शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

डॉ. राजेंद्र प्रसाद घेत निम्मेच वेतन

By admin | Updated: January 9, 2017 01:36 IST

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. १९५७ मध्ये त्यांची या पदावर फेरनिवड झाली. हे पद १२ वर्षे भूषविणारे ते एकमेव नेते आहेत. इतिहासातील सर्वात आदरणीय नेत्यांत त्यांचा समावेश होतो, असे म्हणणे गैर नाही. राजकीय वाद आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याच्या आजच्या काळात त्यांच्याकडून निश्चितपणे चांगला धडा घेऊ शकतो. ते आधी भारतीय आणि नंतर राजकारणी होते. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी वैयक्तिक कर्मचाऱ्यांचा ताफा कमी केला. त्यांच्याकडे केवळ एकच कर्मचारी होता. डॉ. प्रसाद सर्व कामे स्वत: करीत. त्यांनी तीन वर्षे तुरुंगवास सोसला. या काळात कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा आपण तुरुंगात असल्यापेक्षा नातीच्या पायाला खरचटल्याची त्यांना अधिक काळजी वाटत होती. त्यांच्या एकाही नातवाला ते मोठे राजकीय नेते आहेत याची कल्पना नव्हती. त्यांच्या पत्नी राजवंशी देवी यांनी नातवांना ते तुमचे आजोबा आहेत एवढेच सांगितले होते. ते कुटुंबवत्सल होते. नातवे शाळेतून परतल्यानंतर ते त्यांच्यासोबत जेवण घेत.  राष्ट्रपती म्हणून निम्मेच वेतन स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हा राष्ट्रपतींना दरमहा दहा हजार रुपये वेतन होते. राष्ट्रपती पदावर असल्यामुळे त्यांना अनेक भेटवस्तू देऊ केल्या जात; मात्र ते भेटवस्तू स्वीकारण्यास विनम्रपणे नकार देऊन त्या परत करीत. त्यांना भौतिक लाभात रस नव्हता. तथापि, भारत भेटीवर आलेल्या विविध परदेशी गणमान्यांची स्वाक्षरी आणि त्यांच्याकडून मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा त्यांनी संग्रह केला. त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित होते, तसेच कार खरेदी करण्याइतपत त्यांची ऐपत होती. त्यांनी  कार घेतलीही; परंतु कार घेण्याएवढे राष्ट्रपतींचे वेतन नसल्याकडे काही नेत्यांनी लक्ष वेधल्यानंतर त्यांनी कार परत केली. राष्ट्रपती असताना आपल्या एकाही नातीच्या विवाहात त्यांनी भेटवस्तू स्वीकारल्या नाहीत. कुटुंबातील मुलींच्या लग्नात तिला साडी देण्याची परंपरा आहे; मात्र दुसऱ्या कोणीतरी ती घेऊन देण्याऐवजी किंवा नवी घेण्याऐवजी प्रसाद तिच्यासाठी स्वत: साडी विणत. कार्यकाळ संपत असताना त्यांनी आपले वेतन  आणखी २५ टक्क्यांनी कमी केले. दरमहा ते केवळ अडीच हजार रुपये घेत. निवृत्तीनंतर ते आजारी पडले तेव्हा शहरात राहून चांगले उपचार घेण्याऐवजी ते बिहारमधील सदाकत आश्रमात परतले.तुम्हाला येथे चांगले उपचार मिळतील, असे सांगितल्यानंतर ‘मै जहाँसे दिल्ली आया हू, वहीं फिर वापस जाऊंगा’, असे ते म्हणत.