शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

झारखंडमध्ये उपासमारीमुळे लहान मुलीचा झाला मृत्यू , दुकानाने दिला धान्य देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:50 IST

आधारच्या सक्तीमुळे झारखंडमध्ये एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. सिमडेगा जिल्ह्यातील एका रेशन दुकानाने रेशन कार्ड आधारला लिंक न केल्यामुळे कुटुंबाला धान्य नाकारले.

रांची : आधारच्या सक्तीमुळे झारखंडमध्ये एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. सिमडेगा जिल्ह्यातील एका रेशन दुकानाने रेशन कार्ड आधारला लिंक न केल्यामुळे कुटुंबाला धान्य नाकारले. त्यामुळे त्या मुलीसकट तिच्या घरातील सर्वांना काही दिवस उपाशी राहावे लागले आणि ती मुलगी ठरली भूकबळी.हा २८ सप्टेंबर रोजी घडलेला प्रकार स्वयंसेवी संस्थेमुळे उघडकीस आल्यावर, स्थानिक प्रशासनाने सुरुवातीला असे काही झालेच नाही, असा दावा केला, पण पुरावे समोर आल्यानंतर झारखंडचे अन्न व नागरी पुरवठामंत्री सरयू राय स्थानिक अधिकाºयांवर खापर फोडले. मात्र, या प्रकारामुळे राज्यातील वातावरण तापू लागल्याने, मुख्यमंत्री रघुबर दास यांनीही चौकशी करून २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.रेशन दुकानातून धान्य न मिळाल्याने संपूर्ण कुटुंबच काही दिवस उपाशी होते. संतोषी कुमारी ही ११ वर्षांची मुलगी शेवटच्या क्षणापर्यंत मला काहीतरी खायला द्या, अशी विनवणी करीत होती, पण घरात धान्य नसल्याने तिला काहीच खायला मिळाले नाही आणि ती उपासमारीने मरण पावली. तिची आई कोयलीदेवी म्हणाली की, मी रेशनच्या दुकानावर तांदूळ आणायला गेले होते. मात्र, रेशन कार्ड आधारला न जोडल्याने तुम्हाला रेशन मिळणार नाही, असे दुकानदाराने सांगितले. दिवसभर काहीच खायला न मिळाल्याने संतोषीचे पोट खूप दुखत होते. तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. २४ तासांहून अधिक काळ ती उपाशी होती आणि मला भात खायला द्या, असे ती सांगत होती. तसे म्हणतच तिने जीव सोडला. (वृत्तसंस्था)कारवाई व्हायलाच हवीहा प्रकार उघडकीस येताच, सरकारवर सर्व बाजूंनी टीका सुरू झाली आहे. अन्न व नागरीपुरवठामंत्री सरयू राय म्हणाले की, आधार कार्ड नसले, तरी लोकांना रेशन द्या, असे स्पष्ट आदेश आपण यापूर्वीच दिले होते. संबंधितांची ओळख पटवून त्यांना धान्य द्या, अशा सूचना आहेत.रेशन कार्ड आधारशी न जोडल्याने अडवणूक झाली असेल, मुलीचा मृत्यू झाला असेल, तर संबंधितांविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी. सरकारने काही महिन्यांपूर्वी रेशन दुकानांमधून आधार कार्ड व ठशांच्या आधारे सर्व रेशन कार्डधारकांना धान्य देण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डDeathमृत्यूIndiaभारत