शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

नवरीच्या दारात एकाच वेळी दोन वरात

By admin | Published: June 07, 2017 1:59 PM

तनु वेड्स मनु या चित्रपटातील प्रसंग एका नवरीमुलीच्या जिवनात घडला आहे. त्यामुळे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - कंगना रानौत, आर. माधवन आणि जिमी शेरगील यांच्या अभिनयाने नटलेला तनु वेड्स मनुचे कथानक तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटाच्या शेवटी कंगनाशी लग्न करण्यासाठी आर. माधवन आणि जिमी शेरगील दोघेही वरात घेऊन येतात. हा प्रसंग तुम्हाला चांगलाच आठवत असेल. चित्रपटातील हाच प्रसंग एका नवरीच्या जिवनात घडला आहे. उत्तरप्रदेशमध्ये असलेल्या हमीरपूर जवळील मौदहा येथे लग्नाच्या ठिकाणी दोन वराती आल्यामुळे मंडपात गोंधळ निर्माण झाला. मौदहा जवळ अशलेल्या मकरांवर गावात ही घटना घडली आहे. लग्नाच्या ठिकाणी दोन वराती येणार हे समजल्यावर नवरी मुलीच्या घरी गोंधळ झाला. त्यांना काही समज नव्हते मंडपातील सर्वजण द्विधा मन:स्थितीत होते. मुलीचे पहिल्यादा ठरलेले लग्न रद्द झाल्यानंतर दुसऱ्याशी लग्न ठरले होते. ज्या मुलाशी लग्न मोडले होते तो लग्नामध्ये वरात घेऊन आला. लग्न मोडल्यानंतरही त्याला त्या मुलीशीच लग्न करायचे होते. त्याने वरात घेऊन येण्याची धमकी दिली आणि तो मुलगा वरात घेऊनही आला त्यामुळे हा सर्व प्रसंग निर्माण झाला. हा सर्व प्रसंग पाहून नवरी मुलीच्या वडीलांनी पोलिस स्टेशनचा सहारा घेतला आणि सरळ पोलिसांत तक्रार दाखल केली. मकरांव गांवातील व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न सुमेरपुरातील भानुप्रताप सिंहशी ठरवले होते. साखरपुडा झाल्यानंतर 2 जून रोजी लग्नाची तारीख ठरली होती. पण काही कारणास्तव दोन्हीकडील संबंध बिघडले. आणि लग्नाच्या काही दिवस आधी नवरीमुलीच्या वडिलांनी आम्ही आमची मुलगी तुमच्या घरी देणार नाही. हे लग्न आम्हाला मान्य नाही म्हणत. नकार कळवला होता. नवरीमुलीकडून नकार आल्यानंतर भानुप्रताप सिंग आणि त्यांच्या कुटुंबातील भडकले आणि थेट वाद घातला. यावेळी आपण लग्नाच्या ठरवलेल्या वेळेवर वरात घेऊन येणार असे सांगतले. त्या दरम्यान मुलीच्या घरच्यांनी तिचे लग्न महोबातील भगवान सिंह याच्याशी ठरवले होते.