शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका; सरसंघचालकांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 10:34 IST

देश मंदीच्या परिस्थितीतून बाहेर पडेल; भागवत यांना विश्वास

नागपूर: आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका, असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वसामान्यांना दिला आहे. मंदीची फार चर्चा झाल्यास व्यापारी, व्यावसायिक बचावात्मक पवित्रा घेतील. त्यामुळे ते फारशी गुंतवणूक करणार नाहीत. याचा परिणाम पुन्हा अर्थव्यवस्थेवर होईल असं भागवत म्हणाले. सरकार अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी प्रयत्न करत असून देश लवकरच यातून बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या देशाचा जीडीपी अवघ्या ५ टक्क्यांवर आला आहे. जीडीपी मोजण्याचे मानक दोषपूर्ण असल्याचं भागवत म्हणाले. जगातील अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक स्पर्धेचा फटका भारताला बसतो आहे. विकास दर शून्याच्या खाली गेला, तर मंदी आली असे म्हणतात. शासनाने या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी दीड महिन्यात अनेक पावले उचलली आहेत. या मंदीच्या चक्रातून देश निश्चित बाहेर येईल, असा विश्वास सरसंघचालकांनी व्यक्त केला. अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यासाठी सरकारला भूमिका घ्यावी लागली. सरकारची लोककल्याणकारी धोरणं व उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत प्रभावी पद्धतीनं पोहोचावेत, यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.जगातील प्रचलित मानक अनेक आर्थिक प्रश्नांचा उलगडा करत नाहीत. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला देशाच्या मूळांमध्ये जावे लागेल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच पर्यटन यावर भर द्यावा. उपलब्ध स्त्रोत व जनतेचा विचार करुन आर्थिक धोरणं तयार करायला हवीत. स्वदेशीचं विस्मरण झाल्यास त्यानं देशाचीच हानी होईल, असंही सरसंघचालकांनी म्हटलं. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतEconomyअर्थव्यवस्था