शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

देशात कायदा अस्तित्वात आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 06:35 IST

कोट्यवधींची थकबाकी न भरणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना झापले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : या देशात कायदा अस्तित्वात आहे की नाही, असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी देशातील दूरसंचार कंपन्यांना केला. तब्बल १.४७ लाख कोटी रुपयांच्या अ‍ॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (समायोजित सकळ महसूल)बाबत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला. दूरसंचार कंपन्या व त्यांच्या संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश देताना ही थकीत रक्कम १७ मार्चपूर्वी जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सर्वोच्च न्यायालयाने २४ आॅक्टोबर रोजी एजीआरसंबंधी आदेश दिला होता. तथापि, कंपन्यांनी त्याचे पालन केले नाही. त्यातच दूरसंचार मंत्रालयातील एका अधिकाºयाने कंपन्यांविरोधात सक्तीची कारवाई न करण्याच्या सूचना देणारा आदेश अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल व इतरांच्या नावे काढल्याचे समोर आले. हा आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा. आदेश मागे न घेतल्यास त्या अधिकाºयास तुरुंगात पाठवू, असा सक्त इशाराही न्यायालयाने दिला.

एजीआरचा भरणा करण्यासाठी आणखी वेळ मागणारी याचिका सुनावणीसाठी आली असता न्या. अरुण मिश्रा यांच्या पीठाने संताप व्यक्त करून म्हटले की, एजीआरच्या पुनर्विचाराच्या याचिकाही फेटाळून लावल्या आहेत. तरी एक रुपयाही भरला नाही. हे अडथळे कोण निर्माण करीत आहेत, हेच कळेनासे झाले आहे. या देशात कायदा अस्तित्वात नाही का? देशात राहण्यापेक्षा देश सोडून जाणे श्रेयस्कर आहे. देशात ज्या पद्धतीने घटना घडत आहेत, त्यामुळे आमचा विवेक डळमळीत झाला आहे.तो आदेश मागे, थकबाकीतत्काळ भरण्याचे आदेशच्न्यायालयाच्या तंबीनंतर दूरसंचार विभागाने डेस्क अधिकाºयाचा कंपन्यांवर ‘सक्ती न करण्या’च्या सूचना देणारा आदेश तत्काळ मागे घेतला. शुक्रवारी मध्यरात्री ११.५९ वाजेपर्यंत रकमेचा भरणा करण्याचे आदेशही कंपन्यांना दिले.च्सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे या दूरसंचार कंपन्या पूर्णत: हबकून गेल्या आहेत. आपण २0 फेब्रुवारीपर्यंत १0 हजार कोटी रुपये जमा करू, असे एअरटेलने म्हटले आहे. या निर्णयानंतर व्होडाफोन-आयडियाचे शुक्रवारी दुपारनंतर शेअर ११ टक्क्यांनी कोसळले.भरणा करणारी जिओच!व्होडाफोन-आयडियाकडे एजीआरचे सर्वाधिक ५0 हजार कोटी रुपये थकले आहेत. एअरटेलकडे ३५ हजार ५00 कोटी, तर टाटा टेलिसर्व्हिसेसकडे १४ हजार कोटी रुपये थकले आहेत. जिओने मात्र आपली रक्कम भरली आहे.च्दूरसंचार कंपन्या तोट्यात असून, मध्यंतरी व्होडाफोनने भारतातून गाशा गुंडाळण्याचीही भाषा केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर ती आणखी अडचणीत आली आहे. त्यामुळे ती देशातील कारभार बंद करेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAirtelएअरटेलIdeaआयडियाVodafoneव्होडाफोनJioजिओ