शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

जिल्ह्यातील रब्बीलाही दुष्काळाचा शाप

By admin | Updated: February 3, 2016 00:29 IST

चिंता वाढली : जत, आटपाडीमधील १०४ रब्बी गावे दुष्काळाच्या छायेत

सांगली : खरीप हंगामात ३६३ गावे टंचाईग्रस्त झाल्यानंतर, आता यंदाच्या रब्बी हंगामालाही दुष्काळाचा शाप लागला आहे. जिल्ह्यातील रब्बी पिकांची तब्बल १0४ गावे दुष्काळाच्या छायेत आहेत. या गावांची सुधारित पैसेवारी ५0 पेक्षा कमी असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला प्रत्येक हंगामात फटका बसत आहे. शेकडो गावांमधील रब्बी, खरीप हंगाम वाया जाताना, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळत आहे. निसर्गाच्या दुष्ट चक्रात सापडलेल्या या गावांना आता शासनभरोसेच राहावे लागणार आहे. कायम दुष्काळी तालुक्यांबरोबरच सधन तालुक्यांमध्येही कमी पावसाचा फटका बसला आहे. तरीही जत आणि आटपाडी तालुक्यातील दुष्काळाचे चटके सर्वाधिक आहेत. सर्वेक्षणात पन्नासपेक्षा कमी पैसेवारी आढळलेल्या १0४ गावांचे अंतिम सर्वेक्षण ३१ मार्चला होऊन त्यांच्यावर दुष्काळी म्हणून शिक्का बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या हंगामात खरीप पिकांची ३६३ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली. त्यांच्यापाठोपाठ रब्बीची १०४ गावे त्याच वाटेवर आहेत. पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने पाणी टंचाईचे सावट वाढत चालले आहे. रब्बी हंगामही हातातून गेला आहे. रब्बी पिके वाचण्याची शक्यता मावळली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यात रब्बी पिकांची जी गावे आहेत, तेथील रब्बी पिकांची सुधारित पैसेवारी काढण्यात आली. यापूर्वी १५ डिसेंबरला केलेल्या सर्वेक्षणात ८० गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी होती. आता यामध्ये आणखी २४ गावांची भर पडली आहे. (प्रतिनिधी) ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणारी तालुकानिहाय गावे जत : जत, अमृतवाडी, बिळूर, देवनाळ, मेंढेगिरी, उमराणी, खोजनवाडी, कुडणूर, शेगाव, निगडी खुर्द, बागलवाडी, वळसंग, व्हसपेठ, काराजनगी, मायथळ, घोलेश्वर, कुणीकोणूर, संख, खंडनाळ, गोंधळेवाडी, तिकोंडी, करेवाडी (ति.), पारधेवस्ती, कोंत्येवबोबलाद, कोणबगी, मोटेवाडी (को.), अंकलगी, कुलालवाडी, आसंगीतुर्क, कागनरी, मोटेवाडी (आ.), धुळकरवाडी, मोरबगी, जालिहाळ (बु.), दरीबडची, लमाणतांडा (द.ब.), करजगी, सुसलाद, बेळोंडगी, सोनलगी, माणिकनाळ, आक्कळवाडी, उमदी, बोर्गी (खु.), विठ्ठलवाडी, गुलगुंजनाळ, बालगाव, हळ््ळी, उटगी, निगडी (बु.), लमाणतांडा, उटगी, गिरगाव, लवंगा, बेवनूर, रेवनाळ, अचकनहळ््ळी, कासलिंंगवाडी, कुंभारी, मुचंडी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, शेड्याळ, रावळगुंडवाडी, उंटवाडी, सोरडी, दरिकोणूर, गुड्डापूर, आसंगी. आटपाडी : आटपाडी, पुजारवाडी (आ.), भिंंगेवाडी, मापटेमळा, देशमुखवाडी, माडगुळे, य.पा.वाडी, खांजोडवाडी, लेंगरेवाडी, मासाळवाडी, पिंंपरी खुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी, शेटफळे, पात्रेवाडी, तडवळे, बनपुरी, करगणी, गोमेवाडी, दिघंची, उंबरगाव, पुजारवाडी-दि, पांढरेवाडी-दि, राजेवाडी, लिंंगीवरे, विठलापूर, कौठुळी, शेरेवाडी, निंंबवडे, वाक्षेवाडी, आवळाई, पिसेवाडी, पळसखेल, गळवेवाडी.