शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

"तुमच्या प्रामाणिकपणावर शंका, चर्चा करायला हवी होती"; दिल्ली सरकारला हायकोर्टाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:37 IST

कॅगच्या अहवालात दिरंगाई केल्याबद्दल उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले आहे.

Delhi High Court: राजधानी दिल्लीत एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना दिल्ली हायकोर्टाने आप सरकारला फटकारलं आहे. तुमच्या प्रामाणिकपणावर शंका असल्याचे हायकोर्टाने म्हटलं आहे. कॅगच्या अहवालात दिरंगाई केल्याबद्दल हायकोर्टाने दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कॅगचे दोन अहवाल माध्यमांमध्ये लीक झाले असतानाच हायकोर्टाने ही टिप्पणी केली. विधानसभा निवडणुकीच्या आधी दिल्लीतील मद्य धोरणाबाबत कॅगचा अहवाल लीक झाला होता. यामध्ये सरकारला २०२६ कोटी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

कथित मद्य घोटाळ्यावरुन दिल्ली हायकोर्टाने दिल्ली सरकारला झापलं आहे. न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या खंडपीठाने कॅगच्या अहवालाबाबत दिल्ली सरकारवर प्रश्न उपस्थित केले. कॅगच्या अहवालावर विचार करण्यात दिरंगाई केल्याबद्दल दिल्ली हायकोर्टाने दिल्ली सरकारवर टीका केली. "तुम्ही ज्या पद्धतीने पाऊले उचललीत त्यामुळे तुमच्या प्रामाणिकपणावर शंका निर्माण झाली आहे. तुम्ही हा अहवाल तातडीने सभापतींना पाठवून सभागृहात चर्चा सुरू करायला हवी होती," असं खंडपीठाने म्हटलं.

टाइमलाइन अगदी स्पष्ट आहे. विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात तुम्ही एक पाऊल मागे घेतले. नायब राज्यपालांकडे अहवाल पाठवणे आणि या समस्येबाबत उशीर केल्याने तुमच्या प्रामाणिकपणावर शंका येते. दिल्ली सरकारने हा अहवाल स्पीकरला पाठवण्यासाठी सक्रिय व्हायला हवे होते, असे कोर्टाने म्हटले आहे. यावर उत्तर देताना दिल्ली सरकारने विधानसभेचे अधिवेशन निवडणुकीच्या काळात कसे काय होऊ शकते असा सवाल केला आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी, दिल्ली विधानसभेच्या सचिवालयाने सांगितले होते की, कॅगचा अहवाल विधानसभेत सादर करता येणार नाही कारण सरकारचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपत आहे.

कॅगचा अहवाल विधानसभेत सादर करण्याची मागणी करत भाजप आमदारांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. कॅगचा अहवाल विधानसभेत मांडावा, अशी भाजपची अनेक दिवसांपासून मागणी आहे. परवान्यातील त्रुटींसह मद्य धोरणात अनेक अनियमितता असल्याचे कॅगच्या लीक झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच आपच्या नेत्यांना लाचेच्या माध्यमातून फायदा झाल्याचाही आरोप कॅग अहवालातून करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या गटाने तज्ज्ञ समितीच्या सूचना फेटाळून लावल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाने या धोरणाला मंजुरी देताना अनेक महत्त्वाच्या निर्णयांना तत्कालीन नायब राज्यपालांची मान्यताही घेण्यात आली नव्हती असेही अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान, २०२१ मध्ये दिल्लीत नवीन मद्य धोरण लागू करण्यात आले. त्यानंतर परवाना वाटपाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे सरकारला हे धोरण मागे घ्यावे लागले. याप्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झा्ल्यामुळे दोघेही तुरुंगात गेले होते. तसेच दोघांनाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद सोडावे लागले.

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालHigh Courtउच्च न्यायालयAAPआप