शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

रस्त्यांच्या कामात उशीर होत असल्याने भारताला 1.4 लाख कोटींचं नुकसान

By admin | Updated: June 8, 2016 13:35 IST

खराब रस्ते, त्यामुळे ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि इंधनाचा अतिरिक्त वापर याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे

ऑनलाइन लोकमत  
नवी दिल्ली, दि, 08 - खराब रस्ते, त्यामुळे ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि इंधनाचा अतिरिक्त वापर याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. भारताला यामुळे वर्षाला 1.4 लाख कोटींचं नुकसान होत आहे. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑप इंडिया आणि आयआयएम-कोलकाताने संयुक्तरित्या केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.
 
भारताला होत असलेल्या आर्थिक नुकसानात इंधनाचा अतिरिक्त वापर सर्वात महत्वाचं कारण असल्याचं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. 
 
इंधन खर्च 97 हजार कोटींपर्यंत 
अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार खराब रस्त्यांमुळे होणारा उशीर यामुळे वर्षाला अंदाजे 6.6 अरब डॉलरचं नुकसान होतं. तर इंधनाच्या अतिरिक्त वापराचा खर्च वर्षाला 14.7 अरब डॉलर होत आहे. भारतामध्ये वाहतुकीसाठी साधने मर्यादित आहेत. त्यामुळे सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी रस्त्याचा किंवा रेल्वेचा अधिक वापर केला जातो. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे देशातील महत्वाच्या 28 मार्गावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध केल्याचं गडकरींनी सांगितलं आहे. 
 
वाहूतक करण्यासाठी हवाई आणि पाणीमार्गाचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करण्यात येतो. रस्ते वाहतूक खात्रीची तसंच कार्यक्षम असल्याने अनेकजण रस्त्याने प्रवास करणे पसंत करतात. रस्त्याने प्रवास केल्याने ठरल्या वेळेत पोहोचता येतं. मात्र रेल्वेमध्ये बिघडलेलं वेळापत्र, अपुरी सेवा, सामान ठेवण्यासाठी डब्यांमध्ये नसलेली जागा यामुळे रेल्वेने प्रवास करणं टाळलं जात असं अभ्यासात दिसून आलं आहे. 
 
गेल्या तीन वर्षात 2011-12शी तुलना करता दिल्ली - बंगळुरु आणि दिल्ली - मुंबई मार्गावत वाहतूक दरापेक्षा वाहतूक खर्चच जास्त वाढल्याचं निदर्शनात आलं आहे.