शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

DGHS ची औषध विक्रेत्यांना तंबी; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अँटीबायोटिक्सची विक्री नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 17:43 IST

आरोग्य सेवा महानिदेशक डॉ. अतुल गोयल यांनी १ जानेवारी रोजी लिहिलेली तीन पत्र उपलब्ध आहेत

नवी दिल्ली - भारतात अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविक औषधांचा दुरुपयोग थांबविण्यासाठी केंद्र सरकारने डॉक्टरांसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या औषधांचे प्रिस्कीप्शन देताना ‘स्पष्टपणे संकेत’ लिहिणे बंधनकार असल्याचं म्हटलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवा महानिदेशालयाने (DGHS) यासंबंधित एक आवाहन केले असून देशातील सर्वच मेडिकल कॉलेज, मेडिकल असोसिएशन्स आणि फार्मासिस्ट असोसिएशन्सच्या डॉक्टरांसाठी पत्र जारी केले आहे.

आरोग्य सेवा महानिदेशक डॉ. अतुल गोयल यांनी १ जानेवारी रोजी लिहिलेली तीन पत्र उपलब्ध आहेत. त्यामध्ये, डीजीएचएसने फार्मासिस्ट (दवाखानों) संघद्वारे ‘फक्त प्रसिद्ध आणि अभ्यासू डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच’ अँटीबायोटिक्स देण्याचे सूचवले आहे. तसेच, इतरत्र ठिकाणी ‘अँटीबायोटिक्सची विक्री बंद करण्याचेही’ त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन नोटमध्ये रुग्णांत आढळून आलेल्या लक्षणाचे वर्णन स्पष्टपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या रुग्णांसाठी अँटीबायोटीक्स किंवा रोगाणुरोधी औषधांचे प्रिस्क्रीप्शन लिहिण्यात आले आहे. या औषधांचा दुरुपयोग आणि जास्त प्रमाणातील वापर रोखण्यासाठी त्यांच्या वापराचे स्पष्ट कारण किंवा गरज मेन्शन करणं आवश्यक असणार आहे. 

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओच्या म्हणण्यानुसार, अँटीबायोटीक्स औषधांच्या अतिरिक्त वापरावर अंकुश ठेवण्याच्या अनुषंगाने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. जास्त अँटीबायोटीक्स औषधांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते. मानवी शरीरात उद्भवणाऱ्या सर्वात मोठ्या १० आजारांपैकी एक कारण ह्या औषधांचा वापर असल्याचंही डब्लूएचओने म्हटले आहे. 

टॅग्स :medicineऔषधंdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय