शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रदूषण वाढतंय, आयुष्य घटतंय; वायू प्रदूषणामुळे 2.6 वर्षांनी कमी झालं भारतीयांचं वयोमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 16:28 IST

दक्षिण आशियातील देशांमधील परिस्थिती चिंताजनक

नवी दिल्ली: वायू प्रदूषणामुळे भारतीयांच्या वयोमानात 2.6 वर्षांनी घट झाल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. जगाच्या तुलनेत आशियातील वायू प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याची गंभीर बाब अहवालात नमूद करण्यात आली आहे. वायू प्रदूषण आणि त्यामुळे होणारे गंभीर आजार यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हरन्मेंट (सीएसई) संस्थेनं तयार केलेल्या अहवालात जगातील वाढत्या प्रदूषणाचा धोका अधोरेखित करण्यात आला आहे. घरातील आणि घराबाहेरील प्रदूषणामुळे गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. 'भारतीय नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या कारणांचा विचार केल्यास त्यात वायू प्रदूषण तिसऱ्या क्रमांकावर आहे. वाढतं शहरीकरण, ओझोनचं नुकसान आणि घरगुती प्रदूषण यांमुळे मानवी जीवाला असलेला धोका वाढत आहे,' अशी माहिती अहवालात आहे. दक्षिण आशियातील देशांमध्ये वायू प्रदूषणाचं प्रमाण चिंताजनक असल्याचं अहवाल सांगतो. या देशातील माणसांचं आयुष्य 2.6 वर्षांनी कमी झालं आहे. जागतिक स्तरावरील आकडेवारीचा विचार केल्यास हे प्रमाण जास्त आहे. वायू प्रदूषणामुळे जगातील लोकांचं आयुष्य 1.8 वर्षांनी कमी झालं आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची गरज अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.  

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण