शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

२६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांशी निडरपणे लढले; कोरोनामुळे माजी NSG प्रमुख जे. के दत्तांना मृत्यूने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 11:39 IST

Jyoti Krishan Dutt IPS ,former DG NSG passed away: दत्त यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा नोएडा येथे राहतो.

नवी दिल्ली – २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवणी आजही लोकांसमोर ताज्या आहेत. या लढाईत राष्ट्रीय सुरक्षा दल(NSG)चं नेतृत्व करणारे माजी प्रमुख जे.के दत्त यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांचे निधन झाल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. गेल्या १४ एप्रिलपासून ते गुडगांवच्या मेदान्ता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.

दत्त यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा नोएडा येथे राहतो. तर मुलगी अमेरिकेत स्थायिक आहे. सीआरपीएफचे एडीजी जुल्फिकार हसन म्हणाले की, जे के दत्त असे अधिकारी होते ज्यांनी कॅडर आणि केद्रीय प्रतिनियुक्तीवर उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. नेहमीच त्यांनी पुढं येऊन नेतृत्व केले होते. NSG नं ट्विट केलंय की, श्री ज्योतिकृष्ण दत्त यांचे गुरुग्रामच्या हॉस्पिटलमध्ये १९ मे रोजी निधन झालं. जे के दत्त यांनी देशासाठी दिलेलं योगदान नेहमीच आठवणीत ठेवलं जाईल. त्यांच्या नेतृत्वात ब्लॅक कमांडोंनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी नेतृत्व केले होते हे कधीच विसरता येणार नाही असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

कोण होते जे. के दत्त?

जे. के दत्त हे पश्चिम बंगाल कॅडरमधील १९७१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी सीबीआय आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदावर कार्य केले आहे. ८ ऑगस्ट रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटमध्ये नियुक्ती समितीने त्यांच्या नावाला मंजूरी दिली होती. दिल्लीच्या विश्वविद्यापीठातून जे. के दत्त यांनी इतिहासातून पोस्ट ग्रॅज्यूएशेन केले आहे.

देशभरात साडेचार हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू!

देशात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे; परंतु मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४ हजार ५२९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारताचा कोरोना मृत्यूदर १.११% नोंदवण्यात आला आहे. दोन दिवसातच जवळपास ८ हजार ८५८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दररोज ५ हजारांवर रुग्णांचा मृत्यू होईल असे तज्ज्ञांकडून भाकीत वर्तवण्यात आले होते. ते खरे ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ५२५, तामिळनाडू ३६४, दिल्लीत २३५, उत्तर प्रदेशात २५५ रुग्णांचा मृत्यू झाला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला