शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

देशांतर्गत विमानप्रवास १६ टक्क्यांनी महागणार; केंद्र सरकारकडून किमान प्रवासभाड्याची मर्यादेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 07:21 IST

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. किमान प्रवासभाडे वाढविण्यात आले असले, तरीही कमाल प्रवासभाड्याची मर्यादा बदलण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली/मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या भडकलेल्या क‍िमतींमुळे सर्वसामान्यांवर रडण्याची वेळ आली आहे. त्यातच आता देशांतर्गत विमानप्रवासही महागणार आहे. केंद्र सरकारने किमान प्रवासभाड्याची मर्यादा १६ टक्के वाढविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे किमान भाडे १३ ते १६ टक्क्यांनी वाढणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. किमान प्रवासभाडे वाढविण्यात आले असले, तरीही कमाल प्रवासभाड्याची मर्यादा बदलण्यात आलेली नाही. प्रवासभाड्याच्या सीमा गेल्या वर्षी २५ मेपासून विमान वाहतुकीला परवानगी देण्यात आल्यानंतर निर्धारित करण्यात आली होती. नवे बदल १ जूनपासून अंमलात येतील. त्यानुसार, ४० मिनिटांच्या प्रवासासाठी किमान प्रवासभाडे २,३०० रुपयांऐवजी २,६०० रुपये निर्धरित करण्यात आले आहे, तर ४० ते ६० मिनिटांच्या प्रवासासाठी ३,३०० रुपये किमान प्रवासभाडे आकारण्यात येतील. दुसऱ्या लाटेमुळे घेतला निर्णयकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रवासी संख्या घटली आहे. सरकारने १ जूनपासून प्रवासी क्षमता सध्याच्या ८० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर आणली आहे. सरकारच्या निर्देशांनुसार उड्डाणांची संख्याही घटविण्यात येणार आहे. त्यामुळे १ जूननंतर तिकिटे रद्द होण्याची शक्यता आहे. विमान कंपनी प्रवाशांना पर्यायी विमानात जागा उपलब्ध करून देण्यात येईल किंवा प्रवासभाडे परत करण्यात येईल, तसेच प्रवाशांना प्रवासाची तारीख बदलण्याची एक मोफत संधी देण्यात येईल.नवीन दरपत्रक (किमान भाडे)४० मिनिटांपर्यंत - २६०० रुपये४० ते ६० मिनिटे - ३३०० रुपये६० ते ९० मिनिटे - ४००० रुपये९० ते १२० मिनिटे - ४७०० रुपये१२० ते १५० मिनिटे - ६१०० रुपये१५० ते १८० मिनिटे - ७४०० रुपये१८० ते २१० मिनिटे - ८७०० रुपयेनुकसान झेलणाऱ्या कंपन्यांना दिलासा प्रवासभाडे वाढविण्यात आल्यामुळे कोरोना महामारीच्या काळात आर्थ‍िक नुकसान सहन करणाऱ्या विमान कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोना संसर्गाच्या देशात आलेल्ल्या सऱ्या लाटेमुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.