शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

८१(क)च्या नोटीसांमुळे गाळेधारकांमध्ये असंतोष पत्रपरिषद : मनपा व्यापारी संकुल गाळेधारक संघटनेचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

By admin | Updated: February 27, 2016 00:21 IST

जळगाव- गाळेधारकांनी लिलावाच्या ठरावाविरोधात काढलेल्या मोर्चाप्रकरणी १५ मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे आश्वासन सत्ताधार्‍यांनी तसेच प्रशासनाने दिले होते. मात्र ते आश्वासन मोडून गाळेधारकांना बिलांचे वाटप करून बिल घरप˜ीत लागू करण्यासाठीच्या ८१(क)च्या नोटीसांचे वाटपही सुरू झाले आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये असंतोषाची भावना असून रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनपा व्यापारी संकुल गाळेधारक संघटनेने पत्रपरिषदेत दिला.

जळगाव- गाळेधारकांनी लिलावाच्या ठरावाविरोधात काढलेल्या मोर्चाप्रकरणी १५ मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे आश्वासन सत्ताधार्‍यांनी तसेच प्रशासनाने दिले होते. मात्र ते आश्वासन मोडून गाळेधारकांना बिलांचे वाटप करून बिल घरप˜ीत लागू करण्यासाठीच्या ८१(क)च्या नोटीसांचे वाटपही सुरू झाले आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये असंतोषाची भावना असून रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनपा व्यापारी संकुल गाळेधारक संघटनेने पत्रपरिषदेत दिला.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास मनपा आयुक्त व सत्ताधारी जबाबदार राहतील, असेही संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी बजावले. यावेळी सचिव युवराज वाघ, राजस कोतवाल, संजय पाटील, तेजस देपुरा उपस्थित होते.
कलम ७९(ड)बाबत दुटप्पीपणा
कलम ७९(ड) नुसार मनपा १४ मार्केटचा लिलाव करण्याच्या तयारीत आहे. परंतु ७९(ड) मध्ये लिलावाचा उल्लेखच नाही. याच ७९(ड) नुसार मनपानेच २००५ मध्ये जुने शाहू मार्केट, रेल्वे स्टेशन चौक मार्केट, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान मार्केटला नवीन करार करून दिला आहे. वास्तविक १ वर्ष आधीच मुदत संपली असूनही मनपाने त्यावेळी आजच्यासारखा पाच पट दंड, अवास्तव भाडेवाढ व लिलावाचा अघोरी निर्णय न घेता मनपाने बी ॲण्ड सी च्या दरानुसार आकारणी करून नवीन करार व मुदतवाढ करून दिली होती. मग आता त्याच धर्तीवर नवीन करार का करून मिळत नाही? की मनपाने आधी केलेले सवर ठराव, करार, मुदतवाढ बेकायदेशिर होते का? मनपा जाणीवपूर्वक गाळेधारकांना उध्वस्थ करू इच्छित आहे का? असा सवाल केला.
२७ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या गाळे लिलावाच्या ठरावाची प्रत माहिती अधिकारात मागणी करूनही दिली जात नसल्याचे सांगितले.
...तर कायदा,सुव्यवस्था धोक्यात
जर गाळेधारकांना न्याय दिला नाही तर रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन करू. गाळेधारकांना गाळ्यातून कोण बाहेर काढतो? ते पाहू. प्रसंगी विधानभवनासमोर उपोषण करू. पंतप्रधानांकडे व मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येस परवानगी देण्याची मागणी केलीच आहे. न्याय न मिळाल्यास तोच पर्याय अवलंबवावा लागेल, असा इशाराही दिला.