शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

डोळ्यावर कातडे ओढल्याने भिंतीवरचेही दिसत नाही!, विरोधक म्हणजे शल्यवृत्तीचे टीकाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 05:50 IST

गेल्या दोन तिमाहींत भारताचा विकासदर अपेक्षेहून कमी झाल्याचे निमित्त साधून एकसुरात गळा काढणाºया टीकाकारांना महाभारतातील शल्याची उपमा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्यावर उघड हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींत भारताचा विकासदर अपेक्षेहून कमी झाल्याचे निमित्त साधून एकसुरात गळा काढणाºया टीकाकारांना महाभारतातील शल्याची उपमा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्यावर उघड हल्लाबोल केला. डोळ्यावर कातडे ओढल्याने भिंतीवरचेही दिसत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. मागील व आताच्या सरकारच्या काळातील आकडेवारी देत त्यांची ओरड बिनबुडाची असल्याचा दावा केला.‘इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरीज् आॅफ इंडिया’च्या कार्यक्रमात मोदींच्या भाषणाचा मुख्य रोख गेल्या काही दिवसांत सरकारवर टीका करणाºया विरोधकांवर व स्वपक्षीयांवरही होता. टीका करणारे हे लोक गैरसोयीचे असते, तेव्हा सरकारच्या आकडेवारीवर शंका घेतात आणि सोयीचे असते तेव्हा तीच आकडेवारी ब्रह्मवाक्य मानून टीका करतात, असे ते म्हणाले. व्यासपीठावर मोदी यांनी भाषणात उल्लेख केलेल्या प्रत्येक मुद्द्याची आकडेवारी तक्त्याच्या स्वरूपात दाखविण्याची खास व्यवस्था करण्यात आली होती.सरकार प्रामाणिकांच्या पाठीशीमोदी म्हणाले, देशाच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत प्रामाणिकांची कदर केली जाईल. व्यापाºयांना भूतकाळातील कुलंगडी तर बाहेर काढली जाणार नाहीत, याची भीती असल्याची मला कल्पना आहे. परंतु त्यांच्यामागे शुल्ककाष्ठ लावले जाणार नाही. जीएसटीच्या व्यवस्थेत देशहितासाठी जे काही बदल व सुधारणा करणे गरजेचे असेल, ते सरकार नि:संकोचपणे करेल.भाषणात महाभारतातील ‘शल्य’मोदी म्हणाले की, महाभारतात शल्य नावाचे एक पात्र होते. शल्य हा कर्णाचा सारथी होता. युद्धात जे काही दिसायचे ते पाहून हा शल्य कर्णाला एकसारखा हतोत्साहित करत असे. नैराश्याचे वातावरण पसरवीत असे. आज शल्य नसला तरी शल्यवृत्ती कायम आहे. अशा लोकांना नैराश्य पसरविण्यातच आनंद मिळतो. एखाद-दुसºया तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर कमी झाला तरी त्यांच्यासाठी ती मोठी बातमी होते.पंतप्रधानांनी मांडला आकडेवारीचा फ्लॅशबॅकमी कोणी अर्थतज्ज्ञ नाही किंवा मीतसा दावाही केलेला नाही; पण आज देशात अर्थव्यवस्थेवर एवढी चर्चा होत असताना मला जरा ‘फ्लॅशबॅक’मध्ये जाण्याखेरीज गत्यंतर नाही.सातत्याने सात टक्क्यांहून वृद्धीदर असलेल्या अर्थव्यवस्थेचा विकास दोन तिमाहींत ५.७ व ६.१ टक्के झाल्यावर टीका सुरूझाली. परंतु विकासदर या पातळीवर येण्याची ही पहिली वेळ नाही.पूर्वीच्या सरकारच्या काळात आठ वेळा विकासदर ५.७ टक्के वा त्याहून खाली होता. काही वेळा तर तर तो ०.२ टक्के ते १.५ टक्के एवढाही घसरला होता.घामाचा पैसा सुरक्षितनागरिकांनी घाम गाळून कमावलेल्या प्रत्येक पैशाची सरकारला जाणीव आहे. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गाचे जीवन सुसह्य करण्यासोबतच त्यांचे पैसेही वाचावेत हे डोळ्यांपुढे ठेवूनच सरकारची धोरणे व योजना राबविल्या जात आहेत. वर्तमानाच्या चिंतेने देशाचे भविष्य वाºयावर न सोडण्याचे भान सरकारला आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा