शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

देशात कायदा अस्तित्वात आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 06:35 IST

कोट्यवधींची थकबाकी न भरणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना झापले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : या देशात कायदा अस्तित्वात आहे की नाही, असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी देशातील दूरसंचार कंपन्यांना केला. तब्बल १.४७ लाख कोटी रुपयांच्या अ‍ॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (समायोजित सकळ महसूल)बाबत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला. दूरसंचार कंपन्या व त्यांच्या संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश देताना ही थकीत रक्कम १७ मार्चपूर्वी जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सर्वोच्च न्यायालयाने २४ आॅक्टोबर रोजी एजीआरसंबंधी आदेश दिला होता. तथापि, कंपन्यांनी त्याचे पालन केले नाही. त्यातच दूरसंचार मंत्रालयातील एका अधिकाºयाने कंपन्यांविरोधात सक्तीची कारवाई न करण्याच्या सूचना देणारा आदेश अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल व इतरांच्या नावे काढल्याचे समोर आले. हा आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा. आदेश मागे न घेतल्यास त्या अधिकाºयास तुरुंगात पाठवू, असा सक्त इशाराही न्यायालयाने दिला.

एजीआरचा भरणा करण्यासाठी आणखी वेळ मागणारी याचिका सुनावणीसाठी आली असता न्या. अरुण मिश्रा यांच्या पीठाने संताप व्यक्त करून म्हटले की, एजीआरच्या पुनर्विचाराच्या याचिकाही फेटाळून लावल्या आहेत. तरी एक रुपयाही भरला नाही. हे अडथळे कोण निर्माण करीत आहेत, हेच कळेनासे झाले आहे. या देशात कायदा अस्तित्वात नाही का? देशात राहण्यापेक्षा देश सोडून जाणे श्रेयस्कर आहे. देशात ज्या पद्धतीने घटना घडत आहेत, त्यामुळे आमचा विवेक डळमळीत झाला आहे.तो आदेश मागे, थकबाकीतत्काळ भरण्याचे आदेशच्न्यायालयाच्या तंबीनंतर दूरसंचार विभागाने डेस्क अधिकाºयाचा कंपन्यांवर ‘सक्ती न करण्या’च्या सूचना देणारा आदेश तत्काळ मागे घेतला. शुक्रवारी मध्यरात्री ११.५९ वाजेपर्यंत रकमेचा भरणा करण्याचे आदेशही कंपन्यांना दिले.च्सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे या दूरसंचार कंपन्या पूर्णत: हबकून गेल्या आहेत. आपण २0 फेब्रुवारीपर्यंत १0 हजार कोटी रुपये जमा करू, असे एअरटेलने म्हटले आहे. या निर्णयानंतर व्होडाफोन-आयडियाचे शुक्रवारी दुपारनंतर शेअर ११ टक्क्यांनी कोसळले.भरणा करणारी जिओच!व्होडाफोन-आयडियाकडे एजीआरचे सर्वाधिक ५0 हजार कोटी रुपये थकले आहेत. एअरटेलकडे ३५ हजार ५00 कोटी, तर टाटा टेलिसर्व्हिसेसकडे १४ हजार कोटी रुपये थकले आहेत. जिओने मात्र आपली रक्कम भरली आहे.च्दूरसंचार कंपन्या तोट्यात असून, मध्यंतरी व्होडाफोनने भारतातून गाशा गुंडाळण्याचीही भाषा केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर ती आणखी अडचणीत आली आहे. त्यामुळे ती देशातील कारभार बंद करेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAirtelएअरटेलIdeaआयडियाVodafoneव्होडाफोनJioजिओ