शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका; सरसंघचालकांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 10:34 IST

देश मंदीच्या परिस्थितीतून बाहेर पडेल; भागवत यांना विश्वास

नागपूर: आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका, असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वसामान्यांना दिला आहे. मंदीची फार चर्चा झाल्यास व्यापारी, व्यावसायिक बचावात्मक पवित्रा घेतील. त्यामुळे ते फारशी गुंतवणूक करणार नाहीत. याचा परिणाम पुन्हा अर्थव्यवस्थेवर होईल असं भागवत म्हणाले. सरकार अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी प्रयत्न करत असून देश लवकरच यातून बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या देशाचा जीडीपी अवघ्या ५ टक्क्यांवर आला आहे. जीडीपी मोजण्याचे मानक दोषपूर्ण असल्याचं भागवत म्हणाले. जगातील अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक स्पर्धेचा फटका भारताला बसतो आहे. विकास दर शून्याच्या खाली गेला, तर मंदी आली असे म्हणतात. शासनाने या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी दीड महिन्यात अनेक पावले उचलली आहेत. या मंदीच्या चक्रातून देश निश्चित बाहेर येईल, असा विश्वास सरसंघचालकांनी व्यक्त केला. अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यासाठी सरकारला भूमिका घ्यावी लागली. सरकारची लोककल्याणकारी धोरणं व उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत प्रभावी पद्धतीनं पोहोचावेत, यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.जगातील प्रचलित मानक अनेक आर्थिक प्रश्नांचा उलगडा करत नाहीत. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला देशाच्या मूळांमध्ये जावे लागेल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच पर्यटन यावर भर द्यावा. उपलब्ध स्त्रोत व जनतेचा विचार करुन आर्थिक धोरणं तयार करायला हवीत. स्वदेशीचं विस्मरण झाल्यास त्यानं देशाचीच हानी होईल, असंही सरसंघचालकांनी म्हटलं. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतEconomyअर्थव्यवस्था