शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

८१(क)च्या नोटीसांमुळे गाळेधारकांमध्ये असंतोष पत्रपरिषद : मनपा व्यापारी संकुल गाळेधारक संघटनेचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

By admin | Updated: February 27, 2016 00:21 IST

जळगाव- गाळेधारकांनी लिलावाच्या ठरावाविरोधात काढलेल्या मोर्चाप्रकरणी १५ मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे आश्वासन सत्ताधार्‍यांनी तसेच प्रशासनाने दिले होते. मात्र ते आश्वासन मोडून गाळेधारकांना बिलांचे वाटप करून बिल घरप˜ीत लागू करण्यासाठीच्या ८१(क)च्या नोटीसांचे वाटपही सुरू झाले आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये असंतोषाची भावना असून रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनपा व्यापारी संकुल गाळेधारक संघटनेने पत्रपरिषदेत दिला.

जळगाव- गाळेधारकांनी लिलावाच्या ठरावाविरोधात काढलेल्या मोर्चाप्रकरणी १५ मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे आश्वासन सत्ताधार्‍यांनी तसेच प्रशासनाने दिले होते. मात्र ते आश्वासन मोडून गाळेधारकांना बिलांचे वाटप करून बिल घरप˜ीत लागू करण्यासाठीच्या ८१(क)च्या नोटीसांचे वाटपही सुरू झाले आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये असंतोषाची भावना असून रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनपा व्यापारी संकुल गाळेधारक संघटनेने पत्रपरिषदेत दिला.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास मनपा आयुक्त व सत्ताधारी जबाबदार राहतील, असेही संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी बजावले. यावेळी सचिव युवराज वाघ, राजस कोतवाल, संजय पाटील, तेजस देपुरा उपस्थित होते.
कलम ७९(ड)बाबत दुटप्पीपणा
कलम ७९(ड) नुसार मनपा १४ मार्केटचा लिलाव करण्याच्या तयारीत आहे. परंतु ७९(ड) मध्ये लिलावाचा उल्लेखच नाही. याच ७९(ड) नुसार मनपानेच २००५ मध्ये जुने शाहू मार्केट, रेल्वे स्टेशन चौक मार्केट, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान मार्केटला नवीन करार करून दिला आहे. वास्तविक १ वर्ष आधीच मुदत संपली असूनही मनपाने त्यावेळी आजच्यासारखा पाच पट दंड, अवास्तव भाडेवाढ व लिलावाचा अघोरी निर्णय न घेता मनपाने बी ॲण्ड सी च्या दरानुसार आकारणी करून नवीन करार व मुदतवाढ करून दिली होती. मग आता त्याच धर्तीवर नवीन करार का करून मिळत नाही? की मनपाने आधी केलेले सवर ठराव, करार, मुदतवाढ बेकायदेशिर होते का? मनपा जाणीवपूर्वक गाळेधारकांना उध्वस्थ करू इच्छित आहे का? असा सवाल केला.
२७ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या गाळे लिलावाच्या ठरावाची प्रत माहिती अधिकारात मागणी करूनही दिली जात नसल्याचे सांगितले.
...तर कायदा,सुव्यवस्था धोक्यात
जर गाळेधारकांना न्याय दिला नाही तर रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन करू. गाळेधारकांना गाळ्यातून कोण बाहेर काढतो? ते पाहू. प्रसंगी विधानभवनासमोर उपोषण करू. पंतप्रधानांकडे व मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येस परवानगी देण्याची मागणी केलीच आहे. न्याय न मिळाल्यास तोच पर्याय अवलंबवावा लागेल, असा इशाराही दिला.