शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

ऐकावं ते नवलच! ...म्हणून गावकऱ्यांनी सरपंचांची काढली थेट गाढवावरून मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 09:42 IST

donkey totka village sarpanch riding donkey : गावकऱ्यांनी सरपंचांना घडवलेल्या गाढवाच्या सवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - देशभरात चांगला पाऊस पडावा यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. अनेक खेड्यांमध्ये आजही यंदा पाऊस उत्तम पडावा म्हणून चित्र-विचित्र प्रकार केले जातात. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) विदिशा जिल्ह्यातही अशीच एक अजब घटना समोर आली आहे. पाऊस पडत नसल्याने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी इंद्रदेवाला खूश करण्यासाठी गावच्या सरपंचांना थेट गाढवावर बसवून संपूर्ण गावात फिरवल्याची घटना समोर आली आहे. असं केल्यामुळे देव प्रसन्न होईल आणि लवकरात लवकर चांगला पाऊस पडेल अशी लोकांना आशा आहे. 

गावकऱ्यांनी सरपंचांना घडवलेल्या गाढवाच्या सवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यानं लोकं चिंतेत आहेत आणि वेगवेगळे पर्याय अवलंबून पाहात आहेत. याच दरम्यान विदिशा जिल्ह्यातील रंगई गावात पावसासाठी एक अनोखी गोष्ट करण्यात आली. यात गावाचे सरपंच सुशील वर्मा यांना गाढवावर बसवून संपूर्ण गावभर फिरवण्यात आलं. हार घालून त्यांची खास गाढवावरून मिरवणूकचं काढण्यात आली. यामध्ये गावातील सर्व लोक उत्साहाने सहभागी झाले होते. 

गाढवावर बसलेल्या सरपंचाचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात होतं. गावातील लोक त्यांची आरती करत होते. महिला, लहान मुलांनी देखील या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. सरपंच गाढवावर बसले असून लोक बँड-बाजा घेऊन नाचत गात असलेले पाहायला मिळाले. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही मिरवणूक पटेल बाबा देवस्थान येथून सुरू झाली आणि गणेश मंदिरापर्यंत पोहोचली. तिथे लोकांनी चांगल्या  देवाकडे प्रार्थना केली. काही ठिकाणी उत्तम पाऊस पडावा म्हणून बेडकांचं लग्न लावण्याची देखील पद्धत आहे. 

सरपंच सुशील वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात असं मानलं जातं, की गावच्या सरपंचांची गाढवावरून मिरवणूक काढल्यास इंद्रदेवता प्रसन्न होतात आणि पाऊस चांगला होतो. याच कारणामुळे गाढवावरून सवारी केली, कारण जनतेच्या सुखात आणि दुखात सहभागी होणं हे एका प्रमुखाचं काम आहे. तसेच चांगल्या पावसासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचं देखील सरपंचांनी म्हटलं आहे. तर काही गावकऱ्यांनी असं केल्यास पाऊस येतो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत