शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फक्त 10 वर्षांसाठी आरक्षण हवं होतं- सुमित्रा महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 10:47 IST

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर टिपण्णी केली आहे. शिक्षण आणि नोकरीत कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर टिपण्णी केली आहे. शिक्षण आणि नोकरीत कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. रांचीमध्ये सुरू असलेल्या चार दिवसीय लोकमंथन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं होतं, की आरक्षण फक्त 10 वर्षांकरिता आवश्यक आहे. आरक्षणानं देशाचं कल्याण होणार आहे काय ?, असा प्रश्नही सुमित्रा महाजन यांनी उपस्थित केला आहे. तसेच देशाला पुढे नेण्यासाठी आंबेडकरांनी दिलेल्या मार्गानं चालणं गरजेचं आहे.जोपर्यंत तुमच्यात देशाबद्दलची भक्ती वाढणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. संसद आरक्षण वाढवत चाललं आहे. प्रत्येक वेळी 10 वर्षांसाठी आरक्षण वाढवलं जातंय. एकदा तर आरक्षणाची मुदत 20 वर्षांसाठी वाढवण्यात आली होती, असं कधीपर्यंत चालणार आहे. या आरक्षणाची मुदत वाढवण्यामागे काय विचार आहे. आमच्यासाठी सर्व धर्म समान आहेत. आज देशाला आणि समाजाला तोडणारी ताकद सक्रिय आहे. आदिवासींचं धर्म परिवर्तन केलं गेलं. परंतु आमच्या सरकारनं धर्म परिवर्तनविरोधी कायदा केला. तसेच आरक्षणासंदर्भात सर्व पक्षांनी एकत्र येऊन विचारविनिमय करण्याची गरज आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागले.या मुद्द्यांवर राजकारण करता येणार नाही, कारण कायद्याचं सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी संसदेत सर्वच पक्ष मतदान करत असतात. तसेच यावेळी महाजन यांनी व्यंकय्या नायडूंच्या भाषणाचाही उल्लेख केला. देशाचा विचार सर्वात पहिला यायला हवा, लोकांनी जन, गण, मनसंदर्भात विचार करायला हवा, लोकांना देशाचा इतिहास आणि साहित्यासंदर्भात माहिती असायला हवी, असंही त्या म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजन