शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांशी निडरपणे लढले; कोरोनामुळे माजी NSG प्रमुख जे. के दत्तांना मृत्यूने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 11:39 IST

Jyoti Krishan Dutt IPS ,former DG NSG passed away: दत्त यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा नोएडा येथे राहतो.

नवी दिल्ली – २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवणी आजही लोकांसमोर ताज्या आहेत. या लढाईत राष्ट्रीय सुरक्षा दल(NSG)चं नेतृत्व करणारे माजी प्रमुख जे.के दत्त यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांचे निधन झाल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. गेल्या १४ एप्रिलपासून ते गुडगांवच्या मेदान्ता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.

दत्त यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा नोएडा येथे राहतो. तर मुलगी अमेरिकेत स्थायिक आहे. सीआरपीएफचे एडीजी जुल्फिकार हसन म्हणाले की, जे के दत्त असे अधिकारी होते ज्यांनी कॅडर आणि केद्रीय प्रतिनियुक्तीवर उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. नेहमीच त्यांनी पुढं येऊन नेतृत्व केले होते. NSG नं ट्विट केलंय की, श्री ज्योतिकृष्ण दत्त यांचे गुरुग्रामच्या हॉस्पिटलमध्ये १९ मे रोजी निधन झालं. जे के दत्त यांनी देशासाठी दिलेलं योगदान नेहमीच आठवणीत ठेवलं जाईल. त्यांच्या नेतृत्वात ब्लॅक कमांडोंनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी नेतृत्व केले होते हे कधीच विसरता येणार नाही असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

कोण होते जे. के दत्त?

जे. के दत्त हे पश्चिम बंगाल कॅडरमधील १९७१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी सीबीआय आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदावर कार्य केले आहे. ८ ऑगस्ट रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटमध्ये नियुक्ती समितीने त्यांच्या नावाला मंजूरी दिली होती. दिल्लीच्या विश्वविद्यापीठातून जे. के दत्त यांनी इतिहासातून पोस्ट ग्रॅज्यूएशेन केले आहे.

देशभरात साडेचार हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू!

देशात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे; परंतु मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४ हजार ५२९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारताचा कोरोना मृत्यूदर १.११% नोंदवण्यात आला आहे. दोन दिवसातच जवळपास ८ हजार ८५८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दररोज ५ हजारांवर रुग्णांचा मृत्यू होईल असे तज्ज्ञांकडून भाकीत वर्तवण्यात आले होते. ते खरे ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ५२५, तामिळनाडू ३६४, दिल्लीत २३५, उत्तर प्रदेशात २५५ रुग्णांचा मृत्यू झाला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला