शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! ...म्हणून गावकऱ्यांनी सरपंचांची काढली थेट गाढवावरून मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 09:42 IST

donkey totka village sarpanch riding donkey : गावकऱ्यांनी सरपंचांना घडवलेल्या गाढवाच्या सवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - देशभरात चांगला पाऊस पडावा यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. अनेक खेड्यांमध्ये आजही यंदा पाऊस उत्तम पडावा म्हणून चित्र-विचित्र प्रकार केले जातात. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) विदिशा जिल्ह्यातही अशीच एक अजब घटना समोर आली आहे. पाऊस पडत नसल्याने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी इंद्रदेवाला खूश करण्यासाठी गावच्या सरपंचांना थेट गाढवावर बसवून संपूर्ण गावात फिरवल्याची घटना समोर आली आहे. असं केल्यामुळे देव प्रसन्न होईल आणि लवकरात लवकर चांगला पाऊस पडेल अशी लोकांना आशा आहे. 

गावकऱ्यांनी सरपंचांना घडवलेल्या गाढवाच्या सवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यानं लोकं चिंतेत आहेत आणि वेगवेगळे पर्याय अवलंबून पाहात आहेत. याच दरम्यान विदिशा जिल्ह्यातील रंगई गावात पावसासाठी एक अनोखी गोष्ट करण्यात आली. यात गावाचे सरपंच सुशील वर्मा यांना गाढवावर बसवून संपूर्ण गावभर फिरवण्यात आलं. हार घालून त्यांची खास गाढवावरून मिरवणूकचं काढण्यात आली. यामध्ये गावातील सर्व लोक उत्साहाने सहभागी झाले होते. 

गाढवावर बसलेल्या सरपंचाचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात होतं. गावातील लोक त्यांची आरती करत होते. महिला, लहान मुलांनी देखील या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. सरपंच गाढवावर बसले असून लोक बँड-बाजा घेऊन नाचत गात असलेले पाहायला मिळाले. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही मिरवणूक पटेल बाबा देवस्थान येथून सुरू झाली आणि गणेश मंदिरापर्यंत पोहोचली. तिथे लोकांनी चांगल्या  देवाकडे प्रार्थना केली. काही ठिकाणी उत्तम पाऊस पडावा म्हणून बेडकांचं लग्न लावण्याची देखील पद्धत आहे. 

सरपंच सुशील वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात असं मानलं जातं, की गावच्या सरपंचांची गाढवावरून मिरवणूक काढल्यास इंद्रदेवता प्रसन्न होतात आणि पाऊस चांगला होतो. याच कारणामुळे गाढवावरून सवारी केली, कारण जनतेच्या सुखात आणि दुखात सहभागी होणं हे एका प्रमुखाचं काम आहे. तसेच चांगल्या पावसासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचं देखील सरपंचांनी म्हटलं आहे. तर काही गावकऱ्यांनी असं केल्यास पाऊस येतो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत