शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रे टाका, मुख्य प्रवाहात या, अन्यथा कठोर कारवाई; अमित शाह यांचा नक्षलवाद्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 05:39 IST

शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी सरकारची

जगदलपूर : शस्त्रं सोडून मुख्य प्रवाहात सामील व्हा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी नक्षलवाद्यांना इशारा दिला. शरण गेलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

छत्तीसगडच्या जगदलपूर येथील कार्यक्रमात ते म्हणाले की, मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त होईल. मी नक्षलवाद्यांना आवाहन करतो, कृपया पुढे या. शस्त्र सोडा, शरण या आणि मुख्य प्रवाहात या. तुमचे पुनर्वसन ही आमची जबाबदारी आहे. तुम्ही शरण येऊन मुख्य प्रवाहात आलात तर तुम्ही छत्तीसगड आणि भारताच्या विकासासाठी योगदान द्याल.

बस्तरमधील नक्षलवाद संपला, तर येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे काश्मीरपेक्षा अधिक पर्यटक या भागाकडे आकर्षित होतील. बस्तरच्या विकासाची नवी गाथा यामुळे लिहिली जाईल आणि नक्षलवादाच्या पूर्ण निर्मूलनाचा मजबूत पाया तयार होईल, असेही शाह म्हणाले. 

नक्षलवादाचा नायनाट सुरू : शाह म्हणाले की, छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या काळात माओवाद्यांविरुद्धची कारवाई मंदावली होती. पण, आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षभरात २८७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले, ९९२ जणांना अटक करण्यात आली आणि ८३६ जण शरण आले. मोदी सरकारच्या काळात सुरक्षा दलातील मृत्यू ७३ टक्क्यांनी, तर नागरिकांच्या मृत्यूत ७० टक्क्यांची घट झाली आहे.

 

टॅग्स :Amit Shahअमित शाह