शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

'डोकलाम'सारखे आणखी प्रयत्न करू शकतो चीन, जवानांना सज्ज राहण्याच्या सूचना : लष्करप्रमुख बिपिन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 08:24 IST

भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना जवानांना दिल्या आहेत

पुणे, दि. 27 -  ‘‘भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना जवानांना दिल्या आहेत,’’ असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागातर्फे जनरल बी. सी. जोशी मेमोरिअल व्याख्यानाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. ‘वर्तमानातील भू-सामरिक स्थितीतील भारतासमोरील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एन. हॅरिस, संरक्षण आणि सामरिक विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, उपस्थित होते.रावत म्हणाले, की दहशतवाद आणि कट्टरतावाद वेगाने वाढत आहेत. आशिया खंड जगाचे केंद्र बनत आहे. जगात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी चीन राजकीय, आर्थिक आणि लष्करी दबाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन्ही देशांत डोकलाम प्रश्नावरून तणावपूर्ण वातावरण आहे. सीमा अस्पष्ट असल्याने चीन अनेक भागांवर मालकी हक्क सांगत आहे. त्यामुळेच भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा होऊ शकतात. फाळणी आणि वसाहतवादी धोरणामुळे काश्मीरप्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तान छुप्या युद्धाद्वारे काश्मीर अशांत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. कट्टरपंथीय छुप्या पद्धतीने मदत करीत आहेत. देशातील आंतरिक सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अशा घटकांना नष्ट करणे महत्त्वाचे असल्याचेही रावत यांनी सांगितले.चीन आणि भारतातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांतील लष्करांचा संयुक्तिक सराव घेण्याचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी भारताने चीनच्या सैनिकांना सरावासाठी आमंत्रित केले होते. या वर्षी चीनकडून हा प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप कुठलेच निमंत्रण आलेले नाही. - बिपिन रावत, लष्करप्रमुख.

टॅग्स :DoklamडोकलामJammu Kashmirजम्मू काश्मिरchinaचीन