शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये उपासमारीमुळे लहान मुलीचा झाला मृत्यू , दुकानाने दिला धान्य देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:50 IST

आधारच्या सक्तीमुळे झारखंडमध्ये एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. सिमडेगा जिल्ह्यातील एका रेशन दुकानाने रेशन कार्ड आधारला लिंक न केल्यामुळे कुटुंबाला धान्य नाकारले.

रांची : आधारच्या सक्तीमुळे झारखंडमध्ये एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. सिमडेगा जिल्ह्यातील एका रेशन दुकानाने रेशन कार्ड आधारला लिंक न केल्यामुळे कुटुंबाला धान्य नाकारले. त्यामुळे त्या मुलीसकट तिच्या घरातील सर्वांना काही दिवस उपाशी राहावे लागले आणि ती मुलगी ठरली भूकबळी.हा २८ सप्टेंबर रोजी घडलेला प्रकार स्वयंसेवी संस्थेमुळे उघडकीस आल्यावर, स्थानिक प्रशासनाने सुरुवातीला असे काही झालेच नाही, असा दावा केला, पण पुरावे समोर आल्यानंतर झारखंडचे अन्न व नागरी पुरवठामंत्री सरयू राय स्थानिक अधिकाºयांवर खापर फोडले. मात्र, या प्रकारामुळे राज्यातील वातावरण तापू लागल्याने, मुख्यमंत्री रघुबर दास यांनीही चौकशी करून २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.रेशन दुकानातून धान्य न मिळाल्याने संपूर्ण कुटुंबच काही दिवस उपाशी होते. संतोषी कुमारी ही ११ वर्षांची मुलगी शेवटच्या क्षणापर्यंत मला काहीतरी खायला द्या, अशी विनवणी करीत होती, पण घरात धान्य नसल्याने तिला काहीच खायला मिळाले नाही आणि ती उपासमारीने मरण पावली. तिची आई कोयलीदेवी म्हणाली की, मी रेशनच्या दुकानावर तांदूळ आणायला गेले होते. मात्र, रेशन कार्ड आधारला न जोडल्याने तुम्हाला रेशन मिळणार नाही, असे दुकानदाराने सांगितले. दिवसभर काहीच खायला न मिळाल्याने संतोषीचे पोट खूप दुखत होते. तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. २४ तासांहून अधिक काळ ती उपाशी होती आणि मला भात खायला द्या, असे ती सांगत होती. तसे म्हणतच तिने जीव सोडला. (वृत्तसंस्था)कारवाई व्हायलाच हवीहा प्रकार उघडकीस येताच, सरकारवर सर्व बाजूंनी टीका सुरू झाली आहे. अन्न व नागरीपुरवठामंत्री सरयू राय म्हणाले की, आधार कार्ड नसले, तरी लोकांना रेशन द्या, असे स्पष्ट आदेश आपण यापूर्वीच दिले होते. संबंधितांची ओळख पटवून त्यांना धान्य द्या, अशा सूचना आहेत.रेशन कार्ड आधारशी न जोडल्याने अडवणूक झाली असेल, मुलीचा मृत्यू झाला असेल, तर संबंधितांविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी. सरकारने काही महिन्यांपूर्वी रेशन दुकानांमधून आधार कार्ड व ठशांच्या आधारे सर्व रेशन कार्डधारकांना धान्य देण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डDeathमृत्यूIndiaभारत