शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

लसीच्या दोन डोसमुळे जीव खरंच वाचतो का?; केंद्राच्या संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 06:57 IST

तिसरी लाट येणार की नाही याविषयी साशंकता असली तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या लस हाच उपाय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क : तिसरी लाट येणार की नाही याविषयी साशंकता असली तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या लस हाच उपाय आहे. पण, लसीमुळे किती बचाव होतो, कोणती लस घ्यावी असे अनेक प्रश्न अजूनही मनात आहेत. त्याची उत्तरे आरोग्य मंत्रालयाने दिली आहेत. जाणून घेऊ दोन डोस घेतल्यानंतर धोका कमी होतो का?

संशोधन काय सांगते ?

आरोग्य खात्याने एप्रिल आणि ऑगस्ट या काळातील डेटावरून संशोधन केले. दुसऱ्या लाटेत म्हणजेच एप्रिल ते मे या काळात मृत्यू झालेल्यांमध्ये एकही डोस न घेणऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते.

ही जनता सुरक्षित

१७.५ कोटी लोकांना आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सरकारच्या संशोधनाचा निष्कर्ष ग्राह्य धरल्यास या १७.५ कोटी लोकांना कोरोनाने मृत्यू होण्याचा धोका ९७ टक्के कमी आहे. ५६ कोटी लोकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यांनाही जवळपास ९६ टक्के सुरक्षा मिळत आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक दिला गेला दुसरा डोस

दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यात १.८५ कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी असून, तेथे दुसरा डोस पूर्ण करणाऱ्यांची संख्या १.४५ कोटी आहे.

आरोग्य मंत्रालय काय म्हणाले?

लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणाऱ्यांना कोरोनाने मृत्यू होण्याचा धोका ९७ टक्के कमी असतो. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार