शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

‘डबल इंजिन’ सरकारने जिंकला जनतेचा विश्वास; लोकसभा अन् राष्ट्रपती निवडणुकीचा मार्ग झाला सोपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 11:57 IST

योगींनी बदलले राजकारण. योगींनी एकीकडे लोकांच्या मनात आपला दमदार विश्वास निर्माण केला व दुसरीकडे सरकारी योजना अशा प्रकारे लागू केल्या की, लोकांना थेट फायदा झाला.

- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सत्ता मिळवित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपने आणखी एक इतिहास रचला आहे. देशातील सर्वांत मोठ्या राज्यातील जनतेने सुमारे ३७ वर्षांनंतर एखाद्या पक्षाला सत्तेत पुनरागमनाची संधी देऊन बहुमत दिले आहे. यामुळे देशभरात मुख्यमंत्री योगी यांची प्रतिमा उंचावली आहे.

या विजयाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. हा मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याचे मानले जात आहे. योगींच्या रूपाने भाजपच्या भविष्याची झलक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मार्ग सोपा झाल्याचाही तर्क आहे. याबरोबरच राष्ट्रपती निवडणुकीतही भाजपच्या या विजयाची मदत होणार आहे.

जनतेच्या विश्वासाचा विजयशाहनवाज हुसेन यांनी सांगितले की, सब का साथ सबका विकास व सबका विश्वास, ही केवळ घोषणा नाही, तर वस्तुस्थिती आहे. मोदी हे विश्वासाचे दुसरे नाव झाले आहे. या निकालाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही मोठ्या बहुमताचे सरकार बनवू, याचाही विश्वास दिला आहे.

‘गँगस्टर’वर घातला घावमार्च २०१७ मध्ये सत्तेत आल्यानंतर योगींनी यूपीचे वातावरण बदलण्याचे काम केले. पहिला घाव गुन्हेगार व माफियांवर घातला. गुन्हेगारांनी एक तर गुन्हे सोडावेत किंवा यूपी सोडावे, असे आवाहनच त्यांनी केले. राज्यात गँगस्टर ॲक्टनुसार अब्जावधी रुपयांची अवैध संपत्ती जप्त केली. २०१७ नंतर योगी सरकारने बारा हजारांपेक्षा जास्त वाँटेड गुन्हेगारांना अटक केल्याचा दावा केला. ६८० जणांविरुद्ध एनएसए लावला. गुन्हेगारांच्याविरोधात १५ हजार गुन्हे दाखल करून १,९०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. मुख्तार अन्सारी व अतिक अहमदसारख्या बाहुबलींविरोधात कारवाई करून नवीन धडा घालून दिला.

हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी यांच्यावरील जनतेच्या विश्वासाचा आहे. जाती व धर्माचा विचार न करता समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या विकासाचे धोरण अवलंबल्यामुळेच हे शक्य झाले.- मुख्तार अब्बास नकवी,केंद्रीय मंत्री 

योगींनी एकीकडे लोकांच्या मनात आपला दमदार विश्वास निर्माण केला व दुसरीकडे सरकारी योजना अशा प्रकारे लागू केल्या की, लोकांना थेट फायदा झाला. यूपीत ५.७७ कोटींपेक्षा अधिक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळाला. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत २.८२ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाले.१.६७ कोटी गरीब महिलांना उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर दिले. राज्यात १.१६ कोटी लोकांना मागीलवर्षी मनरेगा योजनेत काम मिळाले. स्वच्छ भारत अभियानात मागील आठ वर्षांत राज्यात २.२२ कोटी शौचालये उभारण्यात आली. पीएम आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत यूपीमध्ये गरीब कुटुंबांसाठी १२.१४ लाख घरे तयार करण्यात आली. याशिवाय केंद्र व राज्य सरकारांच्या अनेक योजनांद्वारे पैसा थेट लोकांच्या खिशात पोहोचविला. यामुळे महागाई व बेरोजगारीची तीव्रता कमी झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२