शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याच गडावर लाल बावटा पुरता संकोचला, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचीही दंडेलशाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:40 IST

एकेकाळी केरळप्रमाणे डाव्यांचा गड म्हणून ओळख जपलेल्या पश्चिम बंगालच्या यंदाच्या निवडणुकीत डावे जणू अडगळीत गेल्यासारखेच दिसत आहेत.

- किरण अग्रवालकोलकाता - एकेकाळी केरळप्रमाणे डाव्यांचा गड म्हणून ओळख जपलेल्या पश्चिम बंगालच्या यंदाच्या निवडणुकीत डावे जणू अडगळीत गेल्यासारखेच दिसत आहेत. सध्या तिथे ममतादीदी व नरेंद्र मोदी यांचाच बोलबाला असल्याने आपल्याच गडावर लाल बावटा संकोचला आहे.या राज्यात सात टप्प्यात मतदान होत आहे. आतापर्यंत चार टप्प्यात १८ जागांसाठी मतदान झाले. पुढच्या तीन टप्प्यात २४ जागी निवडणूक होईल. पहिल्या चार टप्प्यात जागोजागी गोंधळ, हाणामाऱ्या झाल्या. असनसोलमध्ये केंद्रातील विद्यमान मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या वाहनाची तृणमूल कार्यकर्त्यांकडून नासधूस केल्याचा आरोप झाला. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. चौथ्या टप्प्यात इथे तब्बल ७६.४४ टक्के नोंदविला गेला. या राज्यात पूर्वी सत्ता राखताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जे प्रकार अवलंबिले तेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक ते तृणमूल काँग्रेसने अंगीकारलेले दिसतात. सध्या माकपचे २ तर तृणमूलचे ३४ खासदार आहेत.पाचव्या टप्प्यात ८ जागांसाठी मतदान आहे. यासाठी ८३ उमेदवार रिंगणात आहेत. पैकी २३ उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून, १८ जणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.देशात मिलावटचे म्हणजे अनेक पक्षांचे सरकार आले तर आठवड्यात प्रत्येक दिवशी एका पक्षाचा पंतप्रधान असेल, त्यात सुट्टीच्या दिवशी फारसे काम नसते त्यामुळे रविवारी ममतांचा नंबर लागेल, अशी खिल्ली भाजप नेते मुकुल राय यांनी उडविली आहे.आरोप-प्रत्यारोपांच्या जुमलेबाजीत विकास गहाणराज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा स्पर्धक म्हणून भाजपकडे पाहिले जाते. डावे पक्ष सातत्याने मागे पडत आहेत. ममता बॅनर्जी मोदी यांचे केंद्रातील सरकार उखडून फेकण्याचा प्रचार करतात तर मोदी यांनी बंगालमधील घुसखोरी व कूप्रशासनावर हल्लाबोल करतात. विकासाच्या मुद्द्यांऐवजी आरोप-प्रत्यारोपांची जुमलेबाजी सुरू आहे.- अजय विद्यार्थी(वरिष्ठ पत्रकार), कोलकाताविकासाची चर्चा पडली मागेमाकप व काँग्रेसची अवस्था गेल्या २०१४ च्या निवडणुकीपेक्षाही यंदा बिकट आहे. भाजप पर्याय म्हणून पुढे आल्याने त्याला मतदान वाढू शकते. पण तरीही तृणमूल काँग्रेसच्याच जागा अधिक असतील. काही ठिकाणी मतदारांना मतदानापासून रोखल्याचे आरोप होत आहेत. तृणमूलचा मोदी हटाववर भर आहे. विकासाची चर्चा होताना दिसत नाही.- के. निर्मल(व्यावसायिक), कोलकाता 

टॅग्स :Communist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक