शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

डॉ. राजेंद्र प्रसाद घेत निम्मेच वेतन

By admin | Updated: January 9, 2017 01:36 IST

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. १९५७ मध्ये त्यांची या पदावर फेरनिवड झाली. हे पद १२ वर्षे भूषविणारे ते एकमेव नेते आहेत. इतिहासातील सर्वात आदरणीय नेत्यांत त्यांचा समावेश होतो, असे म्हणणे गैर नाही. राजकीय वाद आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याच्या आजच्या काळात त्यांच्याकडून निश्चितपणे चांगला धडा घेऊ शकतो. ते आधी भारतीय आणि नंतर राजकारणी होते. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी वैयक्तिक कर्मचाऱ्यांचा ताफा कमी केला. त्यांच्याकडे केवळ एकच कर्मचारी होता. डॉ. प्रसाद सर्व कामे स्वत: करीत. त्यांनी तीन वर्षे तुरुंगवास सोसला. या काळात कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा आपण तुरुंगात असल्यापेक्षा नातीच्या पायाला खरचटल्याची त्यांना अधिक काळजी वाटत होती. त्यांच्या एकाही नातवाला ते मोठे राजकीय नेते आहेत याची कल्पना नव्हती. त्यांच्या पत्नी राजवंशी देवी यांनी नातवांना ते तुमचे आजोबा आहेत एवढेच सांगितले होते. ते कुटुंबवत्सल होते. नातवे शाळेतून परतल्यानंतर ते त्यांच्यासोबत जेवण घेत.  राष्ट्रपती म्हणून निम्मेच वेतन स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हा राष्ट्रपतींना दरमहा दहा हजार रुपये वेतन होते. राष्ट्रपती पदावर असल्यामुळे त्यांना अनेक भेटवस्तू देऊ केल्या जात; मात्र ते भेटवस्तू स्वीकारण्यास विनम्रपणे नकार देऊन त्या परत करीत. त्यांना भौतिक लाभात रस नव्हता. तथापि, भारत भेटीवर आलेल्या विविध परदेशी गणमान्यांची स्वाक्षरी आणि त्यांच्याकडून मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा त्यांनी संग्रह केला. त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित होते, तसेच कार खरेदी करण्याइतपत त्यांची ऐपत होती. त्यांनी  कार घेतलीही; परंतु कार घेण्याएवढे राष्ट्रपतींचे वेतन नसल्याकडे काही नेत्यांनी लक्ष वेधल्यानंतर त्यांनी कार परत केली. राष्ट्रपती असताना आपल्या एकाही नातीच्या विवाहात त्यांनी भेटवस्तू स्वीकारल्या नाहीत. कुटुंबातील मुलींच्या लग्नात तिला साडी देण्याची परंपरा आहे; मात्र दुसऱ्या कोणीतरी ती घेऊन देण्याऐवजी किंवा नवी घेण्याऐवजी प्रसाद तिच्यासाठी स्वत: साडी विणत. कार्यकाळ संपत असताना त्यांनी आपले वेतन  आणखी २५ टक्क्यांनी कमी केले. दरमहा ते केवळ अडीच हजार रुपये घेत. निवृत्तीनंतर ते आजारी पडले तेव्हा शहरात राहून चांगले उपचार घेण्याऐवजी ते बिहारमधील सदाकत आश्रमात परतले.तुम्हाला येथे चांगले उपचार मिळतील, असे सांगितल्यानंतर ‘मै जहाँसे दिल्ली आया हू, वहीं फिर वापस जाऊंगा’, असे ते म्हणत.