शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशात पुरेशी रोगप्रतिकारशक्ती; तिसऱ्या लाटेचा प्रभाव राहील कमी: डॉ. रणदीप गुलेरिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 05:56 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हादरला होता. ही लाट अद्याप ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हादरला होता. ही लाट अद्याप ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली. मात्र, तिसरी लाट तेवढी धोकादायक राहणार नसून देशात नागरिकांमध्ये या महामारीविरोधात पुरेशी रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे मत ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.  

दुसऱ्या लाटेत दररोज लाखोंच्या संख्येने नव्या रुग्णांची नोंद होत होती. हजारो रुग्णांचे दररोज मृत्यू होत होते.  आरोग्यव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत होती. अशा परिस्थितीतच तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली. मात्र, डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाने दिलासा दिला आहे. ते म्हणाले की, विषाणूमध्ये कसे बदल होतील, याबाबत ठामपणे सांगता येत नाही. मात्र, विषाणूमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता कमी आहे. तसेच देशातील बहुतांश नागरिकांमध्ये विषाणूविरोधात रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे ‘सिरो’ सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे तिसरी लाट तेवढी प्रभावी राहणार नाही, असे मत डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केले.

तिसरी लाट राेखू शकताे

- मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण होईपर्यंत गर्दी तसेच अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे.

- कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. तिसरी लाट पसरण्यापासून सध्यातरी आपण रोखू शकतो, असे गुलेरिया म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAIIMS hospitalएम्स रुग्णालय