शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बकरी ईदला नमाजनंतर एकमेकांची गळाभेट घेऊ नका, उत्तर प्रदेशात फर्मान जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 11:00 IST

उत्तर प्रदेशात बकरी ईदला नमाजनंतर एकमेकांची गळाभेट घेऊ नका असा आदेशच जारी करण्यात आला आहे

लखनऊ, दि. 2 -  उत्तर प्रदेशात बकरी ईदला नमाजनंतर एकमेकांची गळाभेट घेऊ नका असा आदेशच जारी करण्यात आला आहे. पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य असलेले सुन्नी मौलाना रशीद फिरंगिमहली यांनी मुस्लिमांना हे आवाहन केलं आहे. मात्र यामागे कोणतंही धार्मिक कारण नसून राज्यात स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला असल्याने पुर्वकाळजी म्हणून रशीद फिरंगिमहली यांनी हे आवाहन केलं आहे. स्वाईन फ्लूचं संकट दिवसेंदिवस वाढत असून, नमाजच्या निमित्ताने लोक एकत्र आल्याने तसंच गळाभेट घेतल्याने त्याचा फैलाव होण्याची भीती आहे असं रशीद फिरंगिमहली बोलले आहेत. 

दरम्यान शिया मौलाना जव्वाद यांनी गळाभेट घेताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचे 66 रुग्ण आढळले आहेत. 

मौलाना रशीद फिरंगिमहली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की, 'उत्तर प्रदेशमधील 20 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. यामधील अनेकजण नमाज पठन करतात आणि एकमेकांची गळाभेट घेत असतात. हात मिळवल्याने तसंच गळाभेट घेतल्याने स्वाईन फ्लूची लागण होण्याचा धोका असतो. यामुळे आम्ही आमच्या बांधवांना गळाभेट न घेता फक्त सलाम करा असं आवाहन केलं आहे. देवालाही आपल्या भक्तांची काळजी असते. जर एखाद्या सणामुळे स्वाईन फ्लूचा फैलाव झाला तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट असेल'. 

ईद-उल-अधा किंवा बकरी ईद हा मुस्लिमांचा सण आहे. या  दिवशी कुराणमधील बळीची घटना साजरा केली जाते. इस्लामच्या तीन मुख्य ईदपैकी हा एक दिवस आहे. या सणाला ‘ईद-उल-अज़हा’ किंवा ‘ईद-उज़-जुहा’ असेही म्हणतात. याच महिन्यात मुस्लिम लोक हज यात्रेसाठी प्रयाण करतात. मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बक-याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात या सणासाठी बकरी ईद हे नाव प्रचलित झाले आहे. 

बकरी ईदला जनावरं कापण्याऐवजी केक कापा, RSS प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचचं आवाहनदुसरीकडे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचनं बकरी ईदला जनावरांच्या देण्यात येणा-या बळी प्रथेला विरोध करत बकरी ईदच्या दिवशी जनावरं नाही तर केक कापा, असे आवाहन मुस्लिमांना केले आहे. मुस्लिम उलेमा मात्र मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या या भूमिकेविरोधात उभी ठाकली आहे. 1400 वर्षांपासून बकरी ईदला जनावरांचा बळी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  शिवाय, धर्मामध्ये आरएसएस हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचनं बकरी ईदच्या दिवशी जनावरांचा बळी देण्याला विरोध दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Bakri Idबकरी ईदNamajनमाजMuslimमुस्लीम