी केरळप्रमाणे डाव्यांचा गड म्हणून ओळख जपलेल्या पश्चिम बंगालच्या यंदाच्या निवडणुकीत डावे जणू अडगळीत गेल्यासारखेच दिसत आहेत. सध्या तिथे ममतादीदी व नरेंद्र मोदी यांचाच बोलबाला असल्याने आपल्याच गडावर लाल बावटा संकोचला आहे.या राज्यात सात टप्प्यात मतदान होत आहे. आतापर्यंत चार टप्प्यात १८ जागांसाठी मतदान झाले. पुढच्या तीन टप्प्यात २४ जागी निवडणूक होईल. पहिल्या चार टप्प्यात जागोजागी गोंधळ, हाणामाऱ्या झाल्या. असनसोलमध्ये केंद्रातील विद्यमान मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या वाहनाची तृणमूल कार्यकर्त्यांकडून नासधूस केल्याचा आरोप झाला. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. चौथ्या टप्प्यात इथे तब्बल ७६.४४ टक्के नोंदविला गेला. या राज्यात पूर्वी सत्ता राखताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जे प्रकार अवलंबिले तेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक ते तृणमूल काँग्रेसने अंगीकारलेले दिसतात. सध्या माकपचे २ तर तृणमूलचे ३४ खासदार आहेत.पाचव्या टप्प्यात ८ जागांसाठी मतदान आहे. यासाठी ८३ उमेदवार रिंगणात आहेत. पैकी २३ उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून, १८ जणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.देशात मिलावटचे म्हणजे अनेक पक्षांचे सरकार आले तर आठवड्यात प्रत्येक दिवशी एका पक्षाचा पंतप्रधान असेल, त्यात सुट्टीच्या दिवशी फारसे काम नसते त्यामुळे रविवारी ममतांचा नंबर लागेल, अशी खिल्ली भाजप नेते मुकुल राय यांनी उडविली आहे.आरोप-प्रत्यारोपांच्या जुमलेबाजीत विकास गहाणराज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा स्पर्धक म्हणून भाजपकडे पाहिले जाते. डावे पक्ष सातत्याने मागे पडत आहेत. ममता बॅनर्जी मोदी यांचे केंद्रातील सरकार उखडून फेकण्याचा प्रचार करतात तर मोदी यांनी बंगालमधील घुसखोरी व कूप्रशासनावर हल्लाबोल करतात. विकासाच्या मुद्द्यांऐवजी आरोप-प्रत्यारोपांची जुमलेबाजी सुरू आहे.- अजय विद्यार्थी(वरिष्ठ पत्रकार), कोलकाताविकासाची चर्चा पडली मागेमाकप व काँग्रेसची अवस्था गेल्या २०१४ च्या निवडणुकीपेक्षाही यंदा बिकट आहे. भाजप पर्याय म्हणून पुढे आल्याने त्याला मतदान वाढू शकते. पण तरीही तृणमूल काँग्रेसच्याच जागा अधिक असतील. काही ठिकाणी मतदारांना मतदानापासून रोखल्याचे आरोप होत आहेत. तृणमूलचा मोदी हटाववर भर आहे. विकासाची चर्चा होताना दिसत नाही.- के. निर्मल(व्यावसायिक), कोलकाता 

टॅग्स :Communist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक