शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

देशात पुरेशी रोगप्रतिकारशक्ती; तिसऱ्या लाटेचा प्रभाव राहील कमी: डॉ. रणदीप गुलेरिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 05:56 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हादरला होता. ही लाट अद्याप ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हादरला होता. ही लाट अद्याप ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली. मात्र, तिसरी लाट तेवढी धोकादायक राहणार नसून देशात नागरिकांमध्ये या महामारीविरोधात पुरेशी रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे मत ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.  

दुसऱ्या लाटेत दररोज लाखोंच्या संख्येने नव्या रुग्णांची नोंद होत होती. हजारो रुग्णांचे दररोज मृत्यू होत होते.  आरोग्यव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत होती. अशा परिस्थितीतच तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली. मात्र, डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाने दिलासा दिला आहे. ते म्हणाले की, विषाणूमध्ये कसे बदल होतील, याबाबत ठामपणे सांगता येत नाही. मात्र, विषाणूमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता कमी आहे. तसेच देशातील बहुतांश नागरिकांमध्ये विषाणूविरोधात रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे ‘सिरो’ सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे तिसरी लाट तेवढी प्रभावी राहणार नाही, असे मत डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केले.

तिसरी लाट राेखू शकताे

- मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण होईपर्यंत गर्दी तसेच अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे.

- कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. तिसरी लाट पसरण्यापासून सध्यातरी आपण रोखू शकतो, असे गुलेरिया म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAIIMS hospitalएम्स रुग्णालय