शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आंध्रात ‘मनोरंजनाचा डबल धमाका’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 04:34 IST

शेती, बेरोजगारी, भाववाढ हे मुद्दे बनणार प्रचाराचे केंद्रबिंदू

- समीर इनामदारलोकसभेच्या निवडणुकांबरोबरच विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने यावर्षी आंध्र प्रदेशात मनोरंजनाचा डबल धमाका अनुभवास मिळणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मतदारांची नावे गायब होण्याबरोबरच ‘डाटा’ चोरीच्या तक्रारीपासून याची सुरुवात झाली आहे.मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आंध्र प्रदेशातील २५ लोकसभा आणि १७५ विधानसभांच्या जागांवर निवडणूक होणार असल्याची घोषणा केली. आंध्र प्रदेशात पहिल्याच टप्प्यामध्ये एकाच वेळी म्हणजे ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आंध्र प्रदेश विधानसभेचा कालावधी एप्रिल आणि मे दरम्यान पूर्ण होत आहे. शेती, बेरोजगारी, भाववाढ हे आंध्र प्रदेशातील मुख्य मुद्दे आहेत.तेलुगू देसम पार्टी आणि वायएसआर काँग्रेस यांच्यात यावर्षी जोरदार टक्कर होण्याची चिन्हे आहेत. १५ व्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आंध्र प्रदेशात हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. आंध्र प्रदेशात विधानसभेच्या १७५ जागा आहेत. ९९ जागांसह तेलुगू देसम पक्ष सध्या सत्तेत आहे. २०१४ साली तेलंगणा या वेगळ्या राज्याची घोषणा झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू हे नव्या आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. अर्थात यापूर्वी त्यांनी १९९४ ते २००४ इतक्या वर्षांपर्यंत राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहेत. आंध्र प्रदेशात सर्वाधिक काळ राहणारे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबूंची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्ष आणि काँग्रेस यांची युती होती. मात्र या युतीला मोठा फटका बसल्याने आंध्र प्रदेश निवडणुकीत ‘काँग्रेसने एकला चलो रे’चा नारा दिला आहे. विधानसभेच्या १७५ आणि लोकसभेच्या २५ जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते ओमान चंडी यांनी केली होती.जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला विधानसभेत ६६ जागा मिळाल्या आहेत. गेल्या १४ महिन्यांत जगनमोहन यांनी ३,६४८ कि. मी. पदयात्रा काढली होती. ‘निन्नू नम्मम बाबू’ अर्थात आमचा तुमच्यावर विश्वास नाही, बाबू अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.सिनेअभिनेते पवन कल्याण यांच्या जन सेना पार्टीनेही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. भाजपचीही स्थिती फारशी चांगली नाही. २०१४ साली आंध्र प्रदेशात लोकसभेच्या ४२ जागा होत्या. त्यातील तेलुगू देसम पक्षाने १६, तेलंगणा राष्टÑ समितीने ११, वायएसआर काँग्रेसने ९, भाजपने तीन आणि काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या.मतदारांची माहिती चोरल्याप्रकरणी आंध्र प्रदेशात सध्या घमासान माजले आहे. आंध्र प्रदेश सरकारचा ‘डाटा’ चोरीस गेल्याप्रकरणी व्हिसल ब्लोअरने आरोप केला होता की, आयटी ग्रीड्स (इंडिया) प्रा. लि. या कंपनीकडे ३.७ कोटी मतदारांचे आधार कार्ड क्रमांक, मोबाईल फोन क्रमांक, रेशन कार्डबाबत अवैधरित्या माहिती उपलब्ध आहे. याबाबत सर्वच पक्षांनी एकमेकांविरुद्ध आरोप केले होते.लाखो मतदारांची नावे गायबया निवडणुकीत अनेकांची नावे मतदार यादीतून गायब आहेत. ज्यांची नावे मतदार यादीतून गायब आहेत त्यांनी फॉर्म ७ भरून द्यायचा होता. ७,२४,९१४ जणांनी हा फॉर्म भरून दिला. त्यापैकी ५,२५,९५७ जणांच्या तक्रारी फेटाळण्यात आल्या तर १,५८,१२४ जणांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. भाजप आणि वायएसआर काँग्रेसने याबाबत तक्रारी केल्या होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAndhra Pradeshआंध्र प्रदेश