शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, चोख बंदोबस्त
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
4
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
5
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
6
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
7
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
8
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
10
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
11
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
12
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
13
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
14
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
15
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
16
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
17
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
18
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
20
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

जलस्रोतांच्या विकासाबाबतीत डॉ. आंबेडकर यांचेही योगदान; काँग्रेसने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

खजुराहो : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील जलस्रोतांच्या विकासाबाबत दिलेल्या योगदानाकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केले अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशमधील केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.

खजुराहो येथील कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील भाषणात काढलेले उद्‌गार व त्याबाबत विरोधी पक्षांनी केलेली टीका या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आंबेडकर व काँग्रेसबाबत वक्तव्य केले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खांडवाच्या ओकारेश्वर फिरत्या सोलार प्रकल्पाचे उद्घाटन केले.

जलसुरक्षा हे २१ व्या शतकातील मोठे आव्हान

मोदी म्हणाले की, उत्तम व्यवस्थापन असलेले व पुरेसे जलस्रोत असलेले देशच २१व्या शतकात मोठी प्रगती करू शकतात. डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे देशातील धरणांची बांधकामे व जलस्रोतांचे संवर्धन अधिक उत्तम प्रमाणात होऊ शकले आहे. देशात जलसंवर्धनाची वाढती गरज लक्षात ठेवून काँग्रेसने त्या दिशेने कधीही पावले टाकली नाहीत. जलसंवर्धनाच्या क्षेत्रासाठी डॉ. आंबेडकरांनी जी कामगिरी बजावली, त्याकडे काँग्रेसने कानाडोळा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जलसुरक्षा हे २१व्या शतकातील सर्वात मोठे आव्हान आहे.

काँग्रेस, सुशासन हे एकत्र नांदत नाहीत- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस व सुशासन या दोन्ही गोष्टी कधीही एकत्र नांदू शकत नाहीत. केन-बेतवा नदीजोड प्रकल्पाकडे काँग्रेसने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्या पक्षामुळेच या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला इतका वेळ लागला आहे. केन-बेतवा प्रकल्प बुंदेलखंडात समृद्धी व आनंद घेऊन येईल.

मध्य प्रदेशमधील दहा जिल्ह्यांतील ४४ लाख लोक व उत्तर प्रदेशमधील २१ लाख लोकांना केन-बेतवा नदीजोड प्रकल्पामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांसाठीही उपयोगी असलेल्या या प्रकल्पासाठी ४४६०५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

काँग्रेसकडून अनेक वेळा अवमान : जी. किशन रेड्डी

काँग्रेसने अनेक वेळा घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप केंद्रीय कोळसामंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला.

डॉ. बाबासाहेबांचा अवमान केल्याप्रकरणी काँग्रेसने भाजपवर केलेले आरोप रेड्डींनी फेटाळून लावले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना रेही बोलत होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस