शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. राजेंद्र प्रसाद घेत निम्मेच वेतन

By admin | Updated: January 9, 2017 01:36 IST

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. १९५७ मध्ये त्यांची या पदावर फेरनिवड झाली. हे पद १२ वर्षे भूषविणारे ते एकमेव नेते आहेत. इतिहासातील सर्वात आदरणीय नेत्यांत त्यांचा समावेश होतो, असे म्हणणे गैर नाही. राजकीय वाद आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याच्या आजच्या काळात त्यांच्याकडून निश्चितपणे चांगला धडा घेऊ शकतो. ते आधी भारतीय आणि नंतर राजकारणी होते. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी वैयक्तिक कर्मचाऱ्यांचा ताफा कमी केला. त्यांच्याकडे केवळ एकच कर्मचारी होता. डॉ. प्रसाद सर्व कामे स्वत: करीत. त्यांनी तीन वर्षे तुरुंगवास सोसला. या काळात कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा आपण तुरुंगात असल्यापेक्षा नातीच्या पायाला खरचटल्याची त्यांना अधिक काळजी वाटत होती. त्यांच्या एकाही नातवाला ते मोठे राजकीय नेते आहेत याची कल्पना नव्हती. त्यांच्या पत्नी राजवंशी देवी यांनी नातवांना ते तुमचे आजोबा आहेत एवढेच सांगितले होते. ते कुटुंबवत्सल होते. नातवे शाळेतून परतल्यानंतर ते त्यांच्यासोबत जेवण घेत.  राष्ट्रपती म्हणून निम्मेच वेतन स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हा राष्ट्रपतींना दरमहा दहा हजार रुपये वेतन होते. राष्ट्रपती पदावर असल्यामुळे त्यांना अनेक भेटवस्तू देऊ केल्या जात; मात्र ते भेटवस्तू स्वीकारण्यास विनम्रपणे नकार देऊन त्या परत करीत. त्यांना भौतिक लाभात रस नव्हता. तथापि, भारत भेटीवर आलेल्या विविध परदेशी गणमान्यांची स्वाक्षरी आणि त्यांच्याकडून मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा त्यांनी संग्रह केला. त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित होते, तसेच कार खरेदी करण्याइतपत त्यांची ऐपत होती. त्यांनी  कार घेतलीही; परंतु कार घेण्याएवढे राष्ट्रपतींचे वेतन नसल्याकडे काही नेत्यांनी लक्ष वेधल्यानंतर त्यांनी कार परत केली. राष्ट्रपती असताना आपल्या एकाही नातीच्या विवाहात त्यांनी भेटवस्तू स्वीकारल्या नाहीत. कुटुंबातील मुलींच्या लग्नात तिला साडी देण्याची परंपरा आहे; मात्र दुसऱ्या कोणीतरी ती घेऊन देण्याऐवजी किंवा नवी घेण्याऐवजी प्रसाद तिच्यासाठी स्वत: साडी विणत. कार्यकाळ संपत असताना त्यांनी आपले वेतन  आणखी २५ टक्क्यांनी कमी केले. दरमहा ते केवळ अडीच हजार रुपये घेत. निवृत्तीनंतर ते आजारी पडले तेव्हा शहरात राहून चांगले उपचार घेण्याऐवजी ते बिहारमधील सदाकत आश्रमात परतले.तुम्हाला येथे चांगले उपचार मिळतील, असे सांगितल्यानंतर ‘मै जहाँसे दिल्ली आया हू, वहीं फिर वापस जाऊंगा’, असे ते म्हणत.