शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:19 IST

मुद्द्याची गोष्ट : बांगलादेशात गेल्या काही दिवसांत हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या घटना केवळ अंतर्गत अस्थिरतेचे लक्षण नाहीत, तर त्या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी थेट जोडलेल्या आहेत. १९७१ मध्ये भारताच्या निर्णायक हस्तक्षेपातून जन्माला आलेल्या बांगलादेशात आज भारतविरोधी आणि अल्पसंख्याकविरोधी वातावरण बळावत आहे.

कर्नल (निवृत्त) विनायक तांबेकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक -

बांगलादेशातहिंदू व्यक्तींवर अत्याचार, हिंसाचार अशा घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. त्याची दखल भारत सरकारला घ्यावी लागेल. कारण, बांगलादेशाचे भौगोलिक स्थान आाणि तेथील राजकीय परिस्थिती. बांगलादेशाची निर्मिती ही भारत सरकारने १९७१ मध्ये केली, हे निर्विवाद ऐतिहासिक सत्य आज तेथील मुस्लीम जनतेच्या स्मृतीतून पुसले जात असल्याचे सध्याच्या घटनांवरून स्पष्ट होते. एकेकाळचा पूर्व पाकिस्तान हा भारताच्या नकाशावर काट्यासारखा रुतलेला होता. सुमारे १,४८,००० चौरस किमी क्षेत्रफळ आणि १७ कोटी लोकसंख्येचा हा प्रदेश भारताच्या फाळणीत झालेल्या मोठ्या राजकीय चुकीचे प्रतीक ठरला. त्या चुकीचे परिणाम भारताला दीर्घकाळ भोगावे लागले. अखेर १९७१ मध्ये भारताने धाडसी निर्णय घेत बांगलादेशाची निर्मिती केली. मात्र आज त्याच देशात भारतविरोधी सूर आणि अल्पसंख्याकविरोधी हिंसाचार वाढताना दिसत आहे, ही बाब भारतासाठी गंभीर चिंतेची आहे.

१९७१चे युद्ध आणि भारताने केलेला निर्णायक हस्तक्षेप -१९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार आणि तत्कालीन लष्करी पूर्व विभागाचे लेफ्टनंट जनरल जगजीतसिंह अरोरा यांच्या उत्कृष्ट लष्करी योजनेनुसार अवघ्या १४ दिवसांत बांगलादेशाची निर्मिती झाली. ही घटना जागतिक लष्करी इतिहासात अभूतपूर्व ठरली. तब्बल ९० हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली. ले. जनरल अरोरा यांनी तत्कालीन पूर्व पाकिस्तानचे लष्करी प्रमुख जनरल नियाझी यांच्याकडून शरणागतीपत्रावर सही घेतानाचे छायाचित्र जगभर गाजले. १६ डिसेंबर १९७१ हा दिवस आजही ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व तत्कालीन लष्करप्रमुख जनरल सॅम मानेकशा यांनी केले.

बहुसंख्याकवाद आणि अल्पसंख्याकांवरील हल्ले १७ कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात सुमारे १५ कोटी मुस्लीम आहेत. या बहुसंख्येच्या बळावर हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीयांच्या देवळांवर, चर्चवर आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले. यामागे युनूस यांच्या नेतृत्वाखालील अकार्यक्षम सरकार कारणीभूत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात शरीफ उस्मान हादी यांचा खून झाला. ही व्यक्ती पूर्व पंतप्रधान शेख हसीना यांची विरोधक होती. तसेच हिंदू तरुण पुढारी दीपूचंद्र दास यांची हत्या ही बांगलादेशातील वाढत्या अराजकतेचे ठळक उदाहरण ठरते.

निवडणुका, सत्तासंघर्ष आणि भारताची चिंता येत्या फेब्रुवारीमध्ये बांगलादेशात होणाऱ्या निवडणुकांकडे भारतासह जगाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीकडून खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान उतरतो आहे. आवामी लीगविरुद्ध बीएनपी अशी थेट लढत अपेक्षित आहे. तारिक रहमान गेली १०-१२ वर्षे जिवाला धोका असल्याने लंडनमध्ये वास्तव्यास होता. जिवाला धोका असल्यामुळे शेख हसीना भारतात, दिल्लीत राहत आहेत. त्यांच्या आवामी लीग पक्षावर बांगलादेशात बंदी आहे. त्यामुळे या निवडणुकीतून उदयास येणारे सरकार हिंदू आणि भारतविरोधी भूमिका घेते की नाही, याकडे भारताला सावध नजरेने पाहावे लागणार आहे.

सीमावर्ती राज्यांसमोरील गंभीर आव्हान सुमारे १,४८,००० चौरस किमी क्षेत्रफळाचा बांगलादेश भारतासाठी आज डोकेदुखी ठरत आहे. तेथून आसाम व त्रिपुरा या राज्यांत होणारी घुसखोरी हा गंभीर प्रश्न बनला आहे. खोटे आधार कार्ड, रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे मिळवून स्थानिक रहिवासी असल्याचे दाखवण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. आसाम सरकारने या घुसखोरीविरोधात ठोस पावले उचलून अनेक प्रकरणे उघडकीस आणली. मात्र ही समस्या कायदा-सुव्यवस्थेपुरती मर्यादित नसून, ती भारताच्या अंतर्गत सुरक्षेला थेट आव्हान देणारी आहे.

- १७ कोटी लोकसंख्या बांगलादेशची आहे.

- १५ कोटी मुस्लीम  बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येपैकी आहेत. या बहुसंख्येच्या बळावर हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीयांच्या देवळांवर, चर्चवर आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले.

- १४ दिवसांत बांगलादेशाची निर्मिती झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Don't Forget History: Your Birth is Because of Us

Web Summary : Analyst Vinayak Tambekar highlights Bangladesh's creation by India in 1971, now facing rising anti-India sentiment and minority violence. Upcoming elections and border issues pose challenges, demanding India's vigilance to protect its interests and security.
टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूMuslimमुस्लीम