शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये उपासमारीमुळे लहान मुलीचा झाला मृत्यू , दुकानाने दिला धान्य देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:50 IST

आधारच्या सक्तीमुळे झारखंडमध्ये एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. सिमडेगा जिल्ह्यातील एका रेशन दुकानाने रेशन कार्ड आधारला लिंक न केल्यामुळे कुटुंबाला धान्य नाकारले.

रांची : आधारच्या सक्तीमुळे झारखंडमध्ये एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. सिमडेगा जिल्ह्यातील एका रेशन दुकानाने रेशन कार्ड आधारला लिंक न केल्यामुळे कुटुंबाला धान्य नाकारले. त्यामुळे त्या मुलीसकट तिच्या घरातील सर्वांना काही दिवस उपाशी राहावे लागले आणि ती मुलगी ठरली भूकबळी.हा २८ सप्टेंबर रोजी घडलेला प्रकार स्वयंसेवी संस्थेमुळे उघडकीस आल्यावर, स्थानिक प्रशासनाने सुरुवातीला असे काही झालेच नाही, असा दावा केला, पण पुरावे समोर आल्यानंतर झारखंडचे अन्न व नागरी पुरवठामंत्री सरयू राय स्थानिक अधिकाºयांवर खापर फोडले. मात्र, या प्रकारामुळे राज्यातील वातावरण तापू लागल्याने, मुख्यमंत्री रघुबर दास यांनीही चौकशी करून २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.रेशन दुकानातून धान्य न मिळाल्याने संपूर्ण कुटुंबच काही दिवस उपाशी होते. संतोषी कुमारी ही ११ वर्षांची मुलगी शेवटच्या क्षणापर्यंत मला काहीतरी खायला द्या, अशी विनवणी करीत होती, पण घरात धान्य नसल्याने तिला काहीच खायला मिळाले नाही आणि ती उपासमारीने मरण पावली. तिची आई कोयलीदेवी म्हणाली की, मी रेशनच्या दुकानावर तांदूळ आणायला गेले होते. मात्र, रेशन कार्ड आधारला न जोडल्याने तुम्हाला रेशन मिळणार नाही, असे दुकानदाराने सांगितले. दिवसभर काहीच खायला न मिळाल्याने संतोषीचे पोट खूप दुखत होते. तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. २४ तासांहून अधिक काळ ती उपाशी होती आणि मला भात खायला द्या, असे ती सांगत होती. तसे म्हणतच तिने जीव सोडला. (वृत्तसंस्था)कारवाई व्हायलाच हवीहा प्रकार उघडकीस येताच, सरकारवर सर्व बाजूंनी टीका सुरू झाली आहे. अन्न व नागरीपुरवठामंत्री सरयू राय म्हणाले की, आधार कार्ड नसले, तरी लोकांना रेशन द्या, असे स्पष्ट आदेश आपण यापूर्वीच दिले होते. संबंधितांची ओळख पटवून त्यांना धान्य द्या, अशा सूचना आहेत.रेशन कार्ड आधारशी न जोडल्याने अडवणूक झाली असेल, मुलीचा मृत्यू झाला असेल, तर संबंधितांविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी. सरकारने काही महिन्यांपूर्वी रेशन दुकानांमधून आधार कार्ड व ठशांच्या आधारे सर्व रेशन कार्डधारकांना धान्य देण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डDeathमृत्यूIndiaभारत