शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यावर कातडे ओढल्याने भिंतीवरचेही दिसत नाही!, विरोधक म्हणजे शल्यवृत्तीचे टीकाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 05:50 IST

गेल्या दोन तिमाहींत भारताचा विकासदर अपेक्षेहून कमी झाल्याचे निमित्त साधून एकसुरात गळा काढणाºया टीकाकारांना महाभारतातील शल्याची उपमा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्यावर उघड हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींत भारताचा विकासदर अपेक्षेहून कमी झाल्याचे निमित्त साधून एकसुरात गळा काढणाºया टीकाकारांना महाभारतातील शल्याची उपमा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्यावर उघड हल्लाबोल केला. डोळ्यावर कातडे ओढल्याने भिंतीवरचेही दिसत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. मागील व आताच्या सरकारच्या काळातील आकडेवारी देत त्यांची ओरड बिनबुडाची असल्याचा दावा केला.‘इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरीज् आॅफ इंडिया’च्या कार्यक्रमात मोदींच्या भाषणाचा मुख्य रोख गेल्या काही दिवसांत सरकारवर टीका करणाºया विरोधकांवर व स्वपक्षीयांवरही होता. टीका करणारे हे लोक गैरसोयीचे असते, तेव्हा सरकारच्या आकडेवारीवर शंका घेतात आणि सोयीचे असते तेव्हा तीच आकडेवारी ब्रह्मवाक्य मानून टीका करतात, असे ते म्हणाले. व्यासपीठावर मोदी यांनी भाषणात उल्लेख केलेल्या प्रत्येक मुद्द्याची आकडेवारी तक्त्याच्या स्वरूपात दाखविण्याची खास व्यवस्था करण्यात आली होती.सरकार प्रामाणिकांच्या पाठीशीमोदी म्हणाले, देशाच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत प्रामाणिकांची कदर केली जाईल. व्यापाºयांना भूतकाळातील कुलंगडी तर बाहेर काढली जाणार नाहीत, याची भीती असल्याची मला कल्पना आहे. परंतु त्यांच्यामागे शुल्ककाष्ठ लावले जाणार नाही. जीएसटीच्या व्यवस्थेत देशहितासाठी जे काही बदल व सुधारणा करणे गरजेचे असेल, ते सरकार नि:संकोचपणे करेल.भाषणात महाभारतातील ‘शल्य’मोदी म्हणाले की, महाभारतात शल्य नावाचे एक पात्र होते. शल्य हा कर्णाचा सारथी होता. युद्धात जे काही दिसायचे ते पाहून हा शल्य कर्णाला एकसारखा हतोत्साहित करत असे. नैराश्याचे वातावरण पसरवीत असे. आज शल्य नसला तरी शल्यवृत्ती कायम आहे. अशा लोकांना नैराश्य पसरविण्यातच आनंद मिळतो. एखाद-दुसºया तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर कमी झाला तरी त्यांच्यासाठी ती मोठी बातमी होते.पंतप्रधानांनी मांडला आकडेवारीचा फ्लॅशबॅकमी कोणी अर्थतज्ज्ञ नाही किंवा मीतसा दावाही केलेला नाही; पण आज देशात अर्थव्यवस्थेवर एवढी चर्चा होत असताना मला जरा ‘फ्लॅशबॅक’मध्ये जाण्याखेरीज गत्यंतर नाही.सातत्याने सात टक्क्यांहून वृद्धीदर असलेल्या अर्थव्यवस्थेचा विकास दोन तिमाहींत ५.७ व ६.१ टक्के झाल्यावर टीका सुरूझाली. परंतु विकासदर या पातळीवर येण्याची ही पहिली वेळ नाही.पूर्वीच्या सरकारच्या काळात आठ वेळा विकासदर ५.७ टक्के वा त्याहून खाली होता. काही वेळा तर तर तो ०.२ टक्के ते १.५ टक्के एवढाही घसरला होता.घामाचा पैसा सुरक्षितनागरिकांनी घाम गाळून कमावलेल्या प्रत्येक पैशाची सरकारला जाणीव आहे. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गाचे जीवन सुसह्य करण्यासोबतच त्यांचे पैसेही वाचावेत हे डोळ्यांपुढे ठेवूनच सरकारची धोरणे व योजना राबविल्या जात आहेत. वर्तमानाच्या चिंतेने देशाचे भविष्य वाºयावर न सोडण्याचे भान सरकारला आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा