शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

२६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांशी निडरपणे लढले; कोरोनामुळे माजी NSG प्रमुख जे. के दत्तांना मृत्यूने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 11:39 IST

Jyoti Krishan Dutt IPS ,former DG NSG passed away: दत्त यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा नोएडा येथे राहतो.

नवी दिल्ली – २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवणी आजही लोकांसमोर ताज्या आहेत. या लढाईत राष्ट्रीय सुरक्षा दल(NSG)चं नेतृत्व करणारे माजी प्रमुख जे.के दत्त यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांचे निधन झाल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. गेल्या १४ एप्रिलपासून ते गुडगांवच्या मेदान्ता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.

दत्त यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा नोएडा येथे राहतो. तर मुलगी अमेरिकेत स्थायिक आहे. सीआरपीएफचे एडीजी जुल्फिकार हसन म्हणाले की, जे के दत्त असे अधिकारी होते ज्यांनी कॅडर आणि केद्रीय प्रतिनियुक्तीवर उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. नेहमीच त्यांनी पुढं येऊन नेतृत्व केले होते. NSG नं ट्विट केलंय की, श्री ज्योतिकृष्ण दत्त यांचे गुरुग्रामच्या हॉस्पिटलमध्ये १९ मे रोजी निधन झालं. जे के दत्त यांनी देशासाठी दिलेलं योगदान नेहमीच आठवणीत ठेवलं जाईल. त्यांच्या नेतृत्वात ब्लॅक कमांडोंनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी नेतृत्व केले होते हे कधीच विसरता येणार नाही असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

कोण होते जे. के दत्त?

जे. के दत्त हे पश्चिम बंगाल कॅडरमधील १९७१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी सीबीआय आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदावर कार्य केले आहे. ८ ऑगस्ट रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटमध्ये नियुक्ती समितीने त्यांच्या नावाला मंजूरी दिली होती. दिल्लीच्या विश्वविद्यापीठातून जे. के दत्त यांनी इतिहासातून पोस्ट ग्रॅज्यूएशेन केले आहे.

देशभरात साडेचार हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू!

देशात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे; परंतु मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४ हजार ५२९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारताचा कोरोना मृत्यूदर १.११% नोंदवण्यात आला आहे. दोन दिवसातच जवळपास ८ हजार ८५८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दररोज ५ हजारांवर रुग्णांचा मृत्यू होईल असे तज्ज्ञांकडून भाकीत वर्तवण्यात आले होते. ते खरे ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ५२५, तामिळनाडू ३६४, दिल्लीत २३५, उत्तर प्रदेशात २५५ रुग्णांचा मृत्यू झाला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला